Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from February, 2026Show All
`माघ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री श्रीनाथांच्या लग्न सोहळ्याने वीरनगरी दुमदुमली तर लाखो भाविकांची उपस्थिती सवाई सर्जाच चांगभलं जयघोषात श्रीनाथांचा विवाह सोहळा पार पडला                                                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                 वीर यात्रेला सुरुवात झाली. कोंडीत पालखी ७ वाजता वेशीवर दाखल झाली. देवाची धुपारती,  मुकादम पाटील धुमाळ, सालकरी, मानकरी दागिनदार विश्वस्त सल्लागार मंडळ यांनी स्वागत करून, पालखी जागेवर स्थानापन्न झाली.रात्री ११ वाजता समस्त राऊत मंडळी यांचेकडून देवाला आकर्षक पोशाख करून, विधी करण्यात आले. कोडीत पालखी, वीरची पालखी, अंधारचिंच येथे दाखल झाली.  याठिकाणी मानकरी यांना फुलाच्या माळा घालून, वाई, कन्हेरी पालखीची भेटाभेट झाली. सर्व पालख्या मंदिराकडे रवाना झाल्या. मंदिरात प्रवेश केल्यावर एक प्रदक्षिणा होऊन, मुकादम पाटील ,धुमाळ यांचे हस्ते विधी व  मंत्रोपचार होऊन पारंपारिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी पुरोहित, मानकरी, सालकरी दागिनदार श्रीनाथ भक्त उपस्थित होते. सदर सोहळा पाहण्यासाठी लाखोचा जनसमुदाय वीरमध्ये लोटला होता. यावेळी पोलीस प्रशासन, होमगार्ड, पोलीस मित्र, कमांडो फोर्स श्रीनाथ सेवा चे स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, फटाके अतिशबाजी, फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरात फुलांची सजावट श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट व दिलीपदादा धुमाळ मित्रपरिवार यांचेमार्फत करण्यात आली, फटाके आतिषबाजी स्वप्नील हरकळ, स्वप्निल झांबरे, शिरवळ वाले, प्रशांत साळुंखे,  मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई कैलास औसक बडदे, बुणगे बंधू, श्रीनाथ लाईट रवी चौरे, नितीन शेंडकर, जनरेटर व्यवस्था राहुल वाल्हेकर, मिथुन धुमाळ स्पीकर व्यवस्था कांदळकर यांचेमार्फत करण्यात आली.श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट यांनी संपूर्ण यात्रा उत्सवाचे नियोजन केल्याचे मुख्य विश्वस्त मोहनराव रावसाहेब धुमाळ यांनी सांगितले. यावेळी सदर श्रीनाथांचा लग्न सोहळा पार पाडण्यासाठी सर्व विश्वस्त मंडळ, सल्लागार सालकरी मानकरी दागीनदार  ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री क्षेत्र वीर यात्रेसाठी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे ढोल ताशांच्या गजरामध्ये श्री शेत्र कोडीत वरून श्री शेत्र वीर कडे शाही असे प्रस्थान                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                     माघ शुद्ध पौर्णिमेला रविवारी दि.1 रोजी दुपारी 12:30 च्या सुमारामध्ये आरती होऊन, श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्री क्षेत्र कोडीत ता. पुरंदर येथील भक्त तुळाजी बुवा मंदिरापासून वीर तालुका पुरंदर येथील नाथ मस्कोबा, माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याचे प्रस्थान ठेवण्यात आले, याप्रसंगी भाविकांनी फुलांची उधळण करीत 'सवाई सर्जाच चांगभलं' 'नाथ साहेबांचं चांगभलं' च्या गजरामध्ये भाविकांच्या उपस्थितीत वीर यात्रेसाठी श्रीनाथ म्हस्कोबा देवांच्या पालखी काठीचे प्रस्थान ठेवण्यात आले, कोडीत येथील देऊळ वाड्यामध्ये शनिवारी पहाटे उत्सव मूर्तींना अभिषेक घालण्यात आला, त्यानंतर सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारांमध्ये ढोल ताशांच्या पारंपारिक वाद्याच्या गजरांमध्ये मानांच्या काठी, छत्री, आपदागिरी, शौर्य ढाळत, देऊळ वाड्यातून जवळ असणाऱ्या तुळाजीबुवा मंदिर येथे रात्री दहा वाजता पालखी काठी विसावली, त्यानंतर विर येथील बारा दिवसांच्या यात्रे संबंधी नियोजनाची बैठक झाली, यावेळी कोडित ग्रामस्थ, सालकरी, मानकरी, श्री देवस्थान म्हस्कोबा महाराज ट्रस्टचे आजी, माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते, पहाटे पाच वाजता उत्सव मूर्तींना महारुद्र अभिषेक घालून, पालखीत विराजमान करण्यात आले, त्यानंतर भाविकांनी उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले, सकाळपासून मंदिरात पालखीच्या दर्शनासाठी रांग लागली होती, श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेऊन, भाविकांचा आणि वीर कडे पारंपरिक वाटेने निघाली होते, यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे,  माजी आमदार संजय जगताप, नीरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, साकेत जगताप, अमोल जगताप, भैय्यासाहेब खैरे,गीतांजली ढोणे पदाधिकारी बहुसंख्येने आदी उपस्थित होते. दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी तुतारी वाजली आणि मानकऱ्यांनी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीला खांदा लावला, ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये सालकरी, मानकरी ग्रामस्थ आणि हजारो भाविकांचे उपस्थितीमध्ये श्रीनाथाच्या पालखीचे विर कडे प्रस्थान झाले या पालखी पुढे मानाची काठी पालखी समवेत दागीनदार, अब्दागिरी, ढाळत भाविकांच्या उपस्थितीमध्ये अक्षता झेलित, धीम्या गतीने पालखीने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आणखी नदीपलीकडे गेल्यावर नागदरी याठिकाणी पारंपारिक मेंढ्यांचे रिंगण, वाद्याच्या गजरांमध्ये पार पडले. पिंपळे ते वीर अशा पालखी मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची पालखी भिवडी, सुपे, पिंपळे, पांगारे घाट मार्गे परिंचे गावावरून पालखी राऊतवाडी येथे विसावली. सायंकाळी पालखी वीर येथे पोहोचल्यानंतर सर्व मानकऱ्यांच्या वतीने वीर मध्ये पालखी काठीचे स्वागत केले जाते, रात्री बारा वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह संपन्न झाला. आजपासून वीर येथील बारा दिवसांच्या यात्रेला प्रारंभ झालेला आहे.
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पुरंदर साठी एकाच गावाचे व आडनावाचे उमेदवार असल्याने डोकेदुखी ठरणार                          सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                            7 फेब्रुवारी रोजी शनिवार या दिवशी होत असलेल्या जिल्हा परिषद  पंचायत समितीच्या निवडणूक जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी 19 पंचायत समितीच्या आठ जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात उतरलेले असून, 22 महिला व 30 पुरुष यात आपले भवितव्य आजमावत असून, या निवडणुकीमध्ये योगायोग म्हणजे एकाच गावातील आणि एकाच आडनावाचे उमेदवार निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, लढाई जिल्हा परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून ज्योती झेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रुपाली झेंडे या दोन्ही दिवे गावच्या उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत, बेलसर जिल्हा परिषदेच्या जागेसाठी भाजपच्या अजय इंगळे, व शिवसेना रमेश इंगळे दोन्ही वाळूज गावचे तर राष्ट्रवादीचे गौरव कोलते राष्टवादीकडून लढणारे शहाजी कोलते दोघे पिसवॅ गावचे उमेदवार आहेत, वीर गटात देखील राष्ट्रवादीकडून पुष्कराज जाधव व शिवसेनाकडून समीर जाधव हे परिंचे गावचेच उमेदवार आहेत, जिल्हा परिषद गटासाठी जिल्हा परिषदेप्रमाणेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देखील अशी स्थिती असून, गराडे गणातून अर्चना कटके  या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर ललिता कटके या भाजपच्या उमेदवार असून, दोघी भिवरी गावच्या आहेत, माळशिरस गणात अजिंक्य कड राष्ट्रवादीचे व संदीप चौंडकर हे अपक्ष उमेदवार नायगावचेच आहेत, तर याच गणात माऊली यादव भाजप तर शरद यादव शिवसेनेचे उमेदवार असून, दोघे माळशिरस गावचे रहिवासी आहेत, भिवडी गणात शिवसेनेच्या पूजा मोकाशी व भाजपाच्या सायली शिंदे या भिवडी गावच्या तर वीर गणातील काँग्रेस उमेदवार महेश धुमाळ व भाजपा उमेदवार सुधीर धुमाळ हे दोघेही वीर गावचे आहेत नीरा गणात देखील राष्ट्रवादीच्या मोनिका कांबळे व शिवसेनेच्या रेखा केदारी या निरा गावच्या उमेदवार आहेत, आडनावातील साधर्म्य व एकाच गावातील विविध पक्षांचे उमेदवार यामुळे, मतदार आणि उमेदवार यांची  परंतू डोकेदुखी ठरणार असून, संभ्रम निर्माण होणार असल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे.
पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरीला लागली हळद; तर देवाला हळद लावण्यासाठी महिलांची अलोट गर्दी; आज मध्यरात्री धुमधडाक्यामध्ये देवाचा लग्न विवाह सोहळा                                                                       सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                            श्री शेत्र वीर तालुका पुरंदर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांना हळद लावण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला, मानकरी राऊत यांच्या महिला बरोबरच गावातील अनेक महिलांनी श्रीनाथ जोगेश्वरीला हळद लावली, हळद लावण्याच्या कार्यक्रमांमध्ये महिलांनी देवाजवळ जाऊन स्वतःच्या हाताने, हळद लावता येते, त्यामुळे महिलांसाठी हा क्षण आनंदायी असतो, परिणामी वीर आणि पंचक्रोशीतील महिलांनी श्रीनाथ जोगेश्वरी यांना हळद लावण्यासाठी खूप गर्दी केली होती, शनिवारी दिनांक 31 पहाटे पाच वाजता पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला, सकाळी देवाला अभिषेक घालण्यात आले, दुपारी बारा वाजता धुपारती होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, दुपारी 1:15 वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला, दुपारी तीन वाजता देवाचे मानकरी, समस्त राऊत मंडळी, देऊळ वाड्यात आले वाजत गाजत देवाची हळद मंदिरात आणली, विधिवत पूजा होऊन, पोशाख व फुलांची मंडवळी देवाला बांधण्यात आली, सायंकाळी 5:30 वाजता देवाला हळद लावण्यासाठी प्रशासकीय स्तरातून वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर व प्रणोती श्रीश्री माळ गटविकास अधिकारी पुरंदर या वीर या ठिकाणी देवाला हळद लावण्यासाठी हजर होत्या,त्याच्या समवेत मंजुषा धुमाळ सरपंच वीर, प्रमिला देशमुख वीर देवस्थान विश्वस्त उपस्थित होत्या. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत यात्रा नियोजनाची संपूर्ण तयारी झालीचे असल्याचे प्रशासनाबरोबर, देवस्थान ट्रस्ट ही यात्रा सोहळ्यासाठी पूर्ण तयारीत असून, रविवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देवाच्या लग्न सोहळ्याची संपूर्ण विधिवत तयारी सुरू असल्याचे देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहन रावसाहेब धुमाळ यांनी यावेळी सांगितले, समस्त मानकरी राऊत, ग्राम पुरोहित मुकादम पाटील गुरव यांच्या सुवासिनींच्या वतीने, शनिवारी दुपारी साडेतीन वाजता देवाला हळद लावण्यास सुरुवात करण्यात आली, सर्व ग्रामस्थ महिला तसेच बाहेरून आलेल्या महिला भाविकांनी मंदिरात देवाला हळद लावण्यासाठी गर्दी केली होती, सायंकाळी सात वाजेपर्यंत देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता, महिला वर्गाने खूप गर्दी केली होती, तसेच देवस्थानमार्फत दर्शन बारी, होमगार्ड व्यवस्था करण्यात आली होती, यावेळी विश्वस्त व सल्लागार मंडळ, ग्रामस्थ, मानकरी, दागीनदार सालकरी मंडळी आधी उपस्थित होते.
Load More That is All