Hot Posts

6/recent/ticker-posts

Recent posts

Show more
निधन वार्ता:                                                             श्रीकृष्ण नेवसे                                                       सासवड प्रतिनिधी:                                                   सासवड येथील जेष्ठ अभ्यासू ,पत्रकार साहित्यिक श्रीकृष्ण देवराम नेवसे (वय 59) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यांने निधन झाले, गेल्या 30 वर्षापेक्षा अधिक काळ  यांनी पुरंदर तालुक्याच्या पत्रकारितेमध्ये सक्रिय योगदान दिले, सकाळमध्ये त्यांनी अनेक वर्ष सातत्याने, लेखन करून ,आपला ठसा उमटवला ,पुरंदर मधील सीताफळ, अंजीर, भाजीपाला, स्थानिक उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी, भाऊ, असा परिवार आहे.
निधन वार्ता:                                                            राधुबाई शिंदे                                                            सासवड प्रतिनिधी:                                                   ताथेवाडी ता. पुरंदर येथील रहिवाशी राधुबाई मारुती शिंदे (वय 94) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रकाश मारुती शिंदे, विजय मारुती शिंदे, राजेंद्र मारुती शिंदे, संजय मारुती शिंदे यांच्या त्या आई होत.
वडगाव मावळ येथील शिवली या ठिकाणावरून दत्तात्रय संभाजी आडकर बेपत्ता                                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      वडगाव मावळ येथील दत्तात्रय संभाजी आडकर (वय 25 वर्ष) रा. शिवली ता. मावळ जिल्हा पुणे) उंची 5 फूट  7 इंच, चेहरा उभा, रंग सावळा, नाक सरळ अंगाने सड पातळ, उजव्या हाताचे अंगठ्यावर टाके, टाकलेले व्रण, अंगात चॉकलेटी रंगाचा हाफ टी-शर्ट, कालया रंगाची जीन्स पॅन्ट, पायात चप्पल नाही, डोक्यामध्ये काळे केस बारीक, भाषा मराठी, हिंदी बोलतो, शिक्षण दहावी हा व्यक्ती दि. 12/ 1/ 2025 पासून रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारामध्ये राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेला आहे. सदर हा मुलगा मिळून आल्यास वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा संपर्क नंबर एक वडगाव मावळ पोलीस स्टेशन 02114235 333/ 901107 96 22, पोलीस कॉन्स्टेबल भोईर 8766887512.
पुरंदर तालुक्यात शिवसेना शिंदे गट विरूद्ध भाजप सामना बेलसर गटात रंगतदार होणार                                   सासवड प्रतिनिधी: बापू  मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ आंतरराष्ट्रीय मुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये रंगतदार होणार आहेत, पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बेलसर गटात व पंचायत समितीच्या बेलसर व माळशिरस गणामधील लढती या विमानतळामुळे अत्यंत चुरशीच्या होतील अशी तरी सध्याचे चित्र आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यातच मुख्य लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे ,भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती राज्यातील सत्तेत एकत्र असली, तरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्त स्थानिक पातळीवर त्यांच्या पक्षाचे नेते याची निवडणूकीसाठी प्रतिष्ठापनाला लावताना दिसत आहेत, त्यामुळे महायुतीतच वर्चस्वाच्या संघर्षासाठी होणार आहे, त्यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते गावोगावी दवरे करून, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापवत आहेत, मेळावे, गाव भेट दौरे विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क केला जात आहे, बेलसर गट तसेच पंचायत समितीच्या बेलसर आणि माळशिरस गणावर मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार संजय जगताप यांचे काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते, परंतु जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे, तर पंचायत समिती सदस्य या दोन्ही महिला व माजी आमदार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने, सध्या तरी भाजपचे पारडे बेलसर गटात व बेलसर माळशिरस मध्ये जड आहे, त्याचाच फायदा उठवत मतभेद व अंतर्गत कुरगुडीचा फायदा आमदार विजय शिवतारे यांनी घेतला असून, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना या मतदारासंगामध्ये खूप प्रयत्न करावे लागणार आहेत, विमानतळाचा प्रश्न, सासवड ते रिसेपिसे पर्यंत काम चालू असणारे रोडचे यामध्ये सामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रामुख्याने पुढाऱ्यांनी सध्या तरी तीन गटातील प्रयत्न शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार वर्गासाठी अनुकूल असे वातावरण मिळालेले नाही, परंतु भाजपमधील विमानतळाच्या व सासवड रिसेपिसे पर्यंत रोडचे काम चाललेली यासाठी प्रत्येक वेळी लक्ष देऊन सोडवणूक केली आहे, परंतु शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याकडे फारसे लक्ष दिले जात नाही ,तर आत्ता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गाव भेट दौरे चाललेले असले तरी, तीनही पक्षाला खूप झगडावे लागणार आहे ,तर प्रामुख्याने लढत शिवसेना शिंदे गट व भाजपमध्येच सामना रंगतदार होणार आहे, बेलसर गटातून दत्ता झुरंगे विजयी झाले तर बेलसर गणात सुनिता कोलते तर माळशिरस गणामध्ये आरती यादव या काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते, त्यावेळी शिवसेनेला मोठा धक्का बसला होता, तर आता ही निवडणूक शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट,शी लढत प्रतिष्ठेची व राजकीय दृष्ट्या अस्तित्वाची बनली आहे, बेलसर गट सर्वसाधारण राखीव झाल्याने, यामध्ये पुरुषाचे वर्चस्व पस्थापित झाले असून, गुडघ्याला बाशिंग बांधल्याने प्रचार जो चालू सुरू झाला आहे या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार विजय शिवतारे, राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, संभाजी झेंडे, जालिंदर कामठे, भाजपचे माजी आमदार संजय जगताप, बाबा जाधवराव, गंगाराम जगदाळे व माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादी शरद पवार गट विजय कोलते, सुदाम इंगळे, माणिक झेंडे यांच्या भूमिकेतील लक्ष लागले आहे, तर सध्या तरी शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपकडून जिंकून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सध्या जोरात चालू आहे, बेलसर हा माजी आमदार संजय जगताप यांचा बालेकिल्ला समजला जातो त्याला सुरूग लावण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट यांनी जोरदार पद्धतीने व्यहरचना केली जात आहे, हा गण सर्वसाधारण साठी राखीव झाल्याने, या गणांमध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे, राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजला जाणारा बेलसर हा गण सर्व साधारण झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलेल्या अनेकांची विकेट पडली आहे, यामध्ये प्रामुख्याने राजकारणापासून अलिप्त असलेले यांना सुद्धा चालून आलेली संधी निर्माण झाल्याने, प्रस्थापित असणाऱ्या ज्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत, माळशिरस गण सर्वसाधारण झाल्याने, मोठी चुरस निर्माण झाली आहे ,तर बेलसर मध्ये सुद्धा सर्वसाधारण असल्याने, चुरस जास्त प्रमाणात निर्माण झाली आहे. विधानसभेला एकत्र आलेले महायुती सह महाविकास आघाडीतील घटक पक्ष सुद्धा आमने सामने येण्याची दाट शक्यता आहे, ज्या गावात उमेदवारी असेल त्या ठिकाणी बहुद्देश गाव एक होऊन, त्यांना मतदान करीत असतात मग त्या ठिकाणी तू कोणत्या पक्षाचा आहे हे पाहिले जात नाही, असा या गणाचा इतिहास आहे, या गणांमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मतदाराच्या थेट गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे, उमेदवारी अध्याप निश्चित झाली नसताना सुद्धा मतदारांना आपलेसे करण्यासाठी विविध युक्ती या कार्यकर्त्या मार्फत लढविल्या जात आहेत, तर विमानतळ व सासवड रिसेपिसे पर्यंत होणाऱ्या रोडच्या कामामुळे बेलसर गट व बेलसर आणि माळशिरस गणातील लढत ही लक्षवेधी ठरणार आहे.
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या ठिकाणी ममता बाल सदन आश्रमामध्ये भाऊबीज निमित्त दिवाळी फराळ वाटप सासवड  प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       समता कृती प्रतिष्ठान व साप्ताहिक समता कृती यांच्या वतीने गरिबाची दिवाळी उपक्रमांतर्गत ममता बाल आश्रम कुंभारवळण ता. पुरंदर येथील मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला, या उपक्रमाचा प्रारंभ जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आला.गेली 31 वर्षापासून दिवाळी सणाचा फराळ एकत्र करून, येथील मुलांची गोड दिवाली करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक दिगंबर कदम, महेश पेशवे यांनी सांगितले. जेजुरी पोलीस ठाणे मधून सकाळी साडेदहा वाजता या उपक्रमास प्रारंभ झाला, साकुर्डे, बेलसर, भोंगळे मळा, बेलसर, पारगाव वाघापूर मार्गे कुंभारवळण येथे सायंकाळी उपक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी अध्यक्ष एडवोकेट राहुल कदम, एडवोकेट सचिन कदम, शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे, माजी प्राचार्य पोपटराव ताकवलेे, माजी सैनिक दिलीप दोडके, परेश पेशवे, बाळासो कुंभार, सुहास बेंगाळे, संदिप टिळेकर, सुजाता गुरव, ममता बालक सदनचे प्रमुख दिपक गायकवाड, विद्यमान सरपंच मंजुषा गायकवाड, पत्रकार ए.टी माने, पत्रकार बापू मुळीक, ममता बाल सदनचे कर्मचारी वर्ग, बहुसंख्येने मुलींची उपस्थिती आदी उपस्थित होते. शेतकरी देवानंद जगताप, उद्योजक नारायण होले यांचे या उपक्रमास सहकार्य लाभले. रघुनाथ वावळ यांनी सूत्रसंचालन केले.
पुरंदर तालुक्यात भाऊबीज अनोखी पद्धतीनुसार  साजरी तर सासवडच्या तुकाई माता मंदिरात रंगले दिवाळी पहाट चे स्वर....                                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज  :                                                                                सासवडकर रसिकांसाठी भाऊबीजेचे निमित्त साधुन शहरातील लांडगे आळीतील तुकाई माता मंदिरात स्वर साधक प्रस्तुत भूपाळी ते भैरवी या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येथीलप्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने याचे आयोजन केले गेले होते. पुरंदरमधील स्थानिक कलाकार व मंडळींनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण केले. सुवर्णा होले, मच्छिंद्र दीक्षित, गुलाब बुध्ये, संजय काटकर, स्वरा व ज्ञानेश्वरी दीक्षित या गायककलाकारांनी विविध रचना सादर करून टाळ्या घेतल्या,    प्रथम तुला वंदितो ने सुरू झालेल्या या संगीत प्रवासातनिघालो घेऊन दत्ताची पालखी, पायोजी मैने राम रतन, एक राधा एक मीरा, ऐशी लागी लगन, ए मेरे वतन के लोगो अशा विविध स्वरूपातील गीतांचे सुंदर सादरीकरण झाले. पांडुरंग श्रीरंग भज रे मना या भैरवीने व आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.प्रख्यात तबला वादक राजेंद्र दुरकर यांच्यासह समद पठाण, चंदुलाल तांबोळी, स्वप्नील जगताप, मच्छिंद्र दीक्षित या वाद्यवृंदानी सुंदर संगीत साथ दिली. ह भ प बाळासो फडतरे (गुरुजी) यांचे समयोचित सूत्र संचालन कार्यक्रमाची उंची वाढवून गेले.     मध्यंतरात माजी आमदार संजय जगताप , औदुंबर महाडिक यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या नीलिमा दिदी यांनी मान्यवरांचे भाऊबीज निमित्त औक्षण केले.माजी आमदार  संजय  जगताप,शेखर वढणे,सुहास लांडगे, संजय चौरे, ॲड भगवान होले, डॉ राजेश दळवी, मोहन बागडे, अनिल कदम, आनंद (भैय्या )जगताप, हेमंत ताकवले ,बापू मुळीक,दत्तात्रय  भोगळे,जगदिश शिदे,इंदिरा पवार, कल्याणी चिंबळकर, हरीशेठ शेवते संगीता लांडगे, सखाराम लांडगे, ॲड सुदाम सावंत, ॲड नितीन जाधव, डॉ संदीप होले , मोहनअण्णा जगताप, माऊली गिरमे, तानाजी सातव यांसह मोठ्या संख्येने रसिकांनी या सुंदर कार्यक्रमास हजेरी लावली.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 3,400 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,311दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक   मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                              पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवारी दि.22 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3,400 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,311 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 3,400 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,800 तर सरासरी 3,100 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,311 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,500 तर सरासरी 2,905 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले,सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निला खे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर आदी उपस्थित होते. गुळाला 4,450रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 296 बॉक्स 59 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,450 कमाल दर 4,100 रुपये तर साधारण4,225 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 2,800,3,400,3,100. बाजरी 2,600,3,500, 3,050. गहू 2,500,3,311,2,905. तांदूळ 1) 4,500,5,300,4,900.2)4,200,4,800,4,500.हरभरा 4,800, 5,410,5,105.
Load More That is All