पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातच वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत; तर रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याची गरज सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस ठाण्यासमोरील चौक आणि जेजुरी नाका येथील चौकामध्ये नुकतेच नवीन वाहतूक नियंत्रक दिवे कार्यान्वित केले असताना, मात्र अनेक वाहनचालक विशेषत वाहनांचे चालक आणि दुचाकी स्वार वाहतुकीच्या नियमांना सर्रासपणे पायदळी तुडवत असल्याचे चित्र दिसत आहे, यामुळे नियमाचे पालन होताना दिसत नाही, प्रवाशांना आपला जीव मुठीत ठेवून, धोक्यात घालून, प्रवास करावा लागत आहे, वाहतूक नियंत्रक दिवे सुरू असताना, सुद्धा अनेक बेसिस्त वाहन चालक नियम तोडून पुढे जात आहेत, यामुळे नियमाप्रमाणे थांबणाऱ्या वाहन चालकासोबत वाद विवाद आणि बाचाबाची होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, सासवड येथे दोन्ही ठिकाणी चौक असून, येथे वाहतूक नियंत्रक दिवे बसवण्यात आले असले तरी, अजूनही झेब्रा क्रॉसिंग चे पट्टे मारलेले नाहीत, यामुळे पादचाऱ्यांना रस्ता नेमका कुठून ओलडायचा हेच समजत नाही, तसेच वाहन चालकांना सिग्नल लागल्यावर नेमके कुठे थांबायचे? याबाबतही संभ्रम निर्माण होत आहे, यामुळे अपघात होण्याची शक्यता दाट आहे. रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याची जास्त गरज आहे, या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक, असल्याची मागणी स्थानिक नागरिकांचे मत आहे, या ठिकाणी त्वरित पांढरे पट्टे आणि परावर्तक पट्टे मारण्यात यावेत, यामुळे वाहन चालकांना नेमके कुठे थांबायचे याची स्पष्ट कल्पना येईल आणि पादचाऱ्यासाठी ही सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल तसेच वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या बेशिस्त चालकावर कारवाई करण्याची गरज असल्याचेही जाणवत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments