Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from December, 2025Show All
पुरंदर तालुक्यातील विमानतळ संदर्भातील पुणे या ठिकाणी भूसंपादन बैठकीकडे शेतकऱ्यानी पाठ फिरवली             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर तालुक्यातील नियोजित विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेने वेग घेतला असला तरी, स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध अजूनही कायम स्वरूपामध्ये आहे, विमानतळासाठी भूसंपादन संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीकडे, शेतकऱ्यांनी अक्षरशा: पाठ फिरवली असून, पारगाव, खानवडी, एखतपुर, मुंजवडी, कुंभारवळण, उदाची वाडी, वनपुरी या सात गावातील वस्तीनिहाय व गावठाणनिहाय दोन- दोन सदस्यांना भूसंपादन व मोबदला याबाबत पुणे येथे सोमवारी बोलावण्यात आले होते, यापूर्वीही बोलावलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना बोलू दिले नाही, असा स्पष्ट इशारा व आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे, यासाठी फक्त पंधरा ते वीस एजंटांना हाताशी धरुण अधिकारी वर्ग व तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी विमानतळ संदर्भातील घाट घातलेला आहे, त्यामुळे विद्यमान आमदार व तालुक्यातील 15 ते 20 एजंट ही आमचे सात गावातील शेतकऱ्यांचे जमिनीचे मालक नाहीत, शेतकरी हा स्वतः खुद्द हा मालक आहे. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या एजंटांना म्हणजे 15 ते 20 जणांना बाजूला सारावेत व शेतकऱ्यांच्या संघ स्पष्ट विमानतळ संदर्भातील बातचीत करावी, असाही स्पष्ट इशारा सामान्य शेतकऱ्यांनी विमानतळ संदर्भात केलेला आहे, विमानतळ विरोधी समितीने पत्रकार परिषदेमध्ये सासवड येथे ही भूमिका स्पष्ट केली. पी.एस. मेमाणे, सरपंच ज्योती मेमाणे, शितल टिळेकर, मंजुषा गायकवाड, उपसरपंच एडवोकेट स्वप्निल होले, प्रताप कुंभारकर, नंदू कामठे, यासह गणेश होले, मंनेश हगवणे, किरण टिळेकर, चंद्रशेखर मेमाणे, विकास मेमाणे, सतीश कुंभारकर, विकास खळदकर, अशोक कुंभारकर आदी उपस्थित होते.
निधन वार्ता                                                               सोपान काळे                                                           सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील दिवे काळेवाडीचे अंजिर बागायतदार सोपान कोंडीबा काळे (वय 60) यांची अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या पैशात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ, बहिण, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. कातोबानाथ दिंडीचे अध्यक्ष ज्ञानदेव काळे, यांचे ते बंधू होत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश काळे यांचे चुलते होत,  प्रगतिशील शेतकरी भूषण काळे, भाग्यश्री लवांडे ,अश्विनी हरगुडे यांचे ते वडील होत.
इंदापूरच्या हरिश डोबाळेची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी ...                                                                  सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     ओडिसा राज्यातील संभलपूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील न्हावी गावच्या हरिश दिपक डोंबाळे या सायकलपटुने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक  मिळवले . दि. 2 डिसेंबर ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान नॅशनल सायकलींग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित ओडिसा  संभलपुर येथे  ज्युनियर नॅशनल सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .१८ वर्ष वयोगटातील स्पर्धेमध्ये १०० किलोमीटर मास स्टार्ट सायकलिंग इव्हेंटमध्ये हरीशने महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवत  यश संपादन केले . इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील छोट्याशा असलेल्या न्हावी गावच्या हरिश डोंबाळे या सायकलपटुने सातत्यपूर्ण सराव आणि  कठिण मेहनतीच्या जोरावर याआधीही राष्ट्रीय शालेय स्पर्धा , तसेच फेडरेशन सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक  रौप्यपदक कास्यपदकांची कमाई केलेली आहे . आई-वडिलांचे प्रोत्साहन व पाठिंबा आणि अथक  परिश्रमाच्या जोरावर हरीशने मिळवलेले दैदिप्यमान यश हे  ग्रामीण भागातील  युवकांना व खेळाडुंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे . हरिशने राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक ही  इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद बाब असून इंदापूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याची प्रतिक्रिया हरिश डोंबाळेचे वडील दिपक डोंबाळे आणि आई आशाताई डोंबाळे यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय सायकलपटु हरिशच्या या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,000 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,100 दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक    मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                              पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.10 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,000 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,100 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,000 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,500 तर सरासरी 3,250 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,100 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,600 तर सरासरी 2,850 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले,सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निला खे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, गुळाला 4,300रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 400 बॉक्स 80 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,300 कमाल दर 3,900रुपये तर साधारण4,100 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 2,500,4,000,3,250. बाजरी 2,200,3,200, 2,700. गहू 2,600,3,100,2,850. तांदूळ - -4,555,4,600,4,577 -हरभरा 4,500, 5,000,5,150.
पुरंदर तालुक्यातील सासवडकर वाहतूक कोंडीने त्रस्त        सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड ता. पुरंदर येथील शहरांमध्ये दर सोमवारी भरणारा आठवडे बाजार आणि त्यामुळे सायंकाळी निर्माण होणारी वाहतूक कोंडी सासवड करा साठी नित्यचीच ठरलेली आहे व डोकेदुखी सामान्य नागरिकांची झालेली आहे, विशेषता नगरपरिषद कार्यालय ते पालखी महामार्ग लगतच्या, एसटी स्थानक परिसरात दरम्यान: सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेमध्ये परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे, अक्षरशा: तर म.य.सो वाघिरे विद्यालयाची संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटल्यानंतर, नगरपालिकेच्या शेजारी त्या ठिकाणी फळांची त्या ठिकाणी हात गाड्या लागलेल्या या पूर्णपणे रोडवरती येत असून, त्या ठिकाणी नगरपालिका व पोलीस प्रशासनाची त्या ठिकाणी सोमवारचा कुठलाही बंदोबस्त नसतो, सासवड नगरपालिकेसमोरील पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बाहेरील फळ विक्रेते, हातगाड्या लावतात, हा मार्ग शहराच्या मुख्य बाजारपेठेत, गावठाण नारायणपूर आणि कोंढवा रस्त्याकडे जातो तो जवळ शैक्षणिक सहकुल शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि पालखीचे शॉपिंग सेंटर असल्याने, येथे नेहमीच वरदळ असते, सायंकाळी फळे विक्रेते खरेदी करण्यासाठी ग्राहक थेट रस्त्यावर गर्दी करतात, यामुळे अंतर्गत आणि महामार्गावरील वाहनांची कोडी होत आहे, पादचाऱ्यांना चालणे ही मुश्किल होत आहे, वाहतूक कोंडी झाल्यावर पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करते, परंतु या ठिकाणी वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे, दर सोमवारची समस्या ही बनल्याने, तात्पुरत्या उपायांनी नागरिकांची गैरसोय दूर होत नाही, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे, पालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन, या समस्येवर तोडगा काढला पाहिजे, ठोस आणि कायमस्वरूपी भूमिका घेतली पाहिजे ज्ञानेश्वर( माऊली काका) जगताप उद्योजक, पुरंदर. याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे, पालिका प्रशासनाशी चर्चा केलेली आहे, कायमस्वरूपी  होमगार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे, बेशिस्त वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारी पालिकेसमोर हातगाडी लावणाऱ्यासाठी गावठाणात बाजाराच्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात येईल, कुमार कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड.
पुरंदर तालुक्यातील पांगारे पर्यंत ग्रामस्थांनी पकडले चोरटे आणि गुन्हे  उघडकीस येण्याची पोलिसाकडून शक्यता व्यक्त केली                                                                     सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        परिंचे ता. पुरंदर परिसरामध्ये महिलां एकट्यांना पाहून, मंगळसूत्र तसेच सोन्याची दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या तीन चोरट्यापैकी दोन जणांना पांगारे ता. पुरंदर येथील तरुणांच्या मदतीने परिचे पोलिसांनी पकडून अटक केली. परिंचे गावाजवळ वीर सासवड रस्त्यावर पोलदार ही लोकवस्ती आहे, येथे सोमवारी दि. आठ रोजी संध्याकाळी पाच वाजता नर्मदा धर्माजी दुधाळ (वय 75) या अंगणातील ओट्यावर बसल्या होत्या, त्यावेळी मोरेश्वर दुधाळ हे रस्त्याच्या कडेला मुलांना शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी उभे होते, तेव्हा त्या ठिकाणी तीन संशंयित युवक उभे होते, त्यांच्या आपापसात गप्पा सुरू होत्या, त्यावेळी दुधाळ यांनी त्यांच्या गाडीचा नंबर लक्षात ठेवला होता, मुलांची स्कूल बस आल्यावर, मोरेश्वर दुधाळ मुलांना घेऊन घरात गेला की लगेच या चोरट्यांनी नर्मदा दुधाळ यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला, नर्मदा दुधाळ यांनी आरडाओरडा केला असता, लगेच मोरेश्वर दुधाळ यांनी गाडीवरून पाठलाग करण्यास सुरुवात केली, स्थानिक परिसरातून तृप्ती धनंजय काकडे (वय 32)या शेतातून घरी जात असताना, या चोरट्याने पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला, त्यांना तातडीने याबाबत पोलीस पाटील तानाजी काकडे यांना माहिती दिली. त्यांनी परींचे पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप पवार यांना खबर देऊन, चोरटे हरगुडे गावच्या दिशेने गेले असल्याचे सांगितले, पांगारे, खेगरेवाडी, हरगुडे येथील तरुण व शेतकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांना पकडून अटक केली. सोहेल आयुब शेख (वय 23) सध्या राहणार येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक पुणे. प्रशांत विजय गायकवाड (वय 24) सध्या राहणार पांडे तालुका भोर यांना अटक केली तर हमीद शेख राहणार येवलेवाडी पुणे हा पळून गेला, याबाबत तृप्ती धनंजय काकडे राहणार पांगारे व मोरेश्वर विनायक दुधाळ राहणार परींचे यांनी फिर्यादी दिली आहे या चोरट्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, हवालदार विशाल जाधव, संदीप पवार पुढील तपास करत आहेत.
पुरंदर तालुक्यातील वाघीरे महाविद्यालय मध्ये वाचन उपक्रम उत्साहात                                                                       सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           पुणे जिल्हा शिक्षण सासवड मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय मध्ये पुणे पुस्तक महोत्सव 2025 च्या निमित्ताने शांतता पुणेकर वाचत आहेत, हा वाचन उपक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके यांच्या संकल्पनेतून कनिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन संस्था आणि महाविद्यालयाच्या नावाची लोगो तयार करून, या उपक्रमाची भव्यता दर्शवली, या उपक्रमात कनिष्ठ विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके, उप प्राचार्य प्राध्यापक सुधीर रोकडे, प्राध्यापक राजेश देशमुख ,रवी जाधव, उपस्थित होते .कनिष्ठ विभागाचे अध्यापक अमर होळकर ,प्रताप किरदार, शारीरिक शिक्षण संचालक विकास मुजुमुले, मनीषा ताकवले, मनीषा चोपडे,दिपाली इंगळे, श्रीनिवास खेत्रे, संतोष लोणकर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये मजुराचा खून; फिर्यादीनुसार पोलिसांकडून एक संशयित ताब्यात         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      सासवड ता. पुरंदर परिसरामध्ये मंगळवारी दि. नऊ रोजी सकाळी पालखी महामार्ग लगत, एका वाईन शॉप च्या मागील बाजूस बांधकाम सुरू असलेले ठिकाणी  काही जिन्याखाली एका बांधकाम मजुराचा धारदार शस्त्राने मान आणि पोटावर वार करून खून केलेला मृतदेह आढळून आला, राजू दत्तात्रय बोराडे (वय 38 )राहणार महाडा कॉलनी सासवड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, या घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी आपल्या एका पथकासह तातडीने, घटनास्थळी भेट देत पाहणी केली. हा खून कोणत्या कारणातून झाला असावा ,या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे,  संशयताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, याबाबत मयताचा भाऊ गजानन दत्तात्रय बोराडे यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञानी विरोधामध्ये फिर्याद दाखल केली आहे, शेवटी अहवाला नंतर अनेक महत्त्वाचे दागेद्वारे मिळण्याची शक्यता आहे, घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि बोटाचे ठसे तज्ज्ञांनी पाहणी केली, मारे कराणचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, याबाबत माहिती मिळवताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी भेट दिली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथके तैनात केल्याची माहिती उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे यांनी दिली.
पळसनाथ प्राथमिक विद्यालयात आनंदी बाजार मेळाव्याचे आयोजन                                                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    शैक्षणिक गुणवत्ता विकास उपक्रमातंर्गत  पळसदेव तालुका इंदापूर येथील पळसनाथ पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयात बाल आनंदी बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आत्मसात व्हावे , सामाजिक कौशल्यांचा विकास व्हावा तसेच आर्थिक व्यवस्थापन शिकता यावे यासाठी विद्यालयात आनंदी बाजार मेळाव्याचे केलेले आयोजन हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून आनंदी बाजार मेळाव्यामधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो व  जबाबदारीची जाणीव होते आणि विविध शैक्षणिक मूल्य जोपासली जातात  असे मत पळसनाथ  शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे यांनी बालआनंदी बाजार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त  केले . यावेळी पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे सचिव योगिराज काळे ,संचालक राजेंद्र काळे , पळसनाथ विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक , संतोष पवार , प्राथमिक विद्यालयाच्या प्राचार्या सिद्धमा पाटील ,पळसदेवचे माजी सरपंच आजिनाथ पवार , रामदास पवार , मल्हारी काळे , संजय शेलार, मनोज खत्री , दिगंबर मरळे , प्रकाश भोसले यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक ,पालकवर्ग ,शिक्षक शिक्षकेत्तर , विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते . दरम्यान पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील बालगोपाळांनी कांदे वांगी बटाटे मिरची कोथिंबीर पालक मेथी यासारख्या पालेभाज्या व फळभाज्या विविध प्रकारची फळे विक्रीस आणली होती. याशिवाय खाऊ गल्ली विभागांमध्ये वडापाव इडली सांबर पाणीपुरी चटकदार भेळ आदी प्रकारच्या खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते . या मेळाव्यात बैलगाडी राईड हा सर्वांत जास्त आकर्षणाचा विषय ठरला . आनंदी बाजार मेळाव्यासाठी भेट दिलेल्या पालक ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी सर्व पालेभाज्या वस्तूपदार्थांच्या  खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. बाजार मेळाव्यातील वस्तूंची खरेदी विक्री करताना या बाल गोपाळांच्या   चेहऱ्यावरील आनंद  ओसंडुन वाहत होता . पालक ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या आनंदी बाजार मेळाव्यास आठवडे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.आनंदी बाजार मेळावा संपन्न होण्यासाठी प्राथमिक विभागाच्या प्राचार्या सिद्धमा पाटील , रूपाली हिंगमिरे अरुणा काळे  राधिका जाधव ,ललिता काळे पूजा सूर्यवंशी ,रेश्मा अडवाल , मदिना शेख ,सुवर्णा माने , अमोल मिसाळ सुरज काळे प्रशांत काळे यांनी नियोजन केले.
पुरंदर तालुक्यातील सायकल ट्रॅक चे काम हे निकृष्ट दर्जाचे             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यांमध्ये सासवड ,सुपे, काळदरी ,तसेच भोंगवली फाटा परिंचे, सासवड कोंढवा व वाल्हे व तालुक्यातील सर्व सायकल ट्रॅक चे काम सुरू असून, हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू आहे, तसेच संबंधित ठेकेदार यांचे थर्ड पार्टी तपासणी करावी, असे निवेदन सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पुणे यांना सामाजिक  कार्यकर्ते  डॉ. उदयकुमार  जगताप ,आनंद  (भैय्या )जगताप सासवड  शहर  अध्यक्ष  भाजप जि काही माती मिश्रित असून, फ्लॅट मिक्स मेथड वापरली गेलेली आहे, सॉईल स्टॉप दिला इजेससाठी कोणतेही केमिकल वापरण्यात आले नाही .एमपीएम  ग्रेडची जाडी दिसून येत नाही ,या कामात वापरण्यात येणारे काँकरीट, डीबीएमबीसी चा लेयर यांचा साइडवर कोर कटींग तपासणी केल्याशिवाय कोणत्याही कामाचे बिल देण्यात येऊ नये ,तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असे निवेदनामध्ये नमूद केलेले आहे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, उपअभियंता स्वाती दहिवाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.
 पुरंदर तालुक्यामध्ये गुणवंत रत्न म्हणून शिवाजी शेंडकर व मधुकरराव झेंडे यांचा सन्मान                                        सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                     मधुकर बाबुराव झेंडे यांनी विख्यात आंतरराष्ट्रीय गुंडांना पकडत असताना ,कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ,स्वतःच्या चारित्र्यावर कोणताही डाग न पडू देता, काम केलेले असून, हेच पुरंदर तालुक्याचे वैशिष्ट्य असल्याकारणाने, त्यांचे तालुक्यात सर्व क्षेत्रांमध्ये दिगज होऊन गेलेले असताना, स्वातंत्र्य चळवळीच्या काळातही हा तालुका मागे नसल्यामुळ, पुरंदर मधील मातीचा ढेकूळ पाण्यात टाकला तरी येणारा तवंग हा इतिहासाचा असेल, असे अनेक गुणवंत माणसे पुरंदर तालुक्यामध्ये घडलेली आहेत, याचा शोध घेऊन, आम्ही त्यांचा सन्मान करीत आहे असे प्रतिपादन समाजवादी नेते रावसाहेब पवार यांनी केले. सासवड ता. पुरंदर येथे जालिंदर कामठे, मित्र परिवाराच्या वतीने सोमवारी दि.आठ रोजी पुरंदरचे गुणवंत रत्न भूविकास बँकेचे माजी संचालक शिवाजी कृष्णाजी शेंडकर व माजी एसीपी मधुकर बापूराव झेंडे यांचा सत्कार रावसाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य सुदाम इंगळे,हेमंत माहुरकर, माणिकराव झेंडे पाटील, बापू भोर ,शामकांत भिताडे,वामन कामठे, शांताराम बोराडे, अरविंद शेंडकर ,रोहिदास कुदळे, भानुदास जगताप, सचिन पठारे, दत्ता राऊत आधी उपस्थित होते. यावेळी बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे म्हणाले की, हल्ली फ्लेक्स लावणारे कार्यकर्ते पुढे राजकारणात व समाजकारणात दिसतात, पण या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुरंदर तालुक्यात ज्यांनी उज्वल कार्य केले आहे, अशा मान्यवरांचे मार्गदर्शन व कार्यकर्त्यांना व्हावे यातून भविष्यातील योग्य कार्यकर्ता तयार व्हावा, यासाठी जालिंदर कामठे मित्रपरिवार काम करीत आहे .कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदकुमार जगताप यांनी केले, सूत्रसंचालन संदीप देवकर यांनी केले, तर संतोष जगताप यांनी आभार मानले.
महाराष्ट्रातील पोलीस पाटलांना किमान 40 हजार रुपये मानधन द्यावे; तर आठ हजार पदे रिक्त तीन गावांची एकावर जबाबदारी अशी स्थिती                                             सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                       संपूर्ण राज्यभरात पोलीस पाटलांची  जवळपास 40 हजार पदे आहेत, यापैकी आठ हजार पदे रिक्त असून, या रिक्त पदांचा पदभार कार्यरत पोलीस पाटलावर सोपविण्यात आला आहे,यामुळे एका पोलीस पाटलाला दोन ते तीन गावांची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याकारणाने, पोलीस पाटलांना निर्धारित मानधन वेळेवर मिळत नाही, शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकासाठी लागणारा पेट्रोलचा खर्च ,वही ,कागद या वस्तू वेळेवर पुरवल्या जात नसल्यामुळे ,महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांचे गाराने थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी मांडलेले आहे .चर्चेप्रसंगी संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे ,राज्य उपाध्यक्ष रवींद्र डोईफोडे व इतर पदाधिकारी आदी उपस्थित होत. वयोमर्यादा 65 वर्ष करावी, पोलीस पाटलांना किमान 40 हजार रुपये मानधन द्याव,सेवा निवृत्तीचे वय 65 करावे ,नवीन भरती झालेले पोलीस पाटील उच्च शिक्षित असल्याने ,त्यांना कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, पोलीस पाटलांना दहा हजार रुपये रिटायरमेंट लागू कराव, सेवानिवृत्तीनंतर पात्र पाल्यांना घेण्यात यावे, रिक्त पदे भरावी आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सोमवारची होणाऱ्या बैठकीसाठी शेतकरी सहित उपस्थित न राहण्यासाठी सात गावचे सरपंच व उपसरपंच खुद्द जिल्हाधिकारी यांना देणार पत्र            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                आंतरराष्ट्रीय प्रस्तावित पुरंदर विमान तळसंदर्भात खानवडी येथे झालेल्या, सात गावच्या विमानतळा बाबत मीटिंग ही शेतकरी, सरपंच, उपसरपंच, सामान्य नागरिक, महिला मंडळ, यांची मीटिंग घेण्यात आली, एक तर जिल्हाधिकारी यांना आम्ही जमीन मोजणीसाठी फक्त संमिती दिली होती, जमीन मोजणी झाल्यानंतर, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीचा दर व जमिनीचा परतावा ठरवू असे सांगितले होते, प्रत्यक्षात प्रत्येक वेळी म्हणजे पहिली मीटिंग सुद्धा शेतकरी यांना संमतीत न घेता सात गावातील फक्त एजंट हे अधिकारी, वर्गापाशी लुडबुड करतात ,तर त्यांना बाजूला सारा म्हणजे शेतकरी हा पुढे घ्यावा, व एजंट याला मागे बसवा, शेतकरी यांचे गाराणे ऐकून घ्यावे, पुरंदर मधील  पालखी महामार्ग  साठी एक गुंठासाठी दहा ते बारा लाख रुपयांनी व्यवहार केला जातो, मग विमानतळासाठी एक एकर साठी 40 गुंठे होतात, तर साधारण पाच ते सहा कोटी एकरला व्यवहार हा शेतकरी बांधव यांना दिला पाहिजे, असा एजंटगिरी करणारे पुढे का? सर्वसामान्य शेतकरी याला बोलण्यासाठी दुसरी ,तिसरी मीटिंग बोलवणे गरजेचे आहे, परंतु आत्तापर्यंत शेतकरी मागे, तर एजंटगिरी करणारे, अधिकारी हे पुढे पुढे करतात, तर आमची शेती विमानतळाला द्यायची नाही, सर्वसामान्य शेतकरी हा खुद्द अन्नदाता, काळी माती त्याची 'आई' आहे. एजंटला अधिकारी वर्गाने बाजूला सारावे व सर्वसामान्य शेतकरी याला तुम्ही न्याय द्यावा, यामुळे प्रत्यक्षात प्रत्येक वेळी हे जिल्हाधिकारी यांनी मीटिंग ही शेतकऱ्यांची न बोलवता, फक्त अधिकारी व एजंट यांनाच प्राधान्य दिलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची अवहेलना केलेली आहे, अशी भावना झालेली आहे, शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी फक्त शेतकरी सोबत दराची संदर्भात चर्चा करताना, एक कोटी तीस लाख रुपयांचीच व दहा टक्के परतावा या मुद्द्यावरच लोकांचे मत परिवर्तन करत आहेत, अशी शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे, जिल्हाधिकारी मीटिंग बोलावून शेतकऱ्यांची विमानतळासाठी संमती आहे व दरासंदर्भात व परताव्या संदर्भातही शेतकऱ्यांची संमती आहे, असाच ठराव शासनाला पाठवत आहेत ,असाच समज हा शेतकऱ्यांचा झालेला आहे. सोमवारी विमानतळाच्या संदर्भात कोणतेही प्रकारची चर्चा करायची नाही, असाच ठराव हा शेतकऱ्यांच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला, तरी यासाठी सदरची सोमवारची मीटिंग ही फक्त शेतकऱ्यासाठी पुढील वाट ठरवून घ्यावी, एजंटला बाजूला सारावा , मगच शेतकरी मिटींगला घ्या, असा ठराव करण्यात आलेला आहे ,त्यासाठी मीटिंगच पुढे ढकलावी, यासाठी सात गावच्या सरपंच व उपसरपंच यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देण्याचे ठरवलेले आहे, हे पत्र पुणे येथे मीटिंग घेणे, अपेक्षा सर्व सामान्य शेतकऱ्यांसोबत मीटिंग घ्यावी, दर हा दहा ते वीस जण एजंट हे आमचे जमिनीचे दर व जमिनीचा परतावा ठरवणारे मालक नाहीत, तर फक्त ते एजंटगिरी करून शेतकऱ्यांचे टाळूवरची लोणी खाणारे एजंट आहेत, सात गावच्या संयुक्तिक मीटिंगमध्ये खालील निर्णय घेण्यात आले आहेत, ते पुढील प्रमाणे एक सोमवारी होणाऱ्या वाटाघाटीच्या मिटींगला कोणीही शेतकरी प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही. दोन तसे पत्र सर्व ग्रामपंचायत या लेटरहेडवर लिहून जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात येणार आहेत. तीन जोपर्यंत शेतकऱ्यांनी मागणी केलेले अहवाल शेतकऱ्यांना दाखवले जात नाहीत, तोपर्यंत शेतकरी हा कुठल्याही चर्चेला सामोरे जाणार नाही. चार सोमवारी असलेल्या मीटिंगची माहिती कुठल्याही शासनाच्या अधिकृत प्रतिनिधीकडून, मिळालेली नसल्याने ,ती संशयास्पद आहे. पाच मागच्या अनुभवावरून नियोजित मीटिंगमध्ये शेतकऱ्याच्या बोलण्यावर दबाव टाकून बंधने आणली जात आहेत, असेच निदर्शनास येत असल्यामुळे, इथून पुढे चर्चाही गाव पातळीवर होतील असे सर्वसामान्य शेतकरी यांचे म्हणणे आहे. हे सर्व निर्णय शेतकऱ्यांनी गट ,तट बाजूला सारून एकमुखाने घेतलेले आहेत, कुंभारवळण या ठिकाणची शेती फक्त संमती जमीन मोजणीसाठी दिलेली असून, कारण याचे 17 सप्टेंबर पर्यंत विमानतळाची संमती कुंभारवळ्णची 75 टक्के होती मग 24 व 25 सप्टेंबर रोजी सर्वसामान्य शेतकरी यांनी वकिलांचा सल्ला घेऊन, विमानतळाच्या जमीन मोजणीसाठीच संमती दिली ती म्हणजे दोन दिवसांमध्ये ७२ टक्के झाली होती, परंतु 75 टक्के व 72 टक्के मिळून 147% होत होती, त्यात माहितीच्या अधिकारांमध्ये जाऊन, ती संमती म्हणजे 17 सप्टेंबर पर्यंत 28% तर 24 व 25 सप्टेंबर रोजी 72 टक्के अशीच होती, परंतु 17 सप्टेंबर पर्यंत कुंभारवळण गावातील एजंट आणि 75% संमती झाली आहे, अशी खोटी माहिती देऊन एक प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक केली आहे, त्यासाठी आम्ही प्रकल्पग्रस्त शेतकरी असून, उद्योजक जर शेतकरी होऊ शकतो? तर शेतकरी हा उद्योजक का नाही ?होऊ शकत, त्यासाठी आताच्या सरकारने आमच्यावर ही वेळ आणू नका? विमानतळाची पुरंदर विमानतळाबाबत मोबदलेच्या स्वरुपात शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. गणेश काशिनाथ मोरे शेतकरी, कुंभारवळण. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, त्या म्हणजे दुसरी, तिसरी मीटिंगसाठी एजंटला मागे बसवा, सर्वसामान्य शेतकरी यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी, खुलेआम जिल्हाधिकारी यांनी चर्चा करावी. त्यासाठी सोमवारची मीटिंगची फक्त अधिकारी व एजंट साठीच आहे, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नाही, त्यासाठी सोमवारची मीटिंग रद्द करावी व पुढे ढकलावी व खुद्द शेतकऱ्यांच्या सोबतच चर्चा करावी, अशी सर्व माहिती प्रतिनिधीला गणेश काशिनाथ मोरे शेतकरी, कुंभारवळण यांनी दिली.
वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीचा खर्च आता थेट २०० रुपयावर सरकारचा महत्वपूर्ण निर्णय                          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                      आता वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहीशाची मोजणी करायला शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागणार नसल्याने, कारण राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे ,आधी काय होतं, जमिनीची मोजणी करायला हजार रुपयांपासून थेट 14 हजारापर्यंत खर्च यायचा, त्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा अक्षरशः रिकामा होत होता, पण आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे, प्रति पोट हिसा फक्त दोनशे रुपये देऊन मोजणी करता येणार आहे, हा नवीन निर्णय राज्यभर लागू झाला असून, संबंधित जिल्ह्याच्या भूमी अभिलेख विभागाला याची माहिती देण्यात आली आहे, आता कोणी जमिन मोजणीस अर्ज केला तर त्याला केवळ फक्त दोनशे रुपये भरावे लागतील, महाभुमिअभिलेखच्या वेबसाईटवरही नवीन दर अपडेट झालेले आहेत, त्यात एकत्र कुटुंब, पोट हिस्सा मोजणी हा नवीन पर्यायी जोडलेला आहे, ई मोजणी फर्जंद 2.0 या संगणक प्रणाली मध्येही बदल करण्यात आली असून, संपूर्ण प्रक्रिया आता आधीपेक्षा पारदर्शक आणि सोपी होणार आहे ,कुटुंबात जमिनीच्या वाटणीवरून, कायम  वाद होत होते, शिवाय मोजणीच्या खर्चामुळे आणखी त्रास वाढायचा, पण या निर्णयामुळे कुटुंबातील सदस्यावर आर्थिक बोजा पडणार नाही, जमाबंद आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी या संदर्भात अधिकृत पत्र जारी केले असून, यापूर्वी मोजणी दोन प्रकारे होत होती "साधी आणि जलद जलद मोजणीसाठी तर जास्त शुल्क लागत होते ,पण आता हा संपूर्ण खर्च मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला असून, शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
विविध मागण्यांसाठी पुण्यात शिक्षक -शिक्षकेत्तरांचा विराट मोर्चा...                                                                                       सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       पुण्यात हजारो शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काढलेल्या विराट मोर्चातून, उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत शाळा बंद आंदोलन करत शासनाला गर्भित इशारा दिला आहे . शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक केल्याच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शुक्रवारी (दि.५ डिसेंबर) हजारोंच्या संख्येने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुणे जिल्हा परिषद कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढला.तसेच त्यानंतरही शासनाने टीईटी परीक्षा रद्द करण्यासाठी हालचाली केल्या नाही ;तर दुसऱ्या टप्प्यात येत्या ९ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान आणि तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील आझाद मैदानावर यापेक्षाही मोठ्या  संख्येने भव्य मोर्चा काढला जाईल,असा इशारा शासनाला यावेळी देण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महामंडळाचे समन्वयक शिवाजी खांडेकर व बाळासाहेब मारणे यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे  सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले आहे. तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती करावी, संचमान्यता आदी प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांनी ५ डिसेंबरला शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला.त्यानुसार शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील शाळा बंद ठेऊन हजारो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभाग घेतला.शिवाजी खांडेकर व बाळासाहेब मारणे यांच्यासह शिक्षण समितीचे नंदकुमार होळकर, संस्थाचालक शिक्षण मंडळाचे विजय कोलते  मुख्याध्यापक संघटनेचे नंदकुमार सागर, के. एस. डोमसे, मनपाचे सचिन डिंबळे, शिवाजी कामठे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी  मोर्चात मनोगत व्यक्त करून शासनाच्या धोरणावर टिका केली.मुख्याध्यापक,प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांनी मोर्चाला पाठिंबा दिला.शिवाजी खांडेकर म्हणाले, एकदा सर्व प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर शिक्षक म्हणून २० ते २५ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकाला टीईटी परीक्षा अनिवार्य करणे अन्यायकारक आहे.जिल्हाधिकारी पदावर काम करणारे अधिकारी सेवा दिल्यानंतर पुन्हा युपीएससी परीक्षा देत नाहीत. मग शिक्षकांना टीईटी परीक्षा का? तसेच आमदार, खासदार यांना पेन्शन लागू होते.मग शिक्षकांना का डावलले जाते? त्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. आजचे आंदोलन हा केवळ इशारा आहे. यापुढे नागपूरला हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिवेशनावर मोर्चा काढतील. त्यानंतरही शासनाने मागण्या मान्य केल्या नाही.तर लाखोंच्या संख्येने सहकुटुंब आझाद मैदानावर मोर्चा काढला जाईल.बाळासाहेब मारणे म्हणाले,टीईटी परीक्षा लादणे चुकीचे आहे. शिक्षकांना शालाबाह्य कामे दिल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही. मराठी शाळा वाचल्या पाहिजे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या एकजूटीमुळे हा भव्य मोर्चा निघाला. आपल्या एकीमुळे शासनाला प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला भाग पाडू. त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागली तरी चालेल.दरम्यान, 'आमचा लढा कशासाठी शाळा शिक्षक वाचवण्यासाठी...., माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं...'  आज नाही उद्याला लढायचं तर  मग मागे कशाला  सरायचं, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, शिक्षकांची शालाबाह्य कामे बंद केली पाहिजे, शिक्षक व शिक्षकेतर भरती झाली पाहिजे, अशा अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या."आता तरी सरकारने लवकरात लवकर चर्चेला बोलवून यातून मार्ग काढावा त्याचबरोबर आमचे  प्रमुख प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवावेत जेणेकरून आम्हाला पुढच्या टप्प्यात आंदोलन करण्याची वेळ येऊ नये ,नाहीतर नाईलाजास्तव आम्हाला मुंबईचे आझाद मैदान गाठावे लागेल "- शिवाजी खांडेकर -समन्वयक शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
पुरंदर तालुक्यातील संत सोपान काकांच्या समाधी सोहळ्यास दिंड्यांचे आगमन सुरू                                                  सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           संत ज्ञानेश्वर महाराज यांची धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज यांच्या श्रीक्षेत्र सासवड ता. पुरंदर येथील संजीवन समाधी सोहळ्यास शुक्रवार दि.12 ते दि. 19 डिसेंबर या कालावधीमध्ये भक्तीमय वातावरणामध्ये सुरुवात होत असून, राज्याच्या विविध भागातून दिंड्या सासवडमध्ये दाखल होत असून, मंदिर परिसरामध्ये भजन, कीर्तन, आणि हरिनामाचा अखंड जागर रंगणार आहे ,अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी यांनी दिली. पहाटे काकडा आरती, नंतर महापूजा व अभिषेक पार पडेल ,हरिभक्त परायण संभाजी महाराज बडधे यांचे कीर्तन आणि सोहळा होणार असून दुपारी विजय महाराज भिसे यांची प्रवचन व हरिपाठ, रात्री हरिभक्त परायण अमेय महाराज शिंदे यांच्या जागर भजनाने कार्यक्रमाचे रंगत वाढणार आहे. शनिवारी दि. 13 रोजी परशुराम काळे यांचे कीर्तन आणि सोपानराव वाईकर यांचे प्रवचन होईल, परकाळे दिंडीचे कीर्तन तसेच कुंभारवळण ग्रामस्थांचा जागर होईल, रविवारी दि. 14 रोजी राजाराम महाराज कामठे, काशिनाथ महाराज जेजुरी हरे नमो संस्थान सोलापूर आणि बंडा महाराज कराडकर यांच्या कीर्तने व भजने पार पडतील, सोमवार दि. 15 रोजी पहाटे पवमान अभिषेकानंद गेनबा पवार यांचे कीर्तन ,नगर प्रदक्षिणात राज्यभरातील दिंडी प्रमुखांचा सत्कार आणि रात्री विशाल महाराज इंगळे यांचे कीर्तन, तसेच रांजणी खामगाव आंबेडगाव ग्रामस्थांचा जागर होईल, मंगळवारी दि.16 रोजी दिवे पंचक्रोशी दिंडी सुनील फडतरे ,सोपान काका टेंबुकर आणि बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या कीर्तन आणि भक्तीमय वातावरण अधिक रंगेल ,17 डिसेंबरला सोहळ्याचा प्रमुख दिवस मार्गशीष वैद्य तृतीया बुधवार 17 डिसेंबर हा प्रमुख दिवस असून, हरी भक्त परायण केशव महाराज नामदास पंढरपूर संत सोपानदेव समाधीचे कीर्तन सादर करतील, दुपारी अंजीर मंडळ ,नवी मुंबई महाप्रसाद देणार असून ,सत्यवती ईदलाबादकर यांचे प्रवचन होईल, सोपान महाराजांच्या समाधी वर्णनाचे अभंग व मंदिर प्रदक्षिणात, तसेच बाळकृष्ण बुवा दिंडीचा जागरण होईल, तर 18 डिसेंबरला रोजी भोपळे दिंडीचे काल्याचे किर्तन होईल ,अशी सर्व माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी यांनी प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषदेची निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोचली                           सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी संपलेली असून, आता सर्वांचे लक्ष हे निर्णयाकडे लागलेले आहे, नगराध्यक्षपदासह 11 प्रभागातील 20 नगरसेवक पदासाठी मंगळवारी( दि. 2) रोजी अत्यंत उत्साहामध्ये 67.02% मतदान झाले, या निवडणुकीचा अंतिम आणि बहुप्रत्यक्ष निकाल हा रविवारी (दि. 21) डिसेंबर रोजी लागणार आहे, नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या 45 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात, चोख पोलीस बंदोबस्तात बंद आहे, सर्वाधिक मतदार असलेला प्रभाग 5 मध्ये 3964 मतदार असून, तेथे सर्वाधिक 74.75 टक्के मतदान झाले, सर्वात कमी मतदान प्रभाग आठ मध्ये 59.70 टक्के नोंदवले गेले, प्रभाग चार मधील ताथेवाडी बुथ मध्ये ८०.८३ टक्के इतके मतदान झाले, रविवारी (दि. 21) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सासवड नगर परिषदेच्या सभागृहांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे ,अशी निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी मतमोजणीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे,मतमोजणी 11 प्रभागासाठी 11 टेबलावर होणार असून, ही प्रक्रिया एकूण चार फेऱ्यांमध्ये पार पडेल. प्रभाग क्रमांक 11 'अ ' साठी प्रभाग क्रमांक चार 'ब ' ची जागा यापूर्वीच बिनविरोध झालेली आहे. न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रभाग क्रमांक 11 'अ ' साठी नव्याने अर्ज दाखल करून घेतले जाणार नाहीत, तसेच 10 डिसेंबर पर्यंत अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून, 20 डिसेंबरला मतदान होऊन, 21 डिसेंबरला निकाल लागणार आहेत, सासवड नगर परिषदेवर कोणाची सत्ता येणार? या प्रश्नाचे उत्तर आता 21 डिसेंबरलाच स्पष्ट होईल, असे सासवडच्या राजकीय भविष्याची दिशा देखील निश्चित होईल, चौकाचौकात व पारावर एक्झिट पोलचे अंदाज या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्य लढत झाली आहे, दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते विजयाचे दावे करत असल्याने, निकालाबाबतची उत्सुकता अशी शिगेला पोहोचलेली असून, काही प्रभागात अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या असल्याच्या चर्चा शहरात सुरू असून, त्यामुळे अशा उमेदवारास कार्यकर्त्यांची धाकधूक वाढलेली आहे, चौका चौकात व पारावर असा एक्झिट पोलचे अंदाज लावले जात असून, त्या ठिकाणी पैजा सुद्धा लागलेल्या आहेत, अंदाज दररोज बदलतानाही दिसत आहेत, त्यामुळे कार्यकर्ते व उमेदवार याच्यात चलबिचल  चालू आहे, प्रभाग 1) एकूण मतदार 3,057 झालेले मतदान 2,199 71.93% .प्रभाग क्रमांक 2) एकूण मतदार 1,937 झालेले मतदान 1,379  टक्केवारी 71.19% पभाग 32 प्रभाग क 3 एकूण मतदान 2,305 झालेले  मतदान 1,690 टक्केवारी 73.32%. पभाग क्रमांक 4) एकूण मतदार 3,634 झालेले मतदान 2,427 टक्केवारी 66.79%.  प्रभाग क्रमांक 5) एकूण मतदार 4,064 झालेले मतदान 2,964 टक्केवारी 74.75%. प्रभाग क्रमांक 6) एकूण मतदार 3,425 झालेले मतदान 2,146 टक्केवारी 62.66%. प्रभाग क्रमांक 7) एकूण मतदार 3,756 झालेले मतदान 2,495 टक्केवारी 66.43%. प्रभाग क्रमांक 8) एकूण मतदार 3,000 झालेले मतदार 1,791 टक्केवारी 59.70%. प्रभाग क्रमांक 9) एकूण मतदार 2,014 झालेले मतदान 1,285 टक्केवारी 62.59% प्रभाग क्रमांक 10) एकूण मतदार 3,074 झालेले मतदान 1,899 टक्केवारी 61.58% प्रभाग क्रमांक 11) एकूण मतदार 3,451 झालेले मतदान 2,283 66.15%. मतदार पुरुष 16, 818 मतदान झालेले 11, 404 महिला 16, 838 मतदान झालेले 11,153 सासवडचे एकूण मतदान 33, 656 तर झालेले मतदान 22,557 टक्केवारीट   67.02%
भूसंपादनसाठी  दर निश्चितीची सोमवारी बैठक तर पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल                                                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर येथील प्रास्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारी 32/1  परवानगी राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून, भूसंपादनाचा दर निश्चित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, दरम्यान, दर निश्चितीसाठी येत्या सोमवारी दि. 8 रोजी शेतकरी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात बैठक होणार असून, भूसंपादनाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे उचलेले असल्याचे, मानले जात आहे, पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनासाठी, आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत, भूसंपादना पोटी द्यावयाच्या मोबदलयाच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल, 11 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून, हा अहवाल राज्य सरकारने मान्य करून, तो उद्योग विभागाकडे पाठविला, या अहवालाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील 32/1 कलमानुसार उद्योग विभागाची मान्यता मिळणे आवश्यक असते, आठ दिवसापूर्वी उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी. अनबलगन त्यांची भेट घेऊन, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चर्चा केली होती, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या 32/1 चा प्रस्ताव उद्योग विभागाकडून त्यास मान्यता देण्यात आली आहे, ही मान्यता मिळाल्याने, आता जमिनीच्या दरासंदर्भात शेतकऱ्यांशी वाटाघाटी करण्याचा जिल्हा प्रशासनाला मान्यता मिळालेली आहे. महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे: पुरंदर तालुक्यातील सात गावातील 1,285 हेक्टर अर्थात 3,000 एकर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. त्यासाठी आत्तापर्यंत सुमारे सव्वा बाराशे हेक्टर क्षेत्राची शेतकऱ्याकडून संमती. सुमारे 50 हेक्टर क्षेत्र अजूनही संमतीविना नकाशाच्या बाहेरील सुमारे 240 हेक्टर जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची मान्यता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील 32/3 तरतुदीनुसार, शेतकऱ्यांचा मोबदला तयार करण्याचे काम पूर्ण होणार यासाठी सुमारे 5000 कोटी रुपये खर्च अपेक्षित. भूसंपादनाचा दर निश्चित करण्यासाठी येथे सोमवारी शेतकऱ्यांबरोबर बैठक बोलवण्यात आली आहे, चर्चा करून दर निश्चित करण्यात येणार आहे. दरा बाबतचा निर्णय झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील कऱ्हा नदीवर बांधलेल्या  के. टी बंधाऱ्यांची जबाबदारी कोणतेही जलसंधारण खाते घेत नाहीण                                                                     सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                    सासवड येथील कऱ्हा नदीवर बांधलेल्या  के. टीममध्ये बंधाऱ्यांची जबाबदारी ही त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही असे सांगत  असताना  के. टी बंधाऱ्यांची जबाबदारी घेत नसल्याबद्दल तक्रार ,सासवड नगरपालिका हद्दीतील बंधारे हे उपविभागीय जलसंधारण विभाग यांनीच बांधले आहेत , त्याच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष चौकशी व माहिती घेतली असता ,सासवड कार्य क्षेत्रात येणारे बंधारे हे दुरावस्थेत आहेत, गळती सुरू आहे, ३१ऑक्टोबर पूर्वी ते ढापे टाकून अडवले पाहिजेत याबाबत चर्चाही झाली होती.तक्रारीवर संबंधित मृदु व जलसंधारण खात्याचे अधिकारी पाहणीसाठी येऊनही गेले. परंतु त्यानंतर कार्यालयाने संपर्क न ठेवल्याने,  लेखी तक्रार दिली. तक्रारीनंतरही ढापे टाकण्यात आले नाहीत.शेवटी ही जबाबदारी कोणत्या खात्याची आहे ? सर्वच जलसंधारण विभाग या बांधलेल्या बंधाऱ्यांची जबाबदारी का घेत नाहीत ? त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, यासाठी माहिती अधिकारात माहिती विचारली असता .मृदु व जलसंधारण विभाग उपविभागीय जलसंधारण उपविभागाने कानावर हात ठेवले आहेत .आमचा बांधलेल्या बंधाऱ्यांचा संबंध नाही आणि आमच्या विभागाशी संबंधित नाही असे उत्तर आले आहे .मृदु व जलसंधारण उपविभाग यांचीच  बंधाऱ्यांची  जबाबदारी असल्याचे खालील विभागांनी त्यांना कळवले आहे.१)   वैशाली जंगले , जन माहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी,मंत्रालय मुंबई२) सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदु व जलसंधारण विभाग,येरवडा पुणे.३)  वि.सावंत ,सहाय्यक अधीक्षक अभियंता,पुणे पाटबंधारे मंडळ ,पुणे ११.अशा प्रकारे जलसंधारण खात्यानीही ही जबाबदारी मृदु व जलसंधारण उपविभाग  यांचीच असल्याचे कळवूनही उप विभागीय जलसंधारण अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत.हे बंधारे बांधले कोणी ?या बंधाऱ्यांच्या गळतीची,दुरुस्तीची  जबाबदारी कोणाची ? बंधारे आजतागायत सासवड नगरपालिकेकडे हासतांतरीत का केले गेले नाहीत ? दोषी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही? सर्वजण एकमेकावर जबाबदारी का ढकलत आहेत ?जलसंधारण विभागाच्या अशा कारभाराने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे .माहितीचा अधिकार अधिनियम २००५  या कायद्याच्या आधारे माहिती कशी मिळत नाही व कशी माहिती टाळली जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे .सासवड मधील बंधाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे विनंती सोबत संबंधित कागदपत्रे जोडली आहेत. अशी माहिती डॉ. उदयकुमार वसंतराव जगताप यांनी ही सवॅ माहिती प्रतिनिधीला दिली आहे.
सासवड मध्ये माजी आमदार संजय जगताप भाजप  विरुद्ध  आमदार विजय शिवतारे  शिवसेना (शिदे गट) यांची प्रतिष्ठा पणाला तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) दोन्हीकडून केला जातोय विजयाचा दावा                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                     सासवड नगरपरिषदेसाठी अतिशय चुरशीने मतदान झाल्यानंतर, मतमोजणी लांबल्याने मोठा राजकीय सस्पेन्स निर्माण झालेला आहे ,माजी आमदार संजय जगताप यांच्या पातळीवरील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदी (काकी) जगताप आणि विद्यमान आमदार विजय शिवतारे यांचे (शिंदे गटाचे) सचिन भोंगळे यांच्यातच मुख्य लढत होत आहे ,तर नगरसेवक  पदासाठी 20 जागासाठी 47 उमेदवार  निवडणूक  रिंगणात  आहेत  भाजप,शिवसेना (शिदे गट),महाविकास  आघाडी,अपक्ष  यामधून  लढत होत  आहे ,त्यामुळे आगामी राजकीय हालचाली या निवडणुकीत पणाला लागलेल्या आहेत, मतमोजणी पुढे ढकलल्याने, उमेदवार चिंतेत ,अफवामुळे, डोकेदुखी ,तर ईव्हीएमच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसावर नगरपंचायतीच्या निवडणुकीतील मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे, सासवड नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात चिंतेत असून ,अफवामुळे, डोकेदुखी ही वाढली आहे, मतदानानंतर निकालाची एक प्रकारे उत्सुकता असताना, मतमोजणीसाठी तारीख बदलल्याने, मागील काही दिवसापासून त्याने आपले काम केले नाही, तो फुटला, तो रुसला ,त्यांनी पैसे घेऊनही मतदान केले नाही, अशाच चर्चामुळे टपरीवर, चौका चौकात व पारावर मोठ्या प्रमाणात रंगत दिसून आलेली दिसते .न्यायालयाच्याआदेशानुसार 21 डिसेंबर रोजी निकाल होणार आहे ,चलबिचल वाढलेली ,अनपेक्षित बदलल्यामुळे उमेदवार व समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे, मतमोजणी उशिरा असल्याने ,काय निकाल लागेल, कोणता गट किती मते मिळविल ,यावर अंदाज बांधणे चालू आहे, त्यामुळे उमेदवारांची चल बिचल वाढलेली आहे ,त्यासाठी मतमोजणी पुढे ढकलने खूप अवघड झालेले आहे, असा भरपूर उमेदवारांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे, त्यासाठी 21 डिसेंबर ही तारीखेला सर्वांच्या नजरा ,डोळे त्या ठिकाणी मतमोजणीकडे लागलेल्या आहेत, तर निरीक्षकांचे महत्त्व वाढलेत नेत्यांच्या संपर्कामुळे, निरीक्षकांचे महत्त्व वाढले आहे, आता राजकीय निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते ,सेवानिवृत्त अधिकारी तसेच विविध बिगर राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पण मतमोजणीच्या दिशेचा अंदाज घेऊ लागलेले आहेत ,काही जण तर त्या व्यक्तींना प्रत्यक्ष बोलावून चर्चा करून कोणत्या गटाला किती मताची शक्यता आहे ,मतदानानंतर मतमोजणी निर्माण झालेल्या उत्सुकता व अनिश्चितता विविध व्यक्तींचे महत्त्व अचानक वाढले आहे, राजकीय निरीक्षकांच्या चर्चा वरून ,काही नेते धोरण ,आखत आहेत, तर काहींनी आघाड्या किंवा संपर्काची तयारी ही सुरू केलेली आहे, मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेची जबाबदारी ही आता पोलिसांवर येऊन पडलेली आहे ,तर निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर,सर्व मतदान मशीन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे ,त्यामुळे परिसरात ही दिवस -रात्र जागता- पहारा ठेवण्यासाठी पोलिसांना बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ,गेल्या पंधरा दिवसापासून नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान ,शांतता राखण्यासाठी पोलीस यंत्रणा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या अधिपत्याखाली सासवड वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगलीच मदत केली आहे ,प्रभाग क्रमांक चार ब मधून स्मिता सुहास जगताप भाजपच्या बिनविरोध निवड ही झाली आहे, तर प्रभाग क्रमांक 11अ मध्ये हेमलता मिलिंद इनामके यांच्या विरोधात न्याय प्रविष्ट निर्णय असल्यामुळे, निर्णयानुसार 20 डिसेंबर रोजी निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर सासवडलाच नाही तर महाराष्ट्रात 21 डिसेंबरला सर्वांचाच निकाल लागणार आहे ,प्रत्यक्ष मतदान ३३,६५६ मतदारापैकी 22, 557 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, त्यामध्ये 11,412 पुरुष मतदान व 11,145 महिला मतदारांचा समावेश आहे ,यावर्षी सासवडला मतदानाचा टक्का घसरून 67.02 टक्क्यावर मतदान झाले, त्यामुळे माजी आमदार संजय जगताप भाजप विरुद्ध आमदार विजय शिवतारे शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मुख्य लढत होत असताना, दोन्हीही बाजूंनी सध्या तरी विजयाची दावा करीत आहेत, कार्यकर्ते पैंजा लावत आहेत ,त्यामुळे 21 डिसेंबर रोजी खरे चित्र स्पष्ट होईल हेच सध्या तरी वाटत आहे.
गाईड–स्काऊट कॅडेट्सचा लखनऊ येथे डंका!!!         सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                             श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवडच्याउत्तर प्रदेशातील लखनऊ येथे दिनांक २३ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या डायमंड जुबली ग्रँड फिनाले व १९ व्या राष्ट्रीय स्काऊट–गाईड जांबोरीत शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवड येथील गाईड व स्काऊट कॅडेट्सनी उल्लेखनीय कामगिरी करत पुणे जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्राचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर उंचावला. पुणे जिल्ह्यातून या राष्ट्रीय स्तरावरील जांबोरीसाठी एकूण १३ गाईड कॅडेट्स आणि १४ स्काऊट कॅडेट्स यांची निवड झाली होती. ही बाब शाळेसाठी अत्यंत अभिमानाची ठरली आहे. जांबोरीच्या उद्घाटनप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या, तर शेकोटी (Camp Fire) कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. समारोप समारंभात भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थित राहून सर्व स्काऊट व गाईड कॅडेट्सना प्रेरणादायी संदेश देत आशीर्वाद दिला. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून ३३,००० हून अधिक स्काऊट–गाईड कॅडेट्स या जांबोरीत सहभागी झाले होते. तसेच श्रीलंका, मालदीव, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात व सौदी अरेबिया या देशांचे प्रतिनिधीही या आंतरराष्ट्रीय सोहळ्यास उपस्थित होते.विद्यालयाच्या स्काऊट गाईड कॅडेट्सनी कॅम्प क्राफ्ट, शेकोटी सादरीकरण, शोभायात्रा, नाईट हाईक, इथनिक फॅशन शो, संचलन, बँड पथक,स्किलोरामा,पायोनियरिंग प्रकल्प, कलर पार्टी, फूड प्लाझा, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीज, स्टेट गेट कॉम्पिटिशन व फिजिकल डिस्प्ले अशा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत घवघवीत यश प्राप्त केले. महाराष्ट्राच्या लोकधारेचा दारुण विजय – राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक या संपूर्ण जांबोरीतील सर्वात मोठा, अभिमानास्पद व ऐतिहासिक क्षण म्हणजे ग्रँड कॅम्प फायर (Grand Camp Fire) या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला. हा नृत्यप्रयोग शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवड येथील शिक्षिका(स्काऊट मास्टर) शितल श्रीराम बोरुडे मॅडम यांनी महाराष्ट्राच्या लोकधारेवर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासावर आधारित संकल्पना मांडून बसवला होता. या कलाकृतीचे संपूर्ण नृत्य दिग्दर्शन, संकल्पना व सादरीकरणाचे नियोजन त्यांनी केले होते. महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, शौर्य, परंपरा आणि पराक्रमाचे प्रभावी दर्शन घडवणाऱ्या या नृत्यसादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले आणि या सादरीकरणाला राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला. हा गौरव केवळ शाळेसाठी न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला मिळालेली मानाची पावती ठरला आहे.राष्ट्रपतींना दिली सलामी – शिरपेचात मानाचा तुरा! शाळेसाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे विद्यालयाच्या स्काऊट–गाईड कॅडेट्सनी राष्ट्रपतींना उत्कृष्ट संचलन करत सलामी दिली. राज्यपालांच्या स्वागतासाठी तसेच समारोप प्रसंगी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत कॅडेट्सनी दिलेली ही सलामी अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरली. या पथकाचे नेतृत्व स्काऊट मास्टर शितल श्रीराम बोरुडे मॅडम आणि गाईड कॅप्टन मिलन जाधव मॅडम यांनी केले. ‘AI सिटी ’ एक्झिबिशनने वाढवली वैज्ञानिक दृष्टी,विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी कॅम्प परिसरात उभारण्यात आलेल्या ‘AI सिटी’ मधून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच भारतीय हवाई दलाच्या ‘एअर अग्निवीर एक्झिबिशन’ द्वारे युद्धभूमीतील विविध शस्त्रास्त्रे, विमाने आणि सुरक्षा प्रणालींबद्दल प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशरक्षणाबद्दल जाणीव, अभिमान व प्रेरणा अधिक दृढ झाली. त्याचप्रमाणे सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये दहा वाढवून मिळणार आहे.या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य रेणुका सिंग मर्चंट मॅडम, उपप्राचार्य सुषमा रासकर मॅडम, जुनियर कॉलेज इनचार्ज उज्वला जगताप मॅडम, प्रीप्रायमरी इन्चार्ज स्वाती जगताप मॅडम तसेच जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत सर यांनी सर्व यशस्वी कॅडेट्स व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवडच्या शिरपेचात आणखी एक सुवर्णतुरा रोवला गेला आहे. लखनऊ येथे गाजले सासवड… गाजला महाराष्ट्राचा अभिमान… आणि पुन्हा एकदा सिद्ध झाले – “शिवाजी स्कूलचे गाईड–स्काऊट  राष्ट्राचा अभिमान!”
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 3,800 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक    मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                              पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.3 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3,800 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 3,800 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,600 तर सरासरी 3,200हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,700 तर सरासरी 3,000 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले,सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निला खे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, गुळाला 4,300रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 450 बॉक्स 90 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,300 कमाल दर 3,800रुपये तर साधारण4,100 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 2,600,3,800,3,200. बाजरी 2,500,3,300, 2,900. गहू 2,700,3,300,3,000. तांदूळ - -4,500,5,500,5,000 -हरभरा 5,000, 5,400,7,725.
पुरंदर तालुक्यातील सासवड मधील वृत्तपत्रे विक्रेते शकिल सिकंदर बागवान स्वावलंबन सिद्ध                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सासवड येथील वृत्तपत्र विक्रेते शकिल सिकंदर बागवान वय 46 वर्ष यांची जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाची कहाणी नक्कीच प्रेरणादायक आहे, जन्मजात पोलिओ ग्रस्त असलेला पाय आणि त्यातच अपघातात त्यांचा पायात रोड बसलेला असतानाही, गेल्या 19 वर्षापासून त्यांनी सासवड मध्ये वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय यशस्वीपणे जपलेला आहे, बागवान यांनी केवळ स्वतःच्या पायावर उभे राहून ,स्वावलंबन सिद्ध केले नाही, तर समाजासाठी आदर्श ही उभा केला आहे ,शकील बागवान यांचा बालपणीचा काळ अत्यंत, आव्हानात्मक होता, वयाच्या बारा वर्षापर्यंत त्यांना चालता येत नव्हते, त्याची आई त्यांना दर महिन्याला पुण्यातील कमान हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी एस टी बस ने घेऊन जायची तर वडील रोज संध्याकाळी त्यांना कडेवर घेऊन गावात फिरून आणायचे, या अथक प्रयत्नातून त्यांना पांगुळ गाड्यांच्या मदतीने चालायला जमले, वृत्तपत्र विक्रीतून स्थिरस्थावर अपंगत्वामुळे त्यांना कुठेही काम मिळत नव्हते, कुटुंबाची गरज भागवण्यासाठी त्यांनी येवलेवाडी फूट सॅलिट कंपनीत वर्षभर काम केले ,मात्र तेथे पाण्यातून पाय घसरण्याची भीती असल्याने, ते काम सोडून सासवडला परतले, आणि वृत्तपत्र विक्रीला सुरुवात त्यांनी केली, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते शिवाजी कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा व्यवसाय सुरू केला, गेली 19 वर्ष ते हा व्यवसाय सांभाळत आहेत, स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यावर सुरुवातीला आठ महिने त्यांनी पायी जाऊन, घरोघरी वृत्तपत्रे टाकली ,शारीरिक मर्यादा असतानाही त्यांनी काम सोडले नाही ,त्यांच्या या जिद्दीची दखल घेत माजी आमदार संजय जगताप आणि राजवर्धिनी जगताप यांच्या माध्यमातून ग्रामीण सं स्थेतर्फे त्यांना दिव्यांग यासाठीची मोटार मोफत मिळाली आणि हाच त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरला, तसेच अजून त्यांचे घराच्या स्वरूपातून एक काम त्यांचे स्वप्नातले राहिलेले आहे, ते काम पूर्ण करण्याकरता एक पत्रकार पुरंदर तालुक्यातील त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे यांच्या माध्यमातून घराची कुळ कायद्याचे काम हे आपले 100% पत्रकार पूर्ण करेल, असा विश्वास स्वत :शकिल सिकंदर बागवान यांनी व्यक्त केला.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी या ठिकाणी 12,333 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला; तर नगर परिषदेसाठी झाले 78.06 टक्के मतदान                                                 जेजुरी प्रतिनिधी: मयूर कुदळे                                       जेजुरी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी दि. 2 रोजी मतदान झाले, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 20 केंद्रावर 78.06% मतदान झाले, शांततेत मतदानाची परंपरा मतदारांनी चालू ठेवली, मागील निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळी मताची टक्केवारी कमी झाली असून, एकूण 12,333 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जेजुरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकूण मतदान 25,800 होते यापैकी 12,333 एवढे मतदान झाले,महिला मतदान 8,215पैकी मतदारानी 6,436 आणि पुरुष 7,583 मतदारापैकी 5,895 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 86 टक्के मतदान झाले होते, यंदा ही टक्केवारी घसरली आहे, तृतीय पंथी दोन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग दोन मधील एकमधील शासकीय तांत्रिक विद्यालयात सर्वात जास्त 84.05% मतदान नोंदले गेले, नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत असून, तर नगरसेवक पदासाठी काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढत होत आहे. मागील निवडणुकीमध्ये ८६ टक्के मतदान झाले होते, तर यावेळी निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली असून, मयत अथवा बाहेर गावच्या मतदारांची अनु स्थितीमुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याची बोलले जात आहे. दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या, सायंकाळी मतदान वेळ संपेपर्यंत रांगा लावून मतदान करीत होते, निवडणूक निरीक्षक आरती भोसले व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केंद्रांना भेटी दिल्या, शांततेत मतदानाची परंपरा जेजुरी करांनी यावेळी कायम ठेवली, मतदारांना प्रभावित करण्यासाठी 'अर्थकारण' झाल्याची चर्चा अनेक ठिकाणी सुरू होती, भाव ठरवून मतदारांना आकर्षित केले जात होते, त्यामुळे मोठी आर्थिक,उलाढाल झाल्याचेही चर्चा ऐकायला मिळत आहेत, साधारणपणे सायंकाळी 78.06% मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शितल मुळे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चेतन कोंडे यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेसाठी 22,557 मतदारांनी बजावला हक्क; नगर परिषदेसाठी झाले मतदान 67.2% तर सासवड शहरामध्ये उत्साहात व शांततेत मतदान                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासह, 20 नगरसेवकांच्या जागांसाठी मंगळवारी दि. 2 रोजी मतदान पार पडले. यावेळी शहरातील सकाळी मतदानास सुरुवात झाली असताना, 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये पुरुष मतदान 4,523 महिला 3,654 एकूण 8,177 टक्केवारी 24.29%.  7:30 ते 1:30 पुरुष मतदान 6, 861 महिला 6,562 एकूण 13,423 टक्केवारी 39.88%. 7:30 ते 3:30 पुरुष मतदान 9,215 महिला 9,053 एकूण 18, 268 टक्केवारी 54.27%  7:30 ते  5:30 पुरुष मतदान 11,412 महिला 11,145 एकूण 22, 557 टक्केवारी 67.2% टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सतिश थेटे यांनी दिली. सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 16,818 पुरुष तर 16,838 महिला असे असून एकूण 33 हजार 656 मतदार असल्याने, एकूण 22 हजार 557 मतदारांनी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी ही माहिती दिली. सासवड नगराध्यक्ष पदासाठी आनंदी (काकी) चंदुकाका जगताप (भाजप) सचिन सुरेश भोंगळे शिवसेना (शिंदे गट) अभिजीत मधुकर जगताप महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट आणि निकिता राजेंद्र धोत्रे अपक्ष हे चार उमेदवार रिंगणात आहेत, तर प्रामुख्याने भाजप विरुद्ध शिवसेना( शिंदे गट )यांच्यातच मुख्य लढत होणार आहे, तर नगरसेवकाच्या 20 जागांसाठी भाजप शिवसेना व अपक्षासह 47 उमेदवार रिंगणात आहेत, यामध्ये मुख्य भाजप आणि शिवसेना शिंदे गटातच खरी लढत होणार आहे, एकूण 11 प्रभागांमध्ये मतदान झाले आहे, प्रभाग चार ब ची निवडणूक बिनविरोध झाली आहे, अस्मिता सुहास जगताप यांची नगरसेविका म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे, तर प्रभाग क्रमांक 11 अ न्यायप्रविष्ट असल्याकारणाने, हेमलता मिलिंद इनाम के या उमेदवारांची न्यायप्रविष्ट स्थिती असल्यामुळे, २० डिसेंबर रोजी निवडणूक लागण्याची सासवड नगर परिषदेची शक्यता आहे. वृद्ध, दिव्यांग आणि प्रथमच मतदान करणाऱ्या नवोदित मतदारांची उपस्थिती प्रशासनीय होती, या मतदारांची गुलाबपुष्प देऊन, स्वागत करण्यात आले दिव्यांग आणि वृद्धासाठी रिक्षा तसेच मतदान केंद्रावर सोयी साठी सेवकांची व्यवस्था ही केली होती, मतदान केंद्रावर चहा, नाश्त्याची आणि सावलीची, ही मांडवाची व्यवस्था करण्यात आलेली होती, प्रत्येक ठिकाणी केंद्राच्या आवारामध्ये कुठेही गर्दी किंवा बेशिस्तपणा जाणवलेला नाही,; सासवडमध्ये कोणताही केंद्र संविधीनशील नसतानाही एक उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, 110 पोलीस शिपाई व होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे एक युनिट, सहा पथके तैनात होती, बहुतेक केंद्रावर सीसीटीव्हीची ही व्यवस्था होती, दरम्यान वाघीरे हायस्कूल मध्ये मतदान अपूर्वीच बिघाड झालेली यंत्र ताबडतोब बदलण्यात आले, आधी कर्तव्य, मग चढला बहुल्यावर लग्नाच्या तिथी मुळे अनेक लग्न सोहळे असल्याने, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घाई केली होती, तर नवरदेव केदार संभाजी जगताप यांनी सकाळी लवकर आपला मतदानाचा हक्क बजावला, परंतु सासवड नगरपरिषद निवडणुकीमध्ये नियोजनाचा अभाव, शिक्षक, कर्मचारी वर्गामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचारी यांच्यात नियोजनावरून, बाचाबाची, निवडणूक साहित्य जमा करून घेणे व कर्मचारी मानधन वाट पाहत निवडणूक अधिकारी यांचा भोंगळ कारभार, सासवड नगर परिषदेमध्ये दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये उन्हाचे प्रमाण कमी होत असल्याकारणाने मतदार हा सासवडमधील मोठ्या प्रमाणात संख्येने घराबाहेर आली व मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सासवड नगरपरिषद ही काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता ,परंतु काही काळामध्ये काँग्रेस मधून भाजपमध्ये दाखल झालेले संजय जगताप व शिवसेनेचे विद्यमान (शिंदे गटाचे) आमदार विजय शिवतारे यांच्यातच मुख्य लढत सासवड नगर परिषदेमध्ये दिसत आहे, याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्सुकता शिगेला पोचलेली आहे निवडणूक प्रक्रिया संदर्भात नक्की कोण बाजी मारणार हे 21 डिसेंबर रोजी रविवार या दिवशी चित्र सपष्ट होईल.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेमध्ये 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते 3:30  या वेळेमध्ये मतदान 54.27%                                                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                 पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेमध्ये आज 2 डिसेंबर रोजी मतदानास सुरुवात झाली असताना, सकाळी 7:30 ते 3:30 या वेळेमध्ये पुरुष 9,215 महिला 9,053एकूण 18,268 तर टक्केवारी 54.27% सासवड नगरपरिषद मध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होत असून, त्यामध्ये प्रामुख्याने भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) यांच्यातच मुख्य लढत होत आहे, प्रभाग 1 ते 11 मध्ये मतदान केंद्र 36 असून, लोकसंख्या एकूण 33 हजार 656 आहे, तर पुरुष 16, 818 तर महिला 16, 838 आहेत, यासाठी 20 नगरसेवक / नगरसेविका यांच्यासाठी मतदान पार पडत आहे, यामध्ये 11 पुरुष उमेदवार व महिला उमेदवार 09 यासाठी सकाळी 7:30 ते 3:30 या वेळेमध्ये पुरुष मतदान 9, 215 महिला 9,053एकूण 18,268 तर टक्केवारी 54.27% यामध्ये खरी लढत ही भाजप व शिवसेना( शिदे गट)यांच्यातच लढत होत आहे,तर प्रामुख्याने प्रभाग चार ब मध्ये भाजपच्या स्मिता सुहास जगताप यांची नगरसेविका म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे, तर प्रभाग 11 अ मध्ये हेमलता मिलिंद इनाम के यांचा निर्णय प्रलंबित असल्यामुळे, त्यांची निवडणूक ही 20 डिसेंबर रोजी पार पडत आहे, या सर्व प्रक्रियेचा सासवड नगरपरिषदेचा निकाल हा 21 डिसेंबर रोजी लागणार आहे, अशी सविस्तर माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे.
संविधान दिनानिमित्त पुरंदर तालुक्यातील माध्यमिक शाळांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकांची भेट                       सासवड  पतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                           भारतीय संविधान दिन,याच पवित्र दिनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव आणि पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उरसळ यांचा वाढदिवस अत्यंत अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला.भारतीय लोकशाहीची मुलतत्त्वे, नागरिकत्वाचे मूल्य आणि संविधानिक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे यांच्या वतीने व गुरुकुल करिअर अकादमीचे संस्थापक अध्यक्ष संदीप टिळेकर यांच्या सौजन्याने पुरंदर तालुक्यातील माध्यमिक शाळांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकांची भेट देण्यात आली.उद्देशिका म्हणजे भारतीय संविधानाचा हृदयस्पंदन.स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या चार आधारभूत मूल्यांची ओळख शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.सतीश उरसळ यांच्या मतानुसार“संविधान समजून घेणारी पिढी घडली, तर समाजात लोकशाहीची मुळे अधिक दृढ होतील.”या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित नंदकुमार सागर सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सतीशराव उरसळ याना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने शुभेच्छा देऊन “विद्यार्थ्यांना संविधानाची उद्देशिका देणे म्हणजे त्यांना जबाबदार नागरिकत्वाची पहिली गुरुकिल्ली देणे होय. हे पवित्र कार्य वाढदिवस आणि संविधान दिन या दोन महत्त्वपूर्ण दिवसांच्या संगमाने अधिक अर्थपूर्ण झाले आहे.”त्यांनी शिक्षणातील मूल्यांचे महत्त्व, शिक्षकांची भूमिका आणि संविधानिक विचारांच्या प्रसाराचे महत्व अधोरेखित केले.या प्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाणे,सेकंडरी सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते वसंतराव ताकवले,शिक्षक लोकशाही आघाडीचे तानाजी झेंडे,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामप्रभु पेटकर,शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष शिवहार लहाने,माजी तालुकाध्यक्ष प्रल्हाद कारकर,सेवानिवृत्त संघटनेचे दिलीप पापळ,मुख्याध्यापक प्रदीप दुर्गाडे,कमलाकर कापडने,सुरवसे सर,चौरंगनाथ कामथे,हिरामन सहारे,अर्जुन शेंडगे तसेच पुरंदर तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.सतीश उरसळ यांना प्राप्त असलेला शिक्षणक्षेत्रातील मान आणि सर्वांनी व्यक्त केलेले कौतुक यामुळे कार्यक्रम अधिक ऊर्जित झाला.पुरंदर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिका भेट स्वरूपात देण्यात आल्या.शाळांच्या ग्रंथालयात, सभागृहात तसेच विद्यार्थ्यांच्या हातात या उद्देशिका पोहोचवल्या गेल्या.शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की, विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये समजावून सांगताना या उद्देशिका एक महत्त्वाचा संदर्भ स्रोत ठरणार आहेत.सतीश उरसळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुरंदर तालुक्यात राबविण्यात आलेला हा उपक्रम हा केवळ कार्यक्रम नव्हता, तर संविधानाच्या मूल्यांची पेरणी, लोकशाहीची जागरूकता आणि जबाबदार नागरिक घडविण्याची सुरूवात होती.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग 11 एकूण मतदान केंद्र 36 सासवडची लोकसंख्या 33 हजार 656 पुरुष 16818 तर महिला 16838                                                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड ता. पुरंदर येथील सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रभाग संख्या 11 असून, एकूण मतदान केंद्र 36 आहेत ,तर सासवडची एकूण लोकसंख्या 33 हजार 656 असून, पुरुष 16,818 तर महिला 16,838 प्रभाग क्रमांक एक एक /एक मध्ये वाघीरे कॉलेज पूर्वेकडील इमारत जी 02 एक/ दोन वाघीरे कॉलेज पूर्वेकडील इमारत जी 27 एक /तीन वाघीरे कॉलेज पूर्वेकडील इमारत जी 30 एकूण मतदान केंद्र तीन असून, पुरुष मतदान 1,618 महिला 1,4 29 एकूण 3,057 प्रभाग क्रमांक दोन केंद्र क्रमांक दोन /एक पुरंदर हायस्कूल खोली दक्षिणेकडून खोली क्रमांक 09 दोन /दोन पुरंदर हायस्कूल खोली दक्षिणेकडून खोली क्रमांक 12 एकूण मतदान केंद्र दोन पुरुष 1,009 महिला 9,28 एकूण 1,937 प्रभाग क्रमांक तीन तीन /एक पुरंदर हायस्कूल खोली, दक्षिणेकडून खोली क्रमांक 13. 3 /2 पुरंदर हायस्कूल खोली दक्षिणेकडून खोली क्रमांक 14 तीन/ तीन पुरंदर हायस्कूल खोली दक्षिणेकडून खोली क्रमांक 16 एकूण मतदान केंद्र तीन पुरुष 1,138 महिला 1,167 एकूण 2,305 प्रभाग क्रमांक चार चार /एक ताटेवाडी येथील नगरपालिका शाळा दक्षिणेकडील खोली क्रमांक01. चार /दोन नगरपालिका वीर बाजी पासलकर शाळा जुनी इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक 02. चार /तीन नगरपालिका वीर बाजी पासलकर शाळा नवीन इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक 02. चार /चार नगरपालिका वीर बाजी पासलकर शाळा नवीन इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक 04. एकूण मतदान केंद्र चार पुरुष 1,827 महिला 1,807 एकूण 3,6 34 .पाच पाच /एक नगरपालिका सावित्रीबाई फुले शाळा दक्षिणेकडून खोली क्रमांक 02. पाच /दोन नगरपालिका सावित्रीबाई फुले शाळा पूर्वेकडून खोली क्रमांक 02. पाच/ तीन नगरपालिका सावित्रीबाई फुले शाळा दक्षिणेकडील खोली क्रमांक 05.पाच /चार नगरपालिका सावित्रीबाई फुले शाळा दक्षिणेकडील खोली क्रमांक 01. एकूण मतदान केंद्र चार पुरुष 1,919 महिला 2,045 एकूण 3,964 .प्रभाग क्रमांक सहा केंद्र सहा /एक नगरपालिका शिवाजी विद्यालय दक्षिणेकडून खोली क्रमांक 04. सहा /दोन नगरपालिका शिवाजी विद्यालय दक्षिणेकडून खोली क्रमांक 01 .सहा /तीन नगरपालिका इंदिरा विद्यालय दक्षिणेकडून खोली क्रमांक 03.सहा/ चार नगरपालिका इंदिरा विद्यालय दक्षिणेकडून खोली क्रमांक05. एकूण मतदान केंद्र चार पुरुष 1,700 महिला 1,725 एकूण 3,425 .प्रभाग क्रमांक सात सात/ एक वाघिरे हायस्कूल मुख्य इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक 01. सात/ दोन वाघीरे हायस्कूल मुख्य इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक 02. सात/ तीन यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन कुंजीर वाडा. सात /चार अंगणवाडीइमारत पश्चिमेकडील खोली क्रमांक 03. आठ /दोन वाघीरे हायस्कूल मुख्य इमारत पश्चिमेकडील खोली क्रमांक 04. आठ /तीन वाघीरे हायस्कूल मुख्य इमारत पश्चिमेकडील खोली क्रमांक 05. एकूण मतदान केंद्र तीन पुरुष 1,512 महिला 1,488 एकूण 3,000 .प्रभाग क्रमांक नऊ केंद्र क्रमांक 9/1 साबळे फार्मसी कॉलेज सेमिनार हॉल पश्चिमेकडील खोली क्रमांक02. रिटर्न फ्लोर नऊ /दोन पुरंदर मेडिकल असोशियन पश्चिमेकडील हॉल एकूण मतदान केंद्र दोन पुरुष 1,021 महिला 1,032 एकूण 2,053 प्रभाग क्रमांक दहा दहा /एक नगरपालिका संत नामदेव विद्यालय पूर्वेकडील इमारत खोली क्रमांक 01. दहा /दोन नगरपालिका संत नामदेव विद्यालय दक्षिणेकडील इमारत खोली क्रमांक 03 दहा /तीन नगरपालिका विरंगुळा केंद्र दक्षिण भागातील हॉल एकूण मतदान केंद्र तीन पुरुष 1,539 महिला 1,535 एकूण 3,074 प्रभाग क्रमांकप्रभाग क्रमांक 11 केंद्र क्रमांक अकरा/ एक नगरपालिका संत नामदेव विद्यालय दक्षिणेकडील खोली क्रमांक 05. अकरा /दोन नगरपालिका संत नामदेव विद्यालय दक्षिणेकडील खोली क्रमांक 06.अकरा/ तीन आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन पश्चिमेकडील दक्षिण भागातील वरंडा .अकरा/ चार कन्या शाळा दक्षिणेकडील खोली क्रमांक 01.पुरुष 1,719 महिला 1,732 एकूण 3,451 हा सर्व आराखडा निवडणूक निर्णय अधिकारी सतिश थेटे व निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक डॉक्टर कैलास चव्हाण यांनी तसेच मतदान हे उद्या सकाळी साधारणपणे मंगळवारी या दिवशी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार असल्याचे सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
Load More That is All