Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from September, 2025Show All
श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथांच्या भक्त भेटीचा उत्सव (महाष्टमी)     सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                क्षेत्र वीर येथे नवरात्र उत्सवानिमित्त अष्टमीचे औचित्य साधून श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई जोगेश्वरी यांच्या मूर्तींना रिठ्याच्या पानाचे अलंकार घालीत पूजा करण्यात आली.दुपारी १२ वाजता देवाच्या पालखीच्या वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्यांसह सर्व भाविक भक्त, दागीनदार, ग्रामस्थ यांच्या लवाजम्यासह श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची पालखी भक्त कमळाजी भेटीला माळावर गेली. श्रीनाथांची पालखी काठ्या ढोल नगाराच्या आवाजात भक्त कमळाची मंदिर येथे भेटा-भेट झाली. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर हे आपल्या परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवत आलेले आहे. यामुळे सर्व विधी व नवरात्रोत्सवातील चालीरीती, प्रथा, परंपरा अविरत चालाव्यात यासाठी विश्वस्त मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे देवस्थान ट्रस्टमार्फत सांगण्यात आले. मंगळवार पहाटपूजा होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला सकाळी ६ वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. आज श्रीनाथ व आई जोगेश्वरी यांना रीठ्याच्या पानाची अलंकार व पूजा घातल्यामुळे श्रीनाथांचे रूप उजळून आले होते. फुलामाळी यांनी रिठ्याच्या पानाची व्यवस्था केली होती. सोनार दिक्षित परिवार, गुरव मंडळींनी अलंकार सजवला. सायंकाळी नेताजीआबा धुमाळ (वाडकर) यांचेमार्फत मानाचा साडी वाटपाचा कार्यक्रम होतो. अनेक रिवाज हे पूर्वापार चालत आले असून पुढेही चालवले जात आहेत.     दुपारी १२ वाजता धुपारती होऊन फुलांनी सजलेल्या पालखीत श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचे उत्सव मूर्ती पालखीत ठेवून पालखीची छबिण्यासह एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून, पालखी भक्त भेटीसाठी कमळाजी मंदिर माळावर गेली होती. देऊळवाड्यातून पालखी बाहेर जतन पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.  यावेळी वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्याच्या फुलासह, रंगीबेरंगी, फुगे, बांधून सजावट केलेल्या काठ्या, पालखी पुढे उपस्थित होत्या.  गुलालाची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात देवाचा छबिना भरला होतानवरात्र उत्सव ८ वी माळ महाष्टमी उपवास यानिमित्त श्रीनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट  करण्यात आली होती. सजावटकार “श्रीनाथ फ्लॉवर डेकोरेटर्स” वीर शुभम कुदळे. विश्वस्त मंडळामार्फत भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, दर्शनबारी, ज्यादा होमगार्ड, स्वयंसेवक मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई (योगदान नाना वाघ, कैलास औसक व बडधे) यांच्याकडून करण्यात आली होती.यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ, उपाध्यक्ष अमोल आ. धुमाळ,सचिव काशिनाथ धुमाळ, विश्वस्त सुनील धुमाळ ,विराज मोहनराव धुमाळ , अमोल धोंडीबा धुमाळ ,बाळासो समगीर, श्रीकांत थिटे, प्रमिला देशमुख, जयवंत सोनवणे उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे व भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांचे कार्य कौतुकास्पद               सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उपविभागीय अधिकारी पुरंदर यांनी कामाचा सपाटा लावला आहे, पुरंदर तालुक्यात अनेक प्रकारचे प्रकल्प राबवताना प्रशासनाला सोबत घेत वाघिणीसारख्या काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी (प्रांत) वर्षा लांडगे व भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड पुरंदर तालुक्यात आल्यानंतर त्या तालुक्यांची प्रशासकीय सेवा बजावत आहे, ती प्रशासकीय अधिकाऱ्यातील कर्तव्यदक्षता व जनसामान्य प्रति माणुसकी यांचा सुरेख मेळ घालणारी अशीच आहे, पुरंदर मध्ये आल्यानंतर नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे पूर्ण करणे, शासनाला माहिती पुरविणे, नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई वाटप करणे, अशी महत्त्वाची कामे त्यांनी केलेली आहेत, स्वतःच्या जीवाची परवा न करता, त्या प्रशासकीय सेवा बजावताना कुठेही कमी पडताना दिसत नाहीत, गावोगावी उद्भवणाऱ्या समस्या सोडवणे, शासनाच्या माध्यमातून सेवा देणे, इत्यादी कामे अतिशय नियोजन बद्दल रित्या पार पाडत आहेत, विमानतळा सारख्या प्रकल्प राबविताना त्यांच्या सेवेतील अनुभवाची शिदोरी खऱ्या अर्थाने कामाला येताना दिसत आहे. हे सर्व करताना त्यांच्या नेतृत्वाखानाची झलक पहावयास मिळते, अनेक गोष्टीत उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे व भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद  आहे.  त्यांच्या नियंत्रणाखाली पुरंदर प्रशासन चांगले काम करत आहे, पुरंदर मध्ये प्रकल्प राबविताना आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, डीवायएसपी, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, नगरपालिका विभाग, आजी-माजी पदाधिकारी आदींचे सहकार्य त्यांना मिळत आहे, एक अधिकारी असून, पण सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्या तळमळीने काम करीत आहेत, प्रशासकीय सेवेतील कर्तव्य, अध्यक्ष, योद्धा म्हणून उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहेच.
पुरंदर मिल्कची रोप्य महोत्सवी वार्षिक सभा शेतकऱ्यांनी नव्या योजनाची घोषणा                                            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी गेल्या पंचवीस वर्षापासून दुधाला योग्य भाव देणारी आणि सातत्याने दूध संकलन करणारी एकमेव संस्था म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पुरंदर मिल्क अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड खलदची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्यात उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि माजी आमदार संजय जगताप यांनी संस्थेच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वकांक्षी योजना जाहीर केल्या. यावेळी दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले या संस्थेने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवला आहे. सभेला संस्थेचे अनेक सभासद उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना संजय जगताप यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली, ते म्हणाले पुरंदर मिल्कचे आजपर्यंत एकही दिवस दूध संकलन बंद ठेवले नाही, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, चंदूकाकांनी घालून दिलेल्या आर्थिक शिस्तीमुळेच हे शक्य झाले आहे, संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना जगताप यांनी सांगितले की, सध्या पाच हजार आठशे मीटर क्षमतेच्या असलेल्या इग्लू कोल्ड स्टोरेज ची क्षमता आणखी तीन हजार मीटरिंग टन ने वाढवण्यात येणार आहे, तसेच दूध प्रक्रिया केंद्राचेही विस्तारीकरण केले जाणार आहे, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी लवकरच फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी केली, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक चांगला बाजार मिळेल दरवर्षीप्रमाणे सभासदांना लाभांश म्हणून एक किलो तूप वाटप सुरू करण्यात आले आहे, याची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे ,तसेच गवळ्यांना एकूण 18 लाखांचा बोनस देण्यात आला आहे, या उपक्रमाचा शुभारंभ संजय जगताप ,यांच्या सहसंचालिका राजवर्धिनी जगताप, संत सोपान काका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमनिकलाल कोठडीया आणि इतर संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आला. यावर्षी संस्थेने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून तसेच पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेच्या माध्यमातून एकूण 50 कोटी 64 लाख 81 हजार रुपयांचा व्यवसाय केला आहे, संस्थेचे भाग भांडवल पाच कोटी दहा लाख रुपये असून, राखीव निधी 18 कोटी 66 लाखांचा आहे, यंदा संस्थेला सहा लाख 52 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र मांढरे यांनी सांगितले की, इग्लू कोल्ड स्टोरेज मध्ये विविध फळे, फुले, धान्य आणि पल्प नियंत्रित तापमानात साठवता येतात, ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो, संचालक विठ्ठल मोकाशी यांनी प्रास्ताविक केले, या बैठकीला संचालक प्रदीप पोमण, मोहन जगताप, पांडुरंग कामठे, अविनाश वाघोले, संजय ताकवले, संजय म. जगताप, शंकर कड, चंद्रशेखर जगताप, विलास जगताप, बाळासो बहिरट यांच्यासह कात्रज डेरीचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, सुनिता कोलते, संभाजी काळाणे,   नीरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, संचालक देविदास कामठे, मनीषा नाझीरकर, हरिभाऊ फुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य नंदकुमार सागर आणि पुरंदर नागरी चे सर व्यवस्थापक अनिल उरवणे यांनी सूत्रसंचालन केले. कंपनी सेक्रेटरी संतोष जगताप यांनी अहवालाचे वाचन केले. रणजिती जगताप, येशू जाधव, शरद कामठे, वर्षा तावरे ,तुषार खळदकर, प्रतिमा सूर्यवंशी, आदि कर्मचाऱ्यांनी नियोजन केले. संचालक प्रदीप पोमण यांनी सभासदांना 30 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत खळद येथील डेअरी मध्येच तुपाचे वाटप होणार असल्याचे सांगत आभार मानले. यावेळी वार्षिक सभेत संजय जगताप, राजवर्धिनी जगताप आणि संचालक मंडळ आदी उपस्थित होते.
नाझरे कडे पठार ग्रामपंचायतच्या सरपंच पदी अश्विनी रोटे यांची बिनविरोध निवड                                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        नाझरे कडे पठार (ता. पुरंदर )येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी अश्विनी तानाजी रोटे यांची बहुमताने निवड ही पुरंदर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या व राजकारणातील केंद्रबिंदू व शक्तिस्थान मानल्या जाणाऱ्या नाझरे कडे पठार ग्रामपंचायतच्या मनिषा देविदास नाझरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली, माजी सरपंच मनिषा देविदास नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली, तर रोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने, मंडल अधिकारी संजय बडधे, तलाठी संतोष होले, ग्रामसेवक प्रमोद खेडेकर यांनी या संदर्भातील सहकार्य केले. तत्कालीन सरपंच मनिषा देविदास नाझिरकर यांनी सर्वांना संधी मिळावी या उद्देशाने आपला राजीनामा दिला आणि त्यानंतर रोटे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे, त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप व नीरा कृषी उत्पन्न बाजार  समितीचे सभापती संदीप फडतरे यांच्या हस्ते नूतन सरपंच अश्विनी रोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच सुनील खारतोडे, माजी उपसरपंच तात्यासो नाझीरकर ,सदस्य मनिषा मोहन नाझीरकर, छाया जालिंदर वायसे, बाळासो मदने ,अश्विनी खैरे, बाळासो नाझीरकर, राजेंद्र रोटे, आबासो नाझीरकर, संजय रोटे, मोहन गाढवे, तंटामुक्ती जयराम रोटे, दगडू नाझीरकर, राहुल नाझीरकर, आकाश नाझीरकर, पुरुषोत्तम रोटे, शहाजी नाझीरकर, धनंजय रोटे, शशिकांत नाझीरकर, सुदर्शन रोटे, शितल नाझीरकर आदी उपस्थित होते. 1958 साली ग्रामपंचायत स्थापन झाली असून, नागरिक  हा गावचा मूळ इतिहास म्हणजे रोट्यांची हे गाव असून, गावातील पाणी, वीज, रस्ता ,मूलभूत सुविधासाठी माझ्या पदाच्या कार्यकालमध्ये गावातील सर्वांच्या सहकार्यातून, गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचून न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करण्यासाठी त्यांनी एक प्रकारचा संकल्प मांडला असून, सरपंच पदाचा उपयोग त्यासाठी गावच्या सर्वांगीण विकासासाठी करणार असल्याचे नूतन सरपंच अश्विनी तानाजी रोटे यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील झेडेवाडी गावच्या सरपंच पदी अमर झेंडे यांची बिनविरोध निवड                                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीचे सरपंच वंदना शांताराम खटाटे यांनी राजीनामा दिल्यामुळे, रिक्त झालेल्या जागी सरपंच पदी अमर विष्णू झेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, असल्याची निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे यांनी जाहीर केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी गणेश सुतार, ग्रामसेविका एस. पी. नवले यानी काम पाहिले. माजी कृषी व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासो जाधवराव व भाजप नेते बाबाराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी उपसरपंच सोनाली संतोष झेंडे, ग्रामपंचायत सदस्य पूनम संतोष झेंडे, शिवाजी सोपान खटाटे, शरद सदाशिव झेंडे, कौशल्य रामदास झेंडे, हे उपस्थित होते. तर यावेळी दिवे गावचे सरपंच रुपेश राऊत, माजी सरपंच गुलाब झेंडे ,योगेश काळे, अमित झेंडे, शिवसेना नेते राजेंद्र झेंडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष योगेश फडतरे, तात्या सो झेंडे ,बाबुराव गोळे, जिजाबा झेंडे ,शिवाजी झेंडे, संतोष झेंडे, अजित गोळे, मयूर झेंडे, विठ्ठल झेंडे ,समीर झेंडे ,सोमनाथ झेंडे, विकास झेंडे, रमेश झेंडे, चंद्रकांत खटाटे, भाऊसो झेंडे, वडकी गावचे माजी सरपंच उत्तम गायकवाड, महेंद्र चौरे ,सुरेश भोसले, बाळासो साबळे ,पोलीस पाटील सारिका झेंडे, अपेक्षा झेंडे ,शुभम झेंडे आदी उपस्थित होते. तर यावेळी उत्तम गायकवाड, चंद्रकांत खटाटे, माऊली खटाटे, बाबुराव गोळे,कौशल्या झेंडे, रुपेश राऊत, आमित झेंडे ,गुलाब झेंडे ,अजित गोले, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अमर झेंडे यांनी सरपंच पदी निवड जाहीर होताच, गावातील जेष्ठ मंडळी, माजी सरपंच, उपसरपंच सर्वांना सहमतीत घेऊन ,गावचा विकास यापुढे मी माझ्या सरपंच पदाच्या कार्यकालामध्ये करणार असल्याचे, तसेच शासनाच्या असणाऱ्या विविध योजना या तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे नूतन सरपंच अमर झेंडे यांनी सांगितले.तर भव्य मिरवणूक गावांमधून काढण्यात आली, यावेळी दिवे, झेंडेवाडी पंचक्रोशीतील विविध मान्यवर पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित गोळे यांनी केले, सूत्रसंचालन सोमनाथ झेंडे यांनी केले ,तर आभार प्रदर्शन भाऊसो झेंडे यांनी मानले.
पुरंदर तालुक्यातील पुरंदर नागरी पतसंस्थेची सहकारी बँकेकडे वाटचाल :माजी आमदार संजय जगताप                               सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                 सभासदांनी संस्थापक स्वर्गवासी चंदूकाका जगताप यांच्यावर विश्वास ठेवून ,संस्था वाढवल्यामुळे पुरंदर नागरिक सहकारी पतसंस्थेची वाटचाल नागरी सहकारी बँकेकडे सुरू असून, यापुढेही असाच विश्वास ठेवून ,आशीर्वाद द्यावेत असे आव्हान संस्थेच्या अध्यक्षा आनंदी (काकी) जगताप आणि उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी यांच्या वतीने माजी आमदार संजय जगताप यांनी केले आहे. सासवड (ता. पुरंदर )येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची 37सावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दि. 28  रोजी  आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप आणि संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. संस्थापक स्वर्गवासी चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमापूजनाने सभेची सुरुवात झाली, सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा ,तसेच कर्मचारी साधना धेंडे यांचा सेवापुर्ती निमित्त गौरव करण्यात आला. संचालक डॉ. विनायक खाडे यांनी प्रास्ताविक तर सर व्यवस्थापक अनिल उरवणे यांनी अहवाल वाचन केले. दिलीप गिरमे, आनंदा तांबे ,चंद्रशेखर जगताप, नाना भिंताडे, महादेव टिळेकर, राहुल गायकवाड ,हरिभाऊ बाठे आधी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.संस्थेच्या 31 मार्च अखेर संस्थेच्या 13 शाखा 14,347 सभासद ,348 कोटी 22 लाखाच्या ठेवी, 25 कोटीच्या अधिकृत भाग भांडवल, 13 कोटी दोन लाखाचा राखीव निधी, 4 कोटी 44 लाखाच्या स्थावर मालमत्ता ,92 कोटी 90 लाखाची गुंतवणूक ,266 कोटी 44 लाख रुपयाचे कर्ज वाटप असून, एक कोटी पाच लाख 88 हजार रुपयांचा निव्वळ नफा झालेला आहे. सतत ऑडिट वर्ग  "अ"असून यंदाही संस्थेने सभासदांना 10% लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले. यावेळी रमणिकलाल  कोठडीया, संदीप फडतरे ,मंगेश घोणे, एडवोकेट युवराज वारघडे, नंदकुमार जगताप, संचालक अंकुश जगताप ,राजेश इंदलकर, युगंधरा कोंढरे, अनिल कामठे ,बाबासाहेब चौंडकर, चंद्रकांत बोरकर, परशुराम तांबे ,सूर्यकांत कांबळे, अमोल सातभाई ,अडवोकेट किशोर मस्के, पोपटराव सोनवणे, कल्याण जेधे, सुनील खोपडे ,नंदकुमार निरगुडे, घनश्याम तांबे, व्यवस्थापक सतीश शिंदे ,हरिभाऊ शिंदे आदी उपस्थित होते .नंदकुमार सागर यांनी सूत्रसंचालन केले. तर संचालक आनंदराव घोरपडे यांनी आभार मानले.
पुरंदर तालुक्यातील सासवड सोनोरी रस्त्यासाठी शेतकरी आक्रमक                                                                सासवड प्रतिनिधी:   बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      सासवड ते सोनोरी या सुमारे पाच किलोमीटरच्या रस्त्याची ठिक ठिकाणी खड्डे पडल्याने, चाळण झालेली आहे, या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने, रस्त्यावर डबकी तयार झालेली आहेत, वारंवार मागणी करूनही, रस्त्याची कामाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, यामुळे आक्रमक झालेल्या परिसरातील नागरिकांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे, या रस्त्यावरील खड्ड्यामुळे सोनोरी गावातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार व दूध उत्पादकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक दुचाकी स्वरांचा अपघात झालेला आहे, तसेच अर्धवट कामामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने, शेतकऱ्यांना दुचाकी वर शेतमाल नेताना मोठी कसरत करावी लागत आहे, या खड्ड्यामुळे सोनोरी रस्त्यावर अपघाताची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे या रस्त्याबाबत प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली दिली आहेत, परंतु या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवलेली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे .त्यामुळे पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात विविध मागण्यासाठी शुक्रवार दि. 3 ऑक्टोंबर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे, याबाबत नागरिकांनी असा निर्णय घेतलेला आहे. याबाबत तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देण्यात आले आहे .यावेळी सोनोरीचे माजी सरपंच भारत मोरे ,नितीन काळे, संतोष काळे ,तंटामुक्तीचे समितीचे अध्यक्ष दिपक झेंडे, मयूर काळे आदी उपस्थित होते.
युवा क्रांती पुणे टीमच्या वतीने सासवड येथे विविध कार्यक्रचे आयोजन                                                                                                                                                                                       सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राइम न्युज:                                                                      सासवड पोलीस स्टेशनला भेट देण्यात आली,त्यावेली ऋषिकेश अधिकारी  पोलीस निरीक्षक  यांना युवा क्रांती संघटनेची वतीने  तसेच "सर्वसान्यांसाठी कायद्याची ओळख " याबाबत हिती देण्यात आली. त्यांनी सुद्धा हिती अधिकारावर आम्हालाही लेक्चर द्यावे अशी गणी केली. त्याचप्रणे  गरजेप्रणे मनुष्यबळ लागल्यास तुम्हाला संपर्क करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यांच्यामार्फतच  पोलीस स्टेशनमध्ये  आयडी वाटप कार्यक्रम झाला ,चहापान करून  पिंपळे येथील शाळेकडे रवाना झाले आचार्य प्र.के. अत्रे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना र्गदर्शन देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनीषा काकडे  जिल्हा परिषद सदस्य  तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य, तसेच रागिणी पाटील निलकंठ उद्योग समूह अध्यक्ष या होत्या.त्याच बरोबर मुख्याध्यापिका दळवी मॅडम उपस्थित होते.जाधव सर यांनी उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केले. सर्वांना युवा क्रांतीची हिती शिवाजीराव शेलार महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष यांचे र्फत देण्यात आली.. वसुधा नाईक राष्ट्रीय सल्लागार यांनी मुलासाठी कविता सादर केली याप्रसंगी या शाळेचे जी विद्यार्थी पुरंदर तालुका अध्यक्ष अमित पोमण व रमेश चव्हाण पुणे जिल्हा कार्याध्यक्ष  यांचे र्फत ₹21000/- शाळेला देणगी देण्यात आली. त्याचप्रणे "अव्यक्त भावपत्रे" या पुस्तकाच्या दहा प्रति ग्रंथालयास भेट देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा झाडांची 100 रोपे  शाळेला भेट देण्यात आली.यानंतर पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पा अर्पण करून, नवंदना देण्यात आली. तेथील प्रदर्शन पाहून परत निघालो.सर्वांनी युवा क्रांती विषयी  मनोगत व्यक्त केले. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये युवा क्रांतीचा एक कार्यक्रम घेण्याची सूचना आली. त्यावर विचार विनिमय करण्यात आला. "सदस्य जोडो भियानास" प्रतिसाद देऊन  संघटनेचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रणे पुरंदर मधील  तालुका कार्यकारणी पूर्ण करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.श्रीयुत  अमित पोमन  यांचे कार्यालयात आयडी कार्ड चे  विभागवार वितरण करण्यात आले. पिंपरी चिंचवड परिसरातील कार्ड्स  डॉ. राजेश्वर हेंद्रे यांच्याकडे देण्यात आले. या कार्यक्रस प्रमुख उपस्थिती : डॉ. राजेश्वर हेंद्रे राष्ट्रीय संघटक शिवाजीराव शेलार - म प्र युवा अध्यक्ष सुरेश अप्पा गायकवाड - राष्ट्रीय सह-संघटक वसुधा नाईक  - राष्ट्रीय सल्लागार वैशाली ताई बांगर - राष्ट्रीय र्गदर्शक वर्षाताई नाईक - राष्ट्रीय युवती उपाध्यक्षा दिपालीताई आंब्रे  -किसान विकास महाराष्ट्र उपाध्यक्ष शोभाताई हरगुडे - पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष हर्षलाताई  मुलाणी - पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रतिभा ताई महालकर पुणे जिल्हा अध्यक्षा राजेंद्र पन्हाळे- युवा र्गदर्शक अमित  तांबे - पुणे जिल्हा युवा अध्यक्ष  शहाजी देवकर -पुणे जिल्हा सल्लागार गणेश रासकर - वळ युवा अध्यक्ष मयूर भागवत - पुणे जिल्हा युवा संघटक सुहास तांबे - कार्याध्यक्षविलास रोहिले - शिरूर तालुका कार्याध्यक्षश्रीकांत सर तसेच पुरंदर येथील नवीन सदस्य उपस्थित होते.भाऊसो दत्तात्रय चव्हाण ,सोमनाथ रामदास चव्हाण, मयूर दादासो खोमणे, सदस्य राहुल ज्ञानदेव कामथे,ज्ञानदेव सखाराम झेंडे,पत्रकार आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा चरणी तमाशा कलावंताची पहिली सेवा वीर येथे दोनशे कलावंतांची हजेरी दगडी कासवावर दिवस व रात्री हजेरीचा कार्यक्रम उत्साहात सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या शारदीय नवरात्राचा निमित्त वीर तालुका पुरंदर येथे तमाशा कलावंतांचे सहा तापे आले असून, महाराष्ट्रातील 200 पेक्षा अधिक तमाशा कलावंतांनी हजेरी लावली आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी देवाची चाखरी करायला सुरुवात केली असून, अनेक वर्षापासून ही परंपरा आम्ही जपत आहोत, ज्येष्ठ कलावंत मीरा जावडेकर यांनी सांगितले की, नवरात्र उत्सव देवांची सेवा करून, आशीर्वाद घेऊन वर्षभर आपली कला सादर करून, उपजीविका चालवत असल्याचे, हिराबाई कुडाळकर यांनी सांगितले. नवरात्र उत्सव काळात नऊ दिवस देऊळ वाड्यातील देवांचा छबिना संपल्यावर दगडी कासवावर दिवस व रात्री या हजेरीचा कार्यक्रम सुरू असतो, नवरात्र उत्सवात सकला सादर करणाऱ्या नृत्-यांगनांना तसेच कलाकारांना.गावचे पाटील नेताजी बाबुराव धुमाळ यांच्या वतीने, साडी चोळी व बिदांगी देऊन सन्मानित करण्यात येते, व देवस्थान ट्रस्टच्या वतीने या कलावंतांना शिधा वाटप करण्यात येत असल्याचे, छाया कुडाळकर यांनी सांगितले. देवाला येणारे भाविक दर्शना बरोबरच या कलावंतांच्या कलेला पैसे देऊन, दात देतात वर्षाच्या सुरुवातीला नऊ दिवस वीर येथे मुक्काम करून, श्रीनाथ चरणी आपली कला सादर करतात, देवाने प्रसाद दिल्यावर वर्षभराचे व्यवसायाला बाहेर पडण्याची अशी या कलावंतांची अनेक वर्षांची परंपरा असल्याचे सारिका जावडेकर यांनी सांगितले तर अनेक कलावंत योजनेपासून वंचित जेष्ठ लोक कलावंतांना शासनाच्या वतीने मानधन सुरू आहे, पण अनेक कलावंत योजनेपासून वंचित आहेत, वर्षभर तमाशा कला केंद्र, आर्केस्ट्रा, जागरण, गोंधळ या माध्यमातून आम्ही आपली कला सादर करत असून, यासाठी गावोगावी फिरावे लागते, अशा वेळी मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत असून ,मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्याची मागणी कलावंतांनी केली आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी नवदुर्गांचा पुरस्काराने महिलांचा सन्मान सोहळा                           सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                समाजामध्ये कामाचे मोल, जात, धर्म किंवा पंथाने ठरवलेले जात नसून, त्यासाठी कामावर लोक प्रेम करत असतात, ज्याच्या मागे महिलांचा खंबीर पाठिंबा असतो, त्यांना कोणत्याही कामात अडचण येत नसते असे, गौरवोद्गार परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले, ते सासवड( ता. पुरंदर) येथील स्वर्गवासी एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या नवदुर्गा पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी प्रतिष्ठान आणि अध्यक्ष संतोष जगताप यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत समाजकार्यात सातत्य ठेवावे, यासोबतच मराठवाड्यात पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही करण्यात आले. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सलग चौथ्या वर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना दामले यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराने गौरविण्यात आले. सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे हा सोहळा झाला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे आदी उपस्थित होते. डॉ.दुर्गाडे आणि वढणे यांनी सुद्धा पुरस्कार महिलांचा गौरव करताना त्यांचे कार्याचे कौतुक करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठांच्या कामाचा आढावा घेत उपस्थित त्यांना समाजकार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले .सचिव हेमंत ताकवले यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. अर्चना उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. तर नसरीन अंसारी यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी कुंडलिक मेमाणे, आनंद जगताप, डॉ. राजेश दळवी, विश्वास पानसे, धनंजय जगताप, किरण पुरंदरे, अनिल कदम, संजय जाधव, शरद बोबडे, अशपाक बागवान, संदीप टिळेकर, प्रतिष्ठानचे अंकुश शिवरकर,   ऑफिस  मधील पुजा मेमाणे (शिदे )यासह तालुक्यातील नागरिक आदी उपस्थित होते.
पुरंदर विमानतळाला भूसंपादनासाठी प्रचंड वेग; 70 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण पहिल्याच दिवशी तीन गावातील मोजणी पूर्ण; असून पाच पथकाद्वारे 25 दिवसांमध्ये पुढील काम प्रशासनामुळे करण्याचे आव्हान आहे; कुंभारवळण या ठिकाणच्या शेतकऱ्यांची फक्त जमीन मोजणीला परवानगी तर विमानतळाला सहमती नाही                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी अखेर जमीन मोजणी सुरुवात येथे झाली असून, एकूण सात गावांपैकी पहिल्या दिवशी अर्थात एखतपुर, मुंजवडी, उदाचीवाडी याठिकाणी शुक्रवारी दि. 26 तीन गावातील सुमारे 70% हेक्टर जमीनीची मोजणी झाली असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत माहिती दिली, ही मोजणी करताना शेतकऱ्यांनी सहकार्य करावे ,अशी त्यांनी स्पष्ट केले, 25 दिवसांमध्ये ही मोजणी पूर्ण करण्यास येईल, अशी ही माहिती त्यांनी दिली. यावेळी अपल जिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी अधिकारी संगीता राजापूरकर, उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी बारामती हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, व्यवस्थापक मोर्चाचे पुणे भरत शहा, तहसीलदार रूपाली सरनोबत, जिल्हाधिशक भूमी अभिलेख प्रभाकर मुसळे, पुरंदर उपअधीक्षक भूमी अभिलेख स्मिता गौड, उपायुक्त पशुधन विकास अधिकारी अंकुश परिहार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारी, वरिष्ठ अभियंता पृथ्वीराज फाळके, कार्यकारी अभियंता अशोक शेटे, उपवनसंरक्षक पुणे विभाग महादेव मोहिते, कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा, तहसीलदार  विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गौर, तालुका कृषी अधिकारी पुरंदर श्रीधर चव्हाण  पोलीस निरीक्षक ऋषींकेश अधिकारी, पोलीस निरीक्षक सहाय्यक दिपक वाकचौरे,  वैभव सोनवणेआदी उपस्थित होते. बाधित शेतकऱ्यांच्या मोजणीच्या परवानगीनुसार कुंभारवळण गावातील शेती बागायत क्षेत्र असून, जिरायत क्षेत्र किंचित असल्यामुळे, त्या ठिकाणी विमानतळाच्या संदर्भात फक्त जमीन मोजण्यास सहमती दिली असून, तर विमानतळाला सहमती दिलेली नाही, असे शेतकरी गणेश मोरे यांनी सांगितले. कुंभारवळण, पारगाव, एखतपुर, वनपुरी, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी या सात गावात विमानतळ होणार आहे. पहिल्या टप्प्यात एखतपुर, मुंजवडी आणि उदाची वाडी या तीन गावांमध्ये मोजणी सुरू केली आहे. तर पुरंदर तालुक्यात होत असलेल्या प्रस्तावित विमानतळासाठी जमीन अधिग्रहणासाठी शासनाने आता आणखी एक पाऊल टाकलेले असून, जमीन विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनी पैकी ज्या शेतकऱ्यांनी जमीन द्यायला परवानगी दिली त्यांचीच शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मोजणी सुरू करण्यात आलेली आहे. मुंजवडी, एखतपुर आणि उदाची वाडी गावामधून या मोजणीला सुरुवात झालेली आहे, नोकरीची हमी द्यावीत ,आम्ही केवळ मोजणीला परवानगी दिली आहे, विमानतळासाठी जर जमीन घ्यायचीच असेल, तर किमान एकराला तीन कोटी पेक्षा जास्त मोबदला दिला पाहिजे, अशी भूमिका शेतकरी एखतपुर व मुंजवडी येथील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे, तसेच नाईलाजाने मोजणीसाठी तयार झाल्याचे काही शेतकऱ्यांनीही सांगितले आहे, परंतु सरकारने आम्हाला बेघर किंवा भूमीहीन करू नये ,आम्हाला योग्य मोबदला दिल्यास, पुनर्वसनाची हमी द्यावी, स्थानिक तरुणांना नोकरीची संधी दिल्यास, पुढचा विचार आम्ही शेतकरी नक्की करू, असेही शेतकऱ्यांनी प्रतिनिधीला माहिती दिली, तर कुंभारवळण या ठिकाणचे शेतकरी गणेश  काशिनाथ मोरे यांनी गावच्या वतीने स्पष्टपणे सांगितले की, आम्ही जमीन मोजणीसाठी फक्त सहमती दिलेली असून विमानतळाला आमची बागायत क्षेत्र असल्यामुळे परवानगी अजिबात सहमती आम्ही देणार नाही असे स्पष्टपणे ठणकावून गणेश काशिनाथ मोरे यांनी सांगितले.आम्ही जमीन फक्त मोजणीसाठी संमती दिलेली असून आमची बागायत क्षेत्र असल्याने विमानतळ साठी संमती देण्यात येणार नाही.आमची काळी मातीही बागायत क्षेत्र असल्यामुळे, विमानतळाला घेता येत नाही ,तर त्यावर निर्णय हा की, पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री यांची  भेट  घेण्यात  येणार  आहे जिल्ह्याधिकारी, उपजिल्हाधिकारी ,उपविभागीय अधिकारी,पुरंदरमधील पत्रकार ,तर कुंभारवळण  गावातील  पाच सदस्य  समितीमार्फत  भेट  होणार  आहे  यासंदर्भात  सवॅ माहितीनुसार   पुरंदरच्या  पत्रकार  यांना  ही माहिती दिली.
जर्मनीच्या "हेंकेल" कंपनीतर्फे म.ए.सो.  वाघिरे विद्यालय व एम. ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल प्रशालेत 2000 डस्टबिनचे मोफत वाटप                                             सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                    म.ए.सो.वाघीरे व एम. ई.एस. इंग्लिश मिडीयम प्रशालेमध्ये, डॉ. प्रसादजी खंडागळे यांच्या पुढाकाराने "हेंकेल" या  कंपनीतर्फे प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून टाकण्यासाठी वाघिरे विद्यालयातील 750 विद्यार्थी व म.ए.सो. इंग्लिश मीडियम च्या 250 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन डस्टबिन अशा एकूण 2000 डस्टबिन चे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी  भूपेश सिंग रीजनल  सिक्युरिटी मॅनेजर , डॉ. प्रसाद खंडागळे रिसर्च डेव्हलपमेंट मॅनेजर व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.    भूपेश सिंग यांनी ओला कचरा व सुका कचरा यातील फरक विद्यार्थ्यांना सांगितला. दैनंदिन जीवनातील खेळ व व्यायाम याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.   डॉक्टर प्रसाद खंडागळे सर यांनी एकमेकांविषयी असलेली समरसता, सहकार्याची वृत्ती विद्यार्थ्यांना गोष्टीतून सांगितली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ओला कचरा व सुका कचरा यांचे नियोजन किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.      या कार्यक्रमासाठी वाघीरे प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती जोग मॅडम, इंग्लिश मीडियम स्कूलच्या माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर, वाघीरे प्रशालेचे उप मुख्याध्यापक  सुरवसे सर, पर्यवेक्षिका लडकत मॅडम, इंग्लिश मिडीयम च्या पर्यवेक्षिका श्रीमती सरोज मॅडम,  उपस्थित होते.       कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना हेंकेल कंपनी मार्फत खाऊ देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.
सासवड शहरात  “श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन                      सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                            दि. १७ सप्टेंबर, २०२५ ते ०२ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा आयोजित करण्यात आला असून, या वर्षी "स्वच्छोत्सव" हे अभियान राबविण्यात येणार आहे.  २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता संपूर्ण सासवड शहरात  आठ ठिकाणी “श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले .तरी सदर स्वच्छता मोहिमेमध्ये सर्व शहरातील नागरिक ,शाळा महाविद्यालये ,सामाजिक संस्था,महिला बचत गट यांनी  सहभाग घेतला.स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाची जनजागृती करण्यासठी स्वच्छता रांगोळी काढण्यात आली . स्वच्छता हि सेवा २०२५ अभियानाचा प्रचार, प्रसार, प्रसिद्धी, आणि जनजागृती म्हणून व्यवसायिक क्षेत्र तसेच रहिवाशी क्षेत्र,शहरातील अंतर्गत रस्ते पर्यटन स्थळे येथे स्वच्छता करण्यात आले.सासवड शहरातील साठेनगर,इंदिरानगर पुणे रोड,सोनोरी रोड सोपानकाका मंदिर परिसर,नाना नानी पार्क तारादत्त पूर्व रोड अश्या विविध ठिकाणी शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलाश चव्हाण, सासवड नगरपरिषदेचे स्वच्छतेचे brand ambassador  मोहन चव्हाण, यांच्या माध्यमातून शहरातील विध्यार्थी तसेच नागरिकांना गुलाबाची फुले देऊन स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. सदर स्वच्छता कार्यक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या सह अधिकारी/कर्मचारी तसेच शहरातील शाळा तसेच महाविद्यालय यांचे विध्यार्थी,शिक्षक,वज्रपुरंदर फौंडेशन,नगरपरिषद सेवानिवृत्ती कर्मचारी आदींनी उपस्थित राहून स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
सासवड शहरात  “श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन                      सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                            दि. १७ सप्टेंबर, २०२५ ते ०२ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा आयोजित करण्यात आला असून, या वर्षी "स्वच्छोत्सव" हे अभियान राबविण्यात येणार आहे.  २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता संपूर्ण सासवड शहरात  आठ ठिकाणी “श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले .तरी सदर स्वच्छता मोहिमेमध्ये सर्व शहरातील नागरिक ,शाळा महाविद्यालये ,सामाजिक संस्था,महिला बचत गट यांनी  सहभाग घेतला.स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाची जनजागृती करण्यासठी स्वच्छता रांगोळी काढण्यात आली . स्वच्छता हि सेवा २०२५ अभियानाचा प्रचार, प्रसार, प्रसिद्धी, आणि जनजागृती म्हणून व्यवसायिक क्षेत्र तसेच रहिवाशी क्षेत्र,शहरातील अंतर्गत रस्ते पर्यटन स्थळे येथे स्वच्छता करण्यात आले.सासवड शहरातील साठेनगर,इंदिरानगर पुणे रोड,सोनोरी रोड सोपानकाका मंदिर परिसर,नाना नानी पार्क तारादत्त पूर्व रोड अश्या विविध ठिकाणी शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलाश चव्हाण, सासवड नगरपरिषदेचे स्वच्छतेचे brand ambassador  मोहन चव्हाण, यांच्या माध्यमातून शहरातील विध्यार्थी तसेच नागरिकांना गुलाबाची फुले देऊन स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. सदर स्वच्छता कार्यक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या सह अधिकारी/कर्मचारी तसेच शहरातील शाळा तसेच महाविद्यालय यांचे विध्यार्थी,शिक्षक,वज्रपुरंदर फौंडेशन,नगरपरिषद सेवानिवृत्ती कर्मचारी आदींनी उपस्थित राहून स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
एस.एन.डी.टी. गृहविज्ञान महाविद्यालयात ‘NutriDEC’ केंद्राचे उत्साहात उद्घाटन                                           सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                            एस.एन.डी.टी. गृहविज्ञान महाविद्यालय, पुणे येथे सीन्यूट्रीशन अँड डायट एज्युकेशन सेंटर (NutriDEC)व चे उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव व डॉ. राजेंद्र भारुड (भा.प्र.से.), प्रकल्प संचालक, राज्य प्रकल्प संचालनालय (SPD), महाराष्ट्र, राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान (RUSA) यांच्या शुभहस्ते पार पडला.या प्रसंगी विद्यापीठातील प्राचार्य, विभाग प्रमुख, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रा. उज्वला चक्रदेव यांनी NutriDEC संकल्पनेबाबत बोलताना सांगितले की, “एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ हे समाजापर्यंत पोषण व आहाराविषयी योग्य जागरूकता पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण मिळेल आणि समाजालाही थेट फायदा होईल.”डॉ. राजेंद्र भारुड यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना, “विद्यापीठाने आरोग्य व पोषण क्षेत्रातील हा अभिनव प्रयोग राबविल्याबद्दल कुलगुरू महोदया तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थिनींचे अभिनंदन. या माध्यमातून पोषण अभियानास निश्चितच चालना मिळेल,” असे मत व्यक्त केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी सांगितले की, NutriDEC हे केंद्र एकीकडे समाजासाठी पोषण सल्ला सेवा केंद्र तर दुसरीकडे क्लिनिकल ट्रेनिंग सेंटर म्हणून कार्य करणार आहे. येथे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थिनींना डायट प्लॅनिंग, काउंसेलिंग आणि क्लिनिकल न्यूट्रिशन याविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार असून, स्थानिक समुदायालाही परवडणाऱ्या व पुराव्यावर आधारित आहार मार्गदर्शनाची सुविधा मिळणार आहे.या प्रसंगी ‘संस्कृता’ या ब्रँडअंतर्गत विद्यार्थिनी तयार करीत असलेल्या खाद्यपदार्थ व इतर उत्पादने याची माहिती पाहुण्यांना देण्यात आली. प्रा. चक्रदेव व डॉ. भारुड यांनी विद्यार्थिनींच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेले हे केंद्र कौशल्य विकास, संशोधन व समाजाभिमुख सेवा या तिन्ही बाबींमध्ये सेतू बांधून देईल. त्यामुळे शैक्षणिक व सामाजिक बंध अधिक दृढ होऊन ‘पोषण अभियान’च्या उद्दिष्टपूर्तीस हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पुरंदर विमानतळासाठी जमीन मोजणी प्रक्रियेला आजपासून झाली सुरुवात; संमतीस मुदत वाढ नाही; तर कुंभारवळण येथील शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी संमती दिली असून, विमानतळाला संमती दिलेली नाही                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे भरपूर प्रमाणामध्ये जमिनीच्या संपादनाची संमती शेतकऱ्यांनी दिली आहे. संमती पत्रे सादर करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत गुरुवारी संपुष्टात आली असून, या मुदतीमध्ये विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या एकूण क्षेत्र 3000 एकर पैकी आज अखेर भरपूर प्रमाणामध्ये जागेची संमती पत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर झाली आहेत, त्यानंतरच शुक्रवारपासून दि. 26 जमीन मोजणी सुरुवात करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले. पुरंदर तालुक्यातील पारगाव, मुंजवडी, उदाचीवाडी, एखतपुर, खानवडी,  वनपुरी, आणि कुंभारवळण या सात गावात विमानतळासाठी सुमारे 3000 एकर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संमती पत्र सादर करण्यासाठी 26 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर पर्यंत ची मुदत देण्यात आली होती, या मुदतीमध्ये सुमारे भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी जमिनीच्या संपादनासाठी संमती आले नव्हते, संमती न दिल्याने, या शेतकऱ्यांना विकसित भूखंडाचा लाभ मिळणार नसल्याची स्पष्ट करण्यात आलेले होते, मात्र या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा यासाठी ही मुदत आणखी वाढवुन द्यावी, अशी मागणी केलेली होती ही मुदत वाढ गुरुवारपर्यंत दि. 25 पर्यंत वाढवलेली होती त्यानुसार भरपूर प्रमाणामध्ये जागेची संमतीपत्रे प्राप्त झालेली असून, आत्तापर्यंत भूसंपादनासाठी सहमती दर्शवलेली असताना, शेतकऱ्यांनी विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या एकूण क्षेत्राच्या भरपूर प्रमाणामध्ये संमती पत्रे दिलेली असून, यानंतर संमतीपत्रे सादर करण्यासाठी कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले आहे, तर कुंभारवळण या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व प्रांत मॅडम यांच्याशी संवाद साधून, फक्त आम्ही कुंभारवळण येथील शेतकरी जमीन मोजणीसाठी संमती देत असून, तर विमानतळासाठी आमची अजिबात संमती असणार नाही असे स्पष्ट केले असून, त्यामुळे दोन दिवस 24 व 25 रोजी भरपूर प्रमाणामध्ये कुंभार वळण येथील शेतकऱ्यांनी संमती दिली आहे, फक्त जमीन मोजणीसाठी तर विमानतळासाठी संमती दिलेली नाहीच, कारण विमानतळासाठी कुंभारवळण येथील बागायत क्षेत्र जवळजवळ शंभर टक्के आहे, त्यामुळे विमानतळासाठी जागा घेता येणार नाही, परंतु कुंभारवळण येथील काही एजंट हे त्या ठिकाणी विमानतळाच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व प्रांत मॅडम यांच्याशी विमानतळाच्या संदर्भात जे लुडबुड, हितगुज चाललेले आहे हे धोकादायक असताना, शेतकऱ्यांना या एजंटला पूर्णपणे विमानतळाच्या संदर्भातून अधिकारी वर्गांनी बाजूला करावे, अन्यथा नाही तर त्या ठिकाणी वेगळा परिणाम होईल, याची काळजी ,स्वतः जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी व प्रांत मॅडम यांनी घ्यावी, मुजवडी, उदाचीवाडी, एखतपूर, खानवडी, वनपुरी आणि कुंभार वळण येथील गावांमधील जवळपास भरपूर प्रमाणामध्ये संमती पत्रे सादर झालेली असून, पारगाव येथील सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये जमिनीचे संमतीपत्रे आलेली आहेत, यादरम्यान संमिती पत्रे देण्याची मुदत वाढ संपल्यानंतर लगेचच आज शुक्रवारपासून दि. 26 जमिनीच्या मोजणीला प्रारंभ करण्यात येणार आहे, संमती पत्रे सादर करण्यासाठी दिलेली मुदतवाढ संपलेली आहे. या मुदतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये संमतीपत्रे दाखल झालेली आहेत. संमती पत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 3,4 11 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,051 दर                 सासवड प्रतिनिधी:  बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवारी दि.25  ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3,411 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,051 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 3,411 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,100 तर सरासरी 2,755 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,051 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,700 तर सरासरी 2,_875 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, सुशांत कांबळे, शरयू वाबळे, गणेश होले, भाऊसो गुलदगड, पंकज निला खे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर आदी उपस्थित होते. गुळाची निरा येथून माहिती मिळाली नाही, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी २,100,३,411,2,7,55. बाजरी 2,200,3,051, 2,625. गहू 2,700,3,051,2,875. तांदूळ  -  -   -  हरभरा 5,200, 5,500,5,250.
परिंचे येथे जैविक निविष्ठा केंद्राचे उद्घाटनस्थानिक शेतकऱ्यांना जैविक शेतीसाठी मोठा आधार                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                परिंचे (ता. पुरंदर) येथे बुधवार, दि. 24 सप्टेंबर रोजी श्री शिवशंभो शेतकरी गट यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या जैविक निविष्ठा केंद्राचे उद्घाटन आमदार  विजय  शिवतारे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी माननीय आमदारांनी सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने काळाची गरज असणारा महत्त्वाचा विषय हाताळल्याचे नमूद करून गटाचे कौतुक केले व हा प्रश्न अधिवेशनामध्ये ऐरणीवर आणून शासनाला शेतकऱ्यांच्या जैविक निवेस्टन बाबतच्या अडचणी निवड उपाय करण्यास भाग पाडण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामागे परिंचे मंडल कृषी कार्यालय, ग्रामपंचायत परिंचे व पाणी फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.आजच्या घडीला संपूर्ण जगभरात जैविक किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित होत आहे. केंद्र व राज्य शासनही अशा शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरणे राबवत आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लागणाऱ्या जैविक खते, बुरशीनाशके, कीटकनाशके यांसारख्या निविष्ठा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांची अडचण निर्माण होते. शेतकऱ्यांना या निविष्ठांसाठी विद्यापीठे किंवा संशोधन संस्थांकडे धाव घ्यावी लागते, परिणामी जैविक शेतीकडे त्यांचा कल अपेक्षेइतका वाढत नाही.हीच गरज लक्षात घेऊन श्री शिवशंभो शेतकरी गटाने परिंचे येथे जैविक निविष्ठा केंद्र उभारले आहे. या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना विविध विद्यापीठांनी विकसित केलेली जैविक उत्पादने स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच जैविक खते व औषधांच्या वापराबाबत शास्त्रशुद्ध मार्गदर्शनही केले जाणार असून, शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे.उद्घाटन प्रसंगी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, गटविकास अधिकारी  प्रणोती श्रीमाळ, पाणी फाउंडेशनचे  डी. एल. मोहिते, मंडल कृषी अधिकारी  दुर्गुडे , सहाय्यक  समगीर  व त्यांचे सर्व सहकारी, ग्राम विकास अधिकारी शशांक सावंत, सरपंच श्रीमती नाईकनवरे,  उपसरपंच  प्रवीण जाधव, व सर्व सदस्य.  पंचक्रोशीतील मान्यवर सुशील कुमार जाधव, समीर जाधव, मयूर मुळीक, नवले सर, बबूसो माहूरकर, सागर करवंदे, कृषी सखी महिला शेतकरी गटाच्या सर्व सदस्या, तसेच शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाणी फाउंडेशनचे मयूर साळुंखे यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद जाधव यांनी तर आभार प्रदर्शन शशिकांत जाधव यांनी केले.या जैविक निविष्ठा केंद्राच्या स्थापनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना जैविक शेतीसाठी आवश्यक संसाधने सहज उपलब्ध होणार असून, टिकाऊ शेतीच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
वाघिरे महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश        सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीतर्फे मु.सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील खेळाडूंनी तीन सुवर्ण व तीन रौप्य पदक पटकावून दैदिप्यमान कामगिरी केली.  फ्री स्टाईल कुस्ती प्रकार६१ किलोग्रॅम वजनगट : श्रीनाथ डांगे - सुवर्णपदक, ७४ किलोग्रॅम वजनगट: प्रकाश कार्ले - सुवर्णपदक, ९७ किलोग्रॅम  वजनगट: प्रतीक जगताप - सुवर्णपदक, ९२ किलोग्रॅम वजनगट: यशराज काळे - रौप्यपदक  ग्रीकोरोमन कुस्ती प्रकार ८२ किलोग्रॅम वजनगट: अजिंक्य शिंदे - रौप्य पदक, ९७ किलोग्रॅम वजनगट: विशाल जाधव - रौप्यपदक वरील सर्व खेळाडूंची बारामती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर घवघवीत यशाबद्दल खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ.बी.यु.माने, डॉ. संजय झगडे,  शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ यांनी अभिनंदन केले. सर्व विजेते खेळाडू श्री शिवाजी प्रसारक मंडळ, सासवड संचलित छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे प्रशिक्षक पै.तानाजी बोडरे व पै.माऊली खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.
संगणक साक्षरता म्हणजे एक पाऊल पुढे                                     सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                   मार्तंड देवस्थान जेजुरी उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा मार्तंड देवस्थान ट्रस्ट जेजुरी यांचे विश्वस्त एडवोकेट  विश्वास पानसरे  यांच्या माध्यमातून तसेच पुरंदर भाजपाचे उपाध्यक्ष माजी सरपंच  दिलीप (आप्पा) कटके पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा घिसरे वाडी भिवरी (ता. पुरंदर )येथे संगणक वितरण कार्यक्रम झाला. यावेळेस बोलताना  दिलीप (आप्पा) कटके पाटील म्हणाले , "जगभरात घडत असलेल्या घटनांची माहिती क्षणात सर्वदूर पसरते. कोणत्याही देशात चाललेला खेळाचा सामना घरबसल्या पाहता येतो. कोट्यावधी रुपयांची आर्थिक हिशोबी उलाढाल काही मिनिटात करता येते. माणूस अंतराळात पोचला. चंद्राच्या ही पुढे जाऊन मानवी वस्तू मंगळावर पोचली. या सर्व चांद्रयान , मंगळयान मोहिमांचा कार्यभार संगणकाच्या माध्यमातूनच पूर्णत्वाकडे गेला आहे. ग्राफिक्स डिझाईन बँकांचा ताळेबंद फोटोग्राफी व चित्रीकरण , सिनेमा यासरख्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा संगणक हा जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. संगणक साक्षरता म्हणजे एक पाऊल काळाच्याही  पुढे आहे."* कार्यक्रमासाठी भिवरी गावचे मा उपसरपंच  जगन्नाथ दादा कटके पाटील , मा उपसरपंच  तुकारामबुवा कटके पाटील , दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष संभाजी आबा नाटकर , गोसावी बुवा तरूण मंडळाचे मा अध्यक्ष पैलवान शेखरबापू कटके पाटील ,  संतोष घिसरे ,  मनोहरबापू घिसरे ,  विकास कटके पाटील ,  ईश्वर कटके पाटील , आदर्श शिक्षक सचिन बोरावके सर , धोंगडे मॅडम आदींसह ग्रामस्थ नागरीक उपस्थित होते.
श्रीक्षेत्र वीर येथे रक्तदान शिबिर संपन्न. देवस्थान ट्रस्ट व वीरेश्वर प्रतिष्ठानचा संयुक्त प्रेरणादायी उपक्रम              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       श्रीक्षेत्र वीर (ता,पुरंदर)येथे श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर तसेच वीरेश्वर प्रतिष्ठाण वीर यांच्या संयुक्त विद्यमानाने गाव मौजे वीर, ता. पुरंदर, जि. पुणे येथे बालाजी ब्लड बॅंक लोणंद यांचे सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरामध्ये एकूण ४५  लोकांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमास श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर चे चेअरमन राजेंद्रबापु धुमाळ तसेच वीरेश्वर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मंगेश धुमाळ, संपत चव्हाण (प्रतिष्ठानचे सचिव), ॲड. बिपीन शिंदे ( प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार), महेश धुमाळ (तंटामुक्ती उपाध्यक्ष वीर), योगेश शंकर कुदळे (सामाजिक कार्यकर्ते ) तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वीर आणि पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान असल्याचे इतरांना दाखवून दिले व या प्रेरणादायी उपक्रमाला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहे. वीरेश्वर प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक उपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टिकोनातून विधायक कामे करत असतात. आणि वीरेश्वर प्रतिष्ठानच्या प्रत्येक उपक्रमाला देवस्थान ट्रस्टचे भरभरून सहकार्य असते असे वीरेश्वर प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट बिपिन शिंदे यांनी सांगितले.कोट: श्रीक्षेत्र वीर येथील वीर देवस्थान ट्रस्ट नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्याच अनुषंगाने देवस्थान ट्रस्ट व वीरेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त माने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करून सामाजिक दायित्व निभावण्यामध्ये ग्रामीण भागातील ही नागरिक अग्रेसर आहेत हे या माध्यमातून दिसून आले. रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचे देवस्थान ट्रस्ट मार्फत आम्ही मनस्वी आभार मानतो असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बाप्पू धुमाळ यांनी सांगितले.फोटो ओळ: श्रीक्षेत्र वीर (ता,पुरंदर) येथे रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (छाया: बापू मुळीक)
माहूर मध्ये प्रभात फेरी पथनाटया द्वारे एड्स जनजागृती ...   सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                            श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित माहूर माध्यमिक विद्यालय माहूर (ता. पुरंदर) जिल्हा पुणे या विद्यालयाच्या वतीने माहूर मध्ये आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी इंटेन्सिफाइड  आयईसी कॅम्पेन अंतर्गत शाळा /महाविद्यालय / ग्रामपंचायत स्थर संवेदीकरण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय सासवड अंतर्गत उपकेंद्र माहूर व माहूर माध्यमिक विद्यालय माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही ,टी बी , सिफिलीस , गुप्तरोग इत्यादी आजारांबद्दल जनजागृती करण्यात आली .     यावेळी ग्रामीण रुग्णालय सासवडचे समुपदेशक  गोरख शिंगटे म्हणाले ,काही चांगल्या सवयी लावून एच .आय. व्ही .बरोबर निरोगी आणि दीर्घायुष्य जगा .एच आय व्ही एड्स कायदा 2017 च्या अंतर्गत असणारे तुमचे हक्क जाणून घ्या आणि मुक्तपणे जगलात का ?गुप्तरोगांवर औषधोपचार उपलब्ध आहेत सुरक्षा क्लिनिक किंवा लैंगिक व प्रजनन आरोग्य सेवांची माहिती घ्या . ए .आर .टी .चे औषध वायरसला शरीरात वाढण्यापासून प्रतिबंधित करते आणि एचआयव्ही संक्रमित व्यक्तीला निरोगी ठेवण्यास मदत करते .ए आर टी केंद्रात सामील होण्याचे अनेक फायदे आहेत एआरटी चे औषध निरोगी आणि दीर्घायुष्य जगण्यास मदत करते . एचआयव्हींनी संक्रमित व्यक्तींमध्ये होणाऱ्या संधी साधू  संक्रमणांपासून संरक्षण करणे ,जोडीदारांमध्ये एचआयव्ही होण्याची शक्यता कमी करते .आपण ए आर टी चा अवलंब करून आपण एच आय व्ही पॉझिटिव्ह असून देखील निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगू शकतो .एच आय व्ही चा उपचार आणि त्याच्याशी निगडित सर्व तपासण्या आपल्या जवळील एआरटी केंद्रावर मोफत उपलब्ध आहेत . अशी माहिती त्यांनीयावेळी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना दिली . माहूर माध्यमिक विद्यालयातील  इ . ९वीच्या विद्यार्थ्यांनी एड्सवर पथनाट्य सादर केले . गावातून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून जनजागृती केली .    या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक  हनुमंत पवार ,माहूर गावच्या उपसरपंच मेघाताई जगताप ,ग्रामीण रुग्णालय सासवडच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वाती वाघोले ,आशाताई वर्कर प्रीती जगताप ,संजय जगताप ,शरद चव्हाण ,बंडा बापू जगताप , राजेंद्र चव्हाण ,माऊली जगताप ,प्रताप माहुरकर ,बाळू गोळे ,शिवाजी अधिकारी त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  महेंद्र भोसले यांनी तर आभार पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष  रामप्रभू पेटकर यांनी मानले .
पुरंदर तालुक्यातील जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदी संगीता रिकामे                                                                        सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या राज्यव्यापी शिक्षक संघटनेच्या पुणे जिल्हा ग्रामीणची 2025 ते 2028 वार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली, या त्रैवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी संगीता राजकुमार रिकामे म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सासवड यांची बिनविरोध निवड झाल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी मोहन ओमाशे यांनी जाहीर केले.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर सासवड भगव्या ध्वजांनी उजळले; मंदिरांवरील ध्वजारोहणाने शहराच्या आध्यात्मिक वैभवात भर                                                                        सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राइम न्युज:                                                                    सासवड, नवरात्रोत्सवाचा मंगलमय घटस्थापनेचा दिवस आणि याच मुहूर्तावर सासवड शहराचे आकाश भगव्या रंगात न्हाऊन निघाले. गेल्या सहा वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या एका अभिनव उपक्रमांतर्गत शहरातील लहान-मोठ्या सर्व मंदिरांवर एकाच वेळी भगवे ध्वज आणि पताका फडकवण्यात आल्या. सूर्योदयाच्या पवित्र क्षणी भगवे ध्वज फडफडताना पाहणे हा एक डोळ्यांचे पारणे फेडणारा आध्यात्मिक सोहळा ठरला. सासवड सांस्कृतिक मंडळाने हा उपक्रम सुरू करून शहराच्या गौरवशाली परंपरेत भर घातली आहे.माजी आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून उपक्रमाची मुहूर्तमेढ या अनोख्या आणि शहराला अभिमान वाटणाऱ्या उपक्रमाची सुरुवात माजी आमदार आणि सासवड सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या दूरदृष्टीतून झाली. हा केवळ एका दिवसाचा सोहळा नाही, तर वर्षातून चार प्रमुख सणांच्या दिवशी ही परंपरा जपली जाते. यामध्ये घटस्थापना, दिवाळी पाडवा, मकर संक्रांती आणि गुढीपाडवा यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, जेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा सासवडमध्ये मुक्कामासाठी येतो, तेव्हाही सर्व मंदिरांवरील ध्वज बदलून त्यांना आदराने मानवंदना दिली जाते. ही परंपरा केवळ एक उपक्रम नसून, सासवडच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेचे प्रतीक बनली आहे. जागर ऐतिहासिक मंदिरांवर भगव्या रंगाचा यंदाच्या घटस्थापनेला, रविवार (ता. २२) रोजी पहाटेपासूनच सासवडमधील प्रमुख मंदिरांवर उत्साहाचे वातावरण होते. शहरातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरावर ध्वज फडकवण्याचा मान देवस्थानचे मानकरी गिरीगोसावी बुवा यांच्या हस्ते मिळाला. त्यांनी विधिवत पूजा करून ध्वजारोहण केले. यानंतर श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी मंदिरासह शिवालय, संगमेश्वर, चांगा वटेश्वर, सोपाननगर येथील महालक्ष्मी माता मंदिर तसेच शहरातील अन्य मंदिरांवरही मोठ्या उत्साहात भगवे ध्वज फडकवण्यात आले. यामुळे शहरातील वातावरण उत्साहाने भारले होते आणि सर्वत्र भगव्या रंगाचा जागर सुरू होता. भविष्यात संपूर्ण पुरंदर तालुक्यात उपक्रम विस्तारणार सासवड सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी या उपक्रमाची जबाबदारी मंडळाचे सर्व सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वीकारली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, हा उपक्रम आम्ही केवळ सासवडपुरता मर्यादित ठेवणार नाही. भविष्यात संपूर्ण पुरंदर तालुक्यात हा उपक्रम सुरू करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे तालुक्याची सांस्कृतिक ओळख अधिक दृढ होईल आणि धार्मिक एकोपा वाढीस लागेल. या सोहळ्याप्रसंगी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, रामभाऊ इनामके, अशोक भोंगळे, प्रवीण जगताप, मारूती कुंभार, विठ्ठल शिंदे, पुजारी हर्ष भैरवकर, गणेश भैरवकर, मंडळाचे सदस्य प्रविण पवार, सागर घाटगे, अमित पवार, दीपक जगताप, जीवन कड, ऑस्नेहा शेवाळे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सासवडच्या गौरवशाली परंपरेला जपत सुरू असलेला हा अनोखा उपक्रम भविष्यात निश्चितच पुरंदर तालुक्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणार आहे.
श्रीगोंद्याचे ९ तायक्वांदो खेळाडू विभागस्तरावर .संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचे जिल्हास्तर तायक्वांदो स्पर्धेत यश                                                                       सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत येथील "संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमी" च्या खेळाडूंनी ९ सुवर्ण, २ रौप्य, ९ कांस्यपदके मिळवून घवघवीत यश संपादन केले.सुवर्णपदक विजेते ऋतिका दातीर, वैष्णवी चौधरी, गायत्री भुजबळ, शर्वरी गोलांडे, सोफिया शेख, प्राजक्ता तरटे, ओंकार ननवरे, वरद काळे, प्रणव रायकर  हे खेळाडू "पुणे विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत" अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.स्पर्धेमध्ये भार्गवी शेलार, यश खाकाळ यांनी रौप्यपदक तर योगेश्वरी नरके, आर्या गाडगे, भार्गवी सोनवणे, ज्ञानेश्वरी खेडकर, सिया कोकणे, आर्यन शिंदे , अर्णव वाघ, राज कोल्हे, कृष्णा खेडकर यांनी कांस्यपदक पटकावले.विजेत्या खेळाडूंना अकॅडमीचे प्रशिक्षक तथा राष्ट्रीय तायक्वांदो पंच मास्टर जयेश आणि सिद्धेश आनंदकर यांचे मार्गदर्शन लाभले.विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल यशस्वितांचे आमदार विक्रमसिंह पाचपुते, ज्येष्ठ नेते घन:शाम अण्णा शेलार, बाबासाहेब भोस, राजेंद्र दादा नागवडे, मा.आमदार राहुल दादा जगताप, अहिल्यानगर जिल्हा अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष ग्रँडमास्टर संजय आनंदकर, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सचिन जामदार यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य, पालक यांनी अभिनंदन केले.चौकटतायक्वांदो खेळ स्वसंरक्षणासाठी महत्त्वाचा तर आहेच तसेच महाराष्ट्र शासनाने नुकत्याच पारित केलेल्या परिपत्रकानुसार शालेय तायक्वांदो खेळाच्या राज्य तसेच राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना शासकीय नोकर भरतीत पाच टक्के आरक्षण देण्यात आल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे ग्रँडमास्टर संजय आनंदकर यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील सासवड सुपा रस्त्याची अक्षरशा: चाळण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील पूर्व भाग म्हणजेच मुख्य बाजारपेठेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा सासवड सुपा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे, मूळचा सुस्थितीत असलेला रस्ता उखडून, टाकायचा सापडेल तशी माती राडारोड रस्त्यावर टाकायची व रस्त्याच्या बाजूची वेळ खाऊपणा, तातडीची गरज नसलेल्या कठड्यांची बांधकामे करायची, असे प्रकार सुरू असून, त्यामुळे स्थानिक शेतकरी नागरिक व प्रवाशांना जीव मुठीत धरून, प्रवास करावा लागत आहे. नियोजन वहीच्या शेतीच्या अभावामुळे, ठेकेदार काम सुरू करत नाही,तर शासकीय यंत्रणा ठिप आहे, हालत नाहीत, दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे ,दोन महिन्यापूर्वी पारगाव गावठाण ते खानवडी फुले पाटीपर्यंतचा सुस्थितीतील रस्ता नवीन कामासाठी उखडून टाकला आहे, उपलब्ध माती रस्त्यावर पागवण्यात आली आहे, सततचा पाऊस पडत असल्यामुळे, रस्त्यावर राडारोड पसरला आहे ,त्यामुळे वाहने घसरून ,अपघात होत आहेत, त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.याच रस्त्यावर काही दिवसापूर्वी पावसाच्या पाण्याचे निचरासाठी नलिका टाकण्यात येत होत्या, दक्षता फलक नसल्याने व अडसर निर्माण न केल्याने, एका परप्रांतीय दुचाकी स्वराचा मृत्यू झाला होता, पुरंदरचे विमानतळासाठी जमिनीची सहमती मिळवण्यासाठी असंख्य अधिकारी या रस्त्याने ये जा करतात, सुमारे 350 कोटी रुपये खर्च होणाऱ्या एमएस आयडीसीच्या रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल कोणीही शब्द बोलत नाहीत, पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार यावर काही भाष्य करण्यास तयार नाहीत, तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा, यासाठी प्रामुख्याने पुरंदर तालुक्यातील सासवड सुपा रस्त्यावरील नागरिकांनी जर न्याय मागायचा असेल तर फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे मुख्य राजपथ इन्फा कंपनीचे मालक जगदीश कदम यांच्याकडे न्याय माघावाच कारण राजपथ इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे न्याय मागण्यात काही अर्थ नाही ,ते कुणालाही एकतर पुरंदर तालुक्यातील सामान्य नागरिक, सरपंच यांना दाद देत नाहीत, अनेक तक्रारी करून, ठेकेदार काम सुरू करत नाही, त्यामुळे कोणी "न्याय देता का न्याय "असे म्हणण्याची वेळ ही प्रवाशावर आलेली आहे. गौण खनिजाचा तुटावडा आहे, त्यातच रॉयल्टी परवानगी क्षेत्र धारकांच्या परवानगीसाठी वेळ लागत आहे, याबाबत प्रयत्न सुरू असून, दसरा, दिवाळीनंतर सर्वसामग्रीनुसार यंत्रणा राबवली जाणार आहे. डिसेंबर पूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, असे सर्व स्तरातून सहकार्य अपेक्षित आहे. रोहिदास पिसाळ, ठेकेदारांचे मुख्य समन्वयक राजपथ इन्फा कंपनी.
पुरंदर तालुक्यातील वीर या ठिकाणी पारंपारिक धार्मिक विधी द्वारे घटस्थापना स्थापन                                            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                               महाराष्ट्रातील दक्षिणकाशी म्हणून, प्रसिद्ध असणारे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री शेत्र वीर (ता. पुरंदर) येथील काशीकंट काळभैरवनाथाचे जागृत अवतार श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरीचा नवरात्र उत्साहातील गट बसविण्याचा कार्यक्रम पारंपारिक व धार्मिक विधी द्वारे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाला, यावेळी देवस्थानचे मुकादम पाटील, मानकरी, साल करी, दागिनदार, विश्वस्त, उपवासकरी, ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. श्री शेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरीची यात्रा जशी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, यात्रेप्रमाणेच या नवरात्र उत्सव काळातही महाराष्ट्रासह इतर राज्यातून उत्सव काळातही सकाळी पारायण, दुपारी देवाचा छबिना व दुपारनंतर श्रीनाथाच्या सेविका नर्तिका यांचा वाद वृद्धासहित नाच गाण्याचा मनोरंजन चा कार्यक्रम, संध्याकाळी सात नंतर देवाचे धनगरी ओव्या, तर रात्री साडेनऊ वाजता देवाची आरती झाल्यानंतर, छबिना व पुन्हा एकदा रात्रीपासून पहाटेपर्यंत देवाच्या निर्तिकींचा मनोरंजनाचा कार्यक्रम असतो, त्यामुळे महाराष्ट्रातून भाविक भक्त, हौसे,नवसे, गौसे यांनी मंदिर आणि मंदिर परिसरातील फुलून गेलेला असतो, श्रीनाथ जोगेश्वरी नवरात्र उत्सवातील पारंपारिक कार्यक्रम: तिसरी माळ बुधवार दि. 24, कमळाजी भक्त भेटीसाठी देवाची पालखी माळावर जाते, महाष्टमी उपवास मंगळवार दि. 30 भक्ती शक्ती संगम भक्तराज कमळाजी व देवाची माळावर भेट,घट उठवणे बुधवार दि.  सकाळी नऊ वाजता, विजयादशमी गुरुवार (दि. 2) देवाची पालखी सिमोलंघनास साडेचार वाजता निघते, नवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, करण्यात आली असून, मंदिर व परिसरातील साफसफाई, स्वच्छता, याबाबत मंदिर प्रशासन मागील दोन आठवडे कार्यरत आहे, मंदिरातील सर्व धार्मिक व पारंपारिक विधींचे नियोजन काटेकोरपणे करण्यात आले असून, नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर स्वच्छता, पिण्याचे पाणी, दर्शन बारी, स्वयंसेवक, होमगार्ड यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, या व्यतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी प्रशासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे, मंदिरातील ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन याबाबत सर्व नियोजन ट्रस्टचे सर्व विश्वस्त, सल्लागार मंडळ, सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करत आहे. राजेंद्र धुमाळ देवस्थान ट्रस्ट वीर अध्यक्ष देवस्थान. विश्वस्त सुनील धुमाळ, काशिनाथ धुमाळ, विराज धुमाळ, प्रमिला देशमुख, श्रीकांत थेटे, अमोल धोंडीबा धुमाळ, बाळासो समगीर, जयवंत सोनवणे, तसेच इतर विश्वस्त, सल्लागार ज्ञानेश्वर धुमाळ यांनी ट्रस्ट मार्फत व्यवस्था पाहिली आहे.
पुरंदर तालुक्यातील जवळार्जुनचा सरपंच खरा कोण? तर जव ळार्जुन गावात सरपंच पदावर चुरस निर्माण झालेली आहे; ग्रामस्थांच्या मध्ये उत्सुकता लागलेली आहे गावचा कारभारी नक्की कोण?                                                           सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                 जवळार्जुन गावातील सरपंच पदाभोवती निर्माण झालेली गोंधळ अजूनही कायमस्वरूपात आहे, सोमनाथ कणसे यांचे सरपंच पद न्यायालयाच्या आदेशानंतर रिक्त झाले होते, त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये ग्रामपंचायत सदस्यातून अजिंक्य टेकवडे यांची सरपंच पदी निवड झाली होती, या निवडीनंतर गावातील दोन गटांमध्ये वाद निर्माण झालेला होता, ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीनंतर प्रकरण न्यायालय व विभागीय आयुक्तांकडे गेले, त्यातून 17 सप्टेंबर 2025 रोजी निकाल लागल्यानंतर पुन्हा सरपंच पदावर दावा ,प्रतिदावे सुरू झालेले असून, दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत अजिंक्य टेकवडे यांची ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, या परिस्थितीमध्ये गावात दोन सरपंच असल्याचा गोंधळ निर्माण झाला असून, विकास कामे ठप्प झालेली आहेत, ग्रामस्थांमध्ये आता उत्सुकता आहे की, अखेरीस कायदेशीर दृष्ट्या जवळार्जुन खरा सरपंच कोण? ठरणार याबाबतचा निर्णय लवकरात लवकर व्हावा ,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे, तर यामध्ये प्रामुख्याने आत्ताचे सरपंच अजिंक्य टेकवडे यांना कोर्टाचा आदेश हा अजिबात मान्य नाही, कोर्टाच्या आदेशामध्ये जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, पोलीस स्टेशनचे पी.आय, गटविकास अधिकारी, तहसीलदार, आमदार, मंत्री सुद्धा कोर्टाच्या आदेशापुढे कोणी मोठा नाही, परंतु पुरंदर तालुक्याचे माजी आमदार अशोक टेकवडे व सरपंच अजिंक्य टेकवडे यांना हे अजिबात मान्य नाही, त्यामुळेच पुरंदर तालुक्यात दोन दिवस झाले अजित मल्टीस्टेटचा कारभार पारदर्शक, माजी आमदार अशोक टेकवडे यांची माहिती, तर कर्जफेड करण्यात ते समोरचे अपयशी, ठरले आहेत परंतु, कोर्टाच्या आदेशामध्ये माजी आमदार अशोक टेकवडे व अजिंक्य टेकवडे यांना आदेश मान्य नसून, यामध्ये जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी , पी .एस. आय पोलीस यांना हा कोर्टाचा आदेश पुढे कोणही मोठा नाही, कोर्टाचा आदेशाचे पालन हे यांना करावेच लागते, परंतु माजी आमदार अशोक टेकवडे व सरपंच जवळाजॅनचे अजिंक्य टेकवडे यांना तो आदेश कोर्टाचा मान्यच नाही, ही शोकांतिका पुरंदर मध्ये आहे, तर यामध्ये कोर्टानेच यांच्यावर त्वरित कारवाई करून, त्या ठिकाणी सरपंच पद हे खुले करून, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जवळार्जुनचे सरपंच पद हे पुन्हा एकदा सोमनाथ कणसे यांच्याकडेच सोपवावे लागणार आहेच. त्यासाठी सोमनाथ कणसे यांना सांगितले जात आहे की, ग्रामसेविका व गट विकास अधिकारी यांच्याकडून असे सांगितले जात आहे की, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून पत्र घेऊन येणे, तरच तुम्हाला सरपंच पद मिळू शकते, यावर कोर्टाने काय असेल तो निर्णय द्यावा, व त्वरित माझी आमदार अशोक टेकवडे व अजिंक्य टेकवडे यांच्यावर कोर्टाने कारवाई करावी, जो कोर्टाचा आदेश पाळत नसेल त्यासाठी शासकीय स्तरातून माजी आमदार अशोक टेकवडे व सरपंच अजिंक्य टेकवडे यासह अधिकारी  यांच्यावर त्वरित कडक कारवाई ही केलीच पाहिजे, अशी चर्चा पुरंदर तालुक्यात रंगलेली आहे. तर जवळाजॅनचे खरे स्पर्धकांमध्ये सरपंच कोण असतील तर सोमनाथ कणसे हे विद्यमान सरपंच पुन्हा एकदा जवळार्जुन गावच्या ठिकाणी सरपंच आहेतच.
भाद्रपद अमावस्यानिमित्त  आज भाविकांनी देवदर्शनासाठी वीरच्या मंदिरात गर्दी केली तर श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत येत्या नवरात्र उत्सवानिमित्त जय्यत तयारी चालू असल्याचे निदर्शनास                                                सासवड प्रतिनिधी :   बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                         पहाटे चार वाजता देऊळवाडा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी सुरु करण्यात आला. दगडी कासवावर पारंपारिक गोसावी समाजाचा गोंधळाचा कार्यक्रम चालू होता. सकाळपासून भाविकामार्फत  देवाला अभिषेक करण्यात आले. त्यानंतर दहीभाताची पूजा बांधण्यात आली. आज अमावस्येला कै. विलासराव धुमाळ यांचे स्मरणार्थ  दिलीपदादा वि. धुमाळ, हनुमंत ना. धुमाळ,केरबा धुमाळ, प्रताप चव्हाण यांचेमार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.    नवरात्र उत्सवनिमित्त मंदिरातील विविध धार्मिक परंपरा, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, दोन्ही वेळेचा छबिना, पालखी,  कोल्हाटी समाजाचा नर्तकीची हजेरी, याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले असल्याचे देवस्थान ट्रस्टमार्फत सुनील धुमाळ यांनी सांगितले.   संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसरात स्वच्छता, औषधफवारणी, विविध शासकीय,                      निमशासकीय खात्यांना पत्रव्यवहार, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती असेही देवस्थान ट्रस्टमार्फत सांगण्यात आले .    यावेळी  देवस्थानचे चेअरमन राजेंद्र धुमाळ, व्हा.चेअरमन अमोल आ. धुमाळ, विश्वस्त विराज धुमाळ, काशिनाथ धुमाळ, अमोल धो. धुमाळ   श्रीकांत थिटे, बाळासो समगीर,जयवंत सोनावने,  प्रमिला देशमुख आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील ग्रामीणभागासह शहरात बैलपोळासन उत्साहात साजरा                                                   सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागात आणि सवड शहर व परिसरात भाद्रपदी बैलपोळा ऊत्साही, आनंदी वातावरण हलगी, डफड्याच्या तालावर साजरा करण्यात आला, थांबलेला पाऊस, जोमदार पिके व वातावरणातील उत्साह यामुळे बैलपोळयात विशेष उत्साह दिसून आला मात्र काही बैलांच्या पुढे डीजेच्या तालावर नाचत व फटाके फोडत मिरवणुकीला वेगळे स्वरूप प्राप्त जाले.      चालू वर्षी सर्वत्र पाऊस दमदारपणे बरसलेला असून  बहुतेक परिसरात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने खरिप हंगामातील पिके चांगली आली असून एकंदरित समाधानकारक पिके असल्याने साहजीकच शेतकरी वर्ग आनंदी असून ज्या बैलांच्या जीवावर शेती पिकवलेली आहे त्या बैलांचा म्हणजेच आपल्या लाडक्या सर्जा राजाचा बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करताना विशेष आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता. ग्रामीण भागासह तालुक्याच्या  मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सासवड शहरात गेली दोन दिवसांपासून बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या नक्षीदार लेस, झालर, घुंगरमाळा, घंटी, फुगे, रंग यांसह अन्य वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली होती. आजही ग्रामीण भागात बैलपोळा हा सण ऊत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. या शिवाय बैलगाडा शर्यतींमुळे  शेतकऱ्यांच्या पशुधनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बैलपोळ्याच्या दिवशी सकाळीच शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या पशुधनाला स्वच्छ आंघोळ घालून बैलांना झूली घालून गुलाल भंडाराची उधळण करित शिंगांना रंग व फुगे बांधुन सासवड शहरासह ग्रामीण भागातील गावागावातुन बैलांच्या भव्य मिरवणुका पारंपारिक वाद्यांच्या म्हणजेच हलगी डफड्याच्या तालावर काढल्या. बेफाम होवून बळीराजा या मिरवणुकीत नाचला. आशाच प्रकारे सासवड शहरातील शेतकरी व सासवडचे माजी उपनगराध्यक्ष विजय वाढणे, कारभारी संजय वढणे, व त्यांचे चिरंजीव साहिल वढणे, मनीष वढणे, राहुल वढणे, यांनी मिरवणूक काढली यात प्रवीण टिळेकर, सुनील वढणे, सुभाष शिवरकर, शरद चौखंडे यांनी सहभाग घेतला होता. फोटो :  सासवड येथे बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला
संत सोपानकाका सहकारी बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न... सभासदांना ९% लाभांश जाहीर..                                                        ​सासवड प्रतिनिधी:   बापू  मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                 संत सोपानकाका सहकारी बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २१)  खेळीमेळीत संपन्न झाली. बँकेचे संस्थापक कै. चंदूकाका जगताप यांच्या दूरदृष्टीमुळेच बँक सक्षमपणे उभी असल्याचे जगताप यांनी सांगितले. सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे रविवारी (ता. २१) आयोजित या सभेला सभासद व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.​यावेळी बोलताना संजय जगताप यांनी सांगितले की, बँकेच्या प्रगतीमध्ये सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांचा विश्वास अत्यंत मोलाचा आहे. याच विश्वासाच्या बळावर बँक आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापन राखत असून पुढील दोन वर्षांत बँकेचे शेड्यूल्ड बँकेकडे रूपांतर करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जगताप यांनी, ३१ मार्च २०२५ अखेर बँकेच्या ठेवी ७८६ कोटी २९ लाख रुपये असून, ४५७ कोटी ३३ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेला ७ कोटी ८३ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, ज्यामुळे संचालक मंडळाने सभासदांसाठी ९ टक्के लाभांश जाहीर केला. बँकेला स्थापनेपासून सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.​सभेचे सूत्रसंचालन सागर जगताप व पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे यांनी केले. बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साबणे यांनी विषयवाचन केले. चर्चेमध्ये दिलीप गिरमे, विश्वास थेऊरकर, विशाल हरपळे, प्रवीण मांडके यांच्यासह अनेक सभासदांनी सहभाग घेतला. उपस्थितांमध्ये कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, नीरा बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे, बाळासो शिंदे, नंदकुमार जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.   संचालक हेमंत भोंगळे, प्रकाश जगदाळे, दिलीप बडदे, संजय आंबेकर, शरदचंद्र जगताप, राजेंद्र बडदे, मनोहर पवार, धनंजय काकडे, अॅड युवराज वारघडे, धनसिंग भापकर, शेखर निकुडे, मार्तंड भोंडे, विजय थेऊरकर, संचालिका राजवर्धिनी जगताप, सविता ताकवले, पल्लवी बाजारे, रवींद्र जोशी, मुख्य अधिकारी चंद्रशेखर जगताप, गणेश मोहोळ, विश्वजीत आनंदे यांसह सभासद उपस्थित होते. शेवटी, उपाध्यक्ष शिवाजी ढमढेरे यांनी आभार व्यक्त केले.​फोटोओळ: सासवड (ता. पुरंदर): संत सोपानकाका सहकारी बँकेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दीपप्रज्वलन करताना संजय जगताप, रमणिकलाल कोठडिया, राजवर्धिनी जगताप व संचालक मंडळ.
पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे बुधवारी महाराजस्व अभियान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंद र प्राईम न्यूज:                                                                                      परिंचे( ता. पुरंदर) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात तहसीलदार पुरंदर तसेच सर्व शासकीय विभागाच्या वतीने बुधवारी दि. 24 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर पार पडणार आहे. आमदार विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन केलेची माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली. या शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पोलीस, पशुधन, पाटबंधारे, महावितरण, सहकार, महिला व बालकल्याण, परिवहन, पुरवठा आदी विभागांचा समावेश आहे. शासनाच्या विविध योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थींना शिवतारे यांच्या असे प्रमाणपत्र व धनादेश देण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत प्रत्येक विभागाचा दालन तयार करून, विविध योजना त्यासाठी लागणारे अर्ज कागदपत्राच्या अडीअडचणी समजून घेऊन, निराकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले असून, परिंचे मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन परिंचे मंडल अधिकारी बनसोडे तर तलाठी प्रमोद झुरंगे यासह पुरंदर तालुक्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
शालेय साहित्य वाटप करून माजी उपनगराध्यक्ष खाजाभाई बागवान यांचा स्मृतिदिन साजरा..                                 सासवड प्रतिनिधी:बापू  मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                सासवड नगरपालिकेचे उपनगराध्यक्षखाजाभाई बागवान यांचा दुसरा स्मृतिदिन पुरंदरमधीलदिवे येथील जीवनवर्धीनी मतिमंद विद्यालयातील विशेष मुलांना भोजन देऊन तसेच त्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करून करण्यात आला. विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास मुखाध्यापक बाळासाहेब झेंडे, खाजाभाई बागवान यांचे बंधू पापाभाई बागवान व त्यांचा मित्र परिवार व कुटुंबियांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. आमयरा बागवान हिच्या शारदा स्तवनाने कार्यक्रम प्रारंभ झाला. ॲड अशपाक बागवान यांनी प्रास्ताविकातूनउपक्रमाची माहिती देत गतवर्षीही सासवड येथील संत नामदेव शाळेत विद्यार्थ्यांस साहित्य वाटप करण्यात आले होते असे सांगितले. खाजाभाई बागवान यांची राजकीय कारकिर्द, कुटुंबासाठीचे योगदान सांगत त्यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले     स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, मोहिनी टी ग्रुपचे डॉ राजेश दळवी, माऊली गिरमेशहर पत्रकार संघाचे हेमंत ताकवले, आबीद आत्तार यांनी या वेळी मनोगतातून खाजाभाई यांच्या अनेक स्मृतींना उजाळा दिला. बागवान परिवाराच्या वतीने या प्रसंगी सासवड शहर पत्रकार संघास कृतज्ञता निधी देण्यात आला. जीवनवर्धीनी चे मुख्याध्यापक बाळासाहेब झेंडे यांनी बागवान यांच्या परिवाराचे या उपक्रमाबद्दल विशेष आभार मानले. गुरुकुल अकॅडमीचे प्रा संदीप टिळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर मोबीन बागवान यांनी सर्वांचे आभार मानले.    मोहन चव्हाण, दादा भुजबळ, बाळासाहेब कुलकर्णी गणेश मुळीक, संभाजी महामुनी, संदीप जगताप, जगदीश शिंदे, हरून बागवान, समीर बागवान, संपत शिंदे, सुमय्या बागवान, आसमाँ बागवान, शकील बागवान, जुबेर बागवान , तबस्सुम बागवान यांसह अनेक मान्यवर व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद या प्रसंगी उपस्थित होते
तब्बल पुरंदर तालुक्यामध्ये 2700 एकर जागेची संमती पत्रे सादर ;तर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ जिल्हाधिकाऱ्याकडून भूसंपादनासाठी पुणे पॅटर्न           सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                          पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मोजणी पूर्वी भूसंपादन सात गावातील 90% पेक्षा जागा मालकांनी संमिती पत्रे सादर केली आहेत ,गुरुवारी अखेरच्या दिवस पर्यंत भूसंपादन करण्यात येणाऱ्या एकूण तीन हजार एकर क्षेत्रापैकी 2700 एकर जमिनीची संमती पत्रे प्रशासनाकडे दाखल झाली आहेत ,प्रथमच प्रकल्पासाठी भूसंपादन करताना अशा पद्धतीने संमती पत्रे घेण्याचा 'पुणे पॅटर्नचा या निमित्ताने सुरू झाला आहेत, अशी माहिती सुरुवात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी  दिली. विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी ,उदाचीवाडी, कुंभारवळण ,एखतपुर ,पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणारा आहे .पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र दोन हजार सहाशे त्र्याहत्तर सुमारे सात हजार एकर इतके होते, आत्ता त्यात 1388 हेक्टर ची कपात करून हे क्षेत्र 1285 हेक्टर 3000 एकर करण्यात आल, त्यानुसार जमिनीचे संपादन होणाऱ्या शेतकरी व जमीन मालकाकडून संमिती पत्र घेण्यासाठी 25 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर पर्यंत कालावधी निश्चित केला होता, यासाठी जिल्हा प्रशासनाने भूसंपाद न संमती देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सासवड आणि पुणे येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता, पहिल्या दिवशी 760 शेतकऱ्यांनी 1070 एकर जमीन देण्यास तयार असल्याचे ,संमती  पत्र  दिले ,तर आज अखेरच्या दिवशी सुमारे 2700 शेतकऱ्यांनी जमिनीच्या संपदानाची संमती दिली आहे, एकूण 3000 क्षेत्रापैकी सुमारे 90% क्षेत्राच्या संपादनाची संमती मिळाली आहे ,त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या नावावरून नवा विक्रम नोंदविला गेला आहे .यासंदर्भात डुडी मनाले की, पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पाबाबत संमती पत्रे घेण्याचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला ,यापुढील विकास प्रकल्पासाठी हा "पुणे पॅटर्न "आदर्श ठरणारा आहे, परंतु पुरंदर तालुक्यात एक अनुचित प्रकार नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आज घडला असून ,विमानतळाच्या संदर्भात संमती पत्रे देताना एजंटांचा नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये व उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये  सुळसुळाट झालेला आहे, कारण ही सात गावातील एजंट नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये विमानतळाच्या संदर्भातील संमती पत्रे देण्यासाठी शेतकऱ्यावरील या ठिकाणी दबाव आणत आहे, हे दबाव तंत्र बरोबर नसल्याचेही जाणवत असून ,सामान्य शेतकऱ्यांना जर असा दबाव टाकण्याचा प्रयत्न जर एजंट करत असतील तर यावर जिल्हाधिकारी यांनी त्वरित कारवाई करावी ,उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये नवीन प्रशासकी इमारतीत एजंट तासानं तास त्या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बसून असतात ,सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी वेळ सुद्धा देत नाही, पत्रकारांची तर तसेच स्थिती दोन दिवस झाली आहे ,पत्रकार हा आज समाजातील चौथा स्तंभ तुम्ही मानता मग अधिकारी वर्ग का हेटाई करत आहे ,पुरंदर मधील एजंटावर त्वरित त्या ठिकाणी कारवाई ही झालीच पाहिजे, अन्यथा या ठिकाणी एजंटांच्या बाबतीमध्ये व अधिकारी उपविभागीय यांच्यावर सुद्धा त्वरित कारवाई करावी असे या ठिकाणी पत्रकार यांचे म्हणणे आहे.यावर पुरंदर तालुक्यातील सात गावातील विमानतळासाठी त्या ठिकाणी अरेरावीची; भाषा की तुम्ही त्या ठिकाणी संमती पत्र द्या, नाहीतर तुमचे  काही खरं ,बरोबर नाही अशी दमबाजी चालू आहे ,मग यावर जिल्हाधिकारी काय.कारवाई करणार ,दुसरी नवीन प्रशासकीय इमारतीमधील उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये तासंतास त्या ठिकाणी एजंटांचा सुळसुळटा झालेला असून,ऑफिसमध्ये बसून असतात ,सामान्य नागरिकांची कामे होत नाहीत, दुसरे पत्रकार यांना सुद्धा उपविभागीय अधिकारी दोन दिवस झाले वेळ देत नाही, मग हे कशासाठी ?उपविभागीय अधिकारी हे जनतेचे सेवक असून, या ठिकाणी अशी हेटाई करू नय,े हे त्यांनी ध्यानात घ्यावे, जर असे उपविभागीय अधिकारी जर कृत्य करीत असतील, तर त्यांची त्वरित बदली जिल्हाधिकारी यांनी करावी, यासाठी पुरंदर तालुक्यातील विद्यमान आमदार यावर काही भाष्य करण्यास तयार नाहीत ,हे कशासाठी मंग त्वरित त्या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांची त्वरित बदली करावी, तर या ठिकाणी पुरंदर तालुक्यामधील सात गावातील विमानतळासाठी पुरंदर मधील अधिकारी वर्गांच्या जमिनी भरपूर प्रमाणामध्ये आहेत, जर अधिकारी उपविभागीय अशी पत्रकारांचा चौथा स्तंभ असून, जर हेटाई करत असतील, तर त्यांची त्वरित बदली झाली ही पाहिजेच, यावर विद्यमान आमदारांना बोलण्यासाठी त्या ठिकाणी वेळ नाही ना तर त्या ठिकाणी त्वरित बदली ही त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांची झालीच पाहिजे ,भूसंपादनासाठी संमती पत्रे देण्याची मुदत गुरुवारी संपुष्टात आली समती पत्रे न देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने संपादित करण्यात येईल त्यांना बाजारभावाच्या चारपट मोबदला मिळेल विकसित भूखंडाच्या परतावात देण्यात येणार नाही जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाहयवळण उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागणार                                                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्ग लगतची काम पूर्ण होत असताना विविध भागातील नागरिकांच्या मागणीनुसार दहा ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कलम यांनी दिली त्यामुळे सासवड बाह्य वळण चंदन टेकडी ते व अवघे मला कळत तालुका पुरंदर येथील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे सासवड येथे पालखी महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या पदाधिकाऱ्यांसमवेद बैठक संपन्न झाली यावेळी सहाय्यक प्रकल्प संचालक अभिजीत आवटी प्रकल्प व्यवस्थापक अजय पाटील राजेंद्र ढगे फारुख सय्यद माणिकराव झेंडे सुदामराव इंगळे विजय कोलते दत्तात्रेय चव्हाण हेमंत कुमार माहूरकर राहुल गिरमे बाळासोपिंधाडे रोहिदास कुदळे विनोद जगताप बंडूकाका जगताप बळवंत गरुड.गौरव कोणते आदी उपस्थित होते यावेळी नागरिकांनी बाह्य वळणाच्या बाजूने सासवड शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून व्हावी सासवड जेजुरी दरम्यान खळद शिवरी साकुर्डे वाले परिसरातील पालखी महामार्गावर पथदिवे व्यवस्था व्हावी महामार्गावरील खळद उड्डाणपूला खालील सेवा रस्त्यावर व पालखी मार्ग लगत बंदिस्त गटारीची व्यवस्था व्हावी स्थानिक व भारित शेतकऱ्यांना पूर्ण टोल माफी मिळावी पालखी महामार्ग लगत भारीत शेतकरी कोणताही व्यवसाय करताना महामार्ग प्राधिकरणाने कोणतेही शुल्क न आकारता असे शब्द परवानगी द्यावी शिवरी येथे वाळुंज फाट्यावर मंजूर भुयारी मार्गाचे काम तातडीने सुरू करावे अशा मागण्या केल्या[19/09, 05:37] Press Mulik Bapu: नागरिकांना मिळाले आश्वासन दहा दिवसात वाळुंज फाट्यावर भुहेरी मार्गाचे काम सुरू करण्याची प्राधिकरण पदाधिकाऱ्याची आश्वासन 20 km परिसरातील शेतकऱ्यांसाठी मासिक पासची सुविधा मिळणार स्थानिक शेतकऱ्यांना संपूर्ण टूलमाफी मिळावी आणि बाधित शेतकऱ्यांना व्यवसायात करताना कोणती शुल्क न करता सशक्त परवानगी द्यावी यासाठी केंद्रीय कार्यालयात पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाही
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी स्वच्छतेची शपथ सासवड प्रतिनिधी बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड ता. पुरंदर येथील संगमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता करून, नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला नगर परिषदे समोरून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये सहभागींना स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले, 25 सप्टेंबर रोजी संपूर्ण सासवड शहर आज श्रमदान एक दिवस एक तास एक साथ ही भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये शहरातील नागरिक, शाळा, महाविद्यालय सामाजिक संस्था आणि महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले. अभियानाच्या प्रचार आणि जनजागृतीसाठी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, निवृत्त आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, स्वच्छता दूत सागर जगताप आणि पुरंदर हायस्कूलचे प्राचार्य इस्माईल सय्यद यांच्यासह अनेकांनी नागरिकांनी गुलाब पुष्प देऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, संगमेश्वर मंदिर परिसरात झालेल्या स्वच्छता मोहिमेत नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, विविध विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
पाणंद रस्ताच खुले करण्याबाबत माहुरगावचे ग्रामस्थ सकारात्मक                                                          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पु रंदर प्राईम न्यूज:                                                                     महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान या कार्यक्रमानिमित्त पाणंद रस्ते खुले करण्यासाठी माहुर ता. पुरंदर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने श्री काळभैरवनाथ मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले, या ग्रामसभेत आमदार रस्ते खुले करण्याबाबत चर्चा होऊन, ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला अशी माहिती ग्रामस्थ शंभू घाडगे यांनी दिली. या ग्रामसभेस अंगणवाडी सेविका सचिव रूपाली अधिकारी, माहूर गावच्या उपसरपंच मेघा जगताप, ग्रामपंचायत सदस्य रामदास जगताप, जयश्री भोसले, राजेंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत माहुरकर, पोलीस पाटील आरती जगताप, ग्राम महसूल अधिकारी धनंजय नाईक, अर्चना जगताप, शरद जगताप, तुकाराम जगताप आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 3,400 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवारी दि. 17 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3,400 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 3,400 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,700 तर सरासरी 3,050 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,200 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,600 तर सरासरी 2,_900 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, सुशांत कांबळे, शरयू वाबळे, गणेश होले, भाऊसो गुलदगड, पंकज निला खे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर आदी उपस्थित होते. गुळाला 4,200रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 250 बॉक्स 50 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,150 कमाल दर 4,250 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी २,७00,३,४००,३,०५०. बाजरी 2,500,3,200, 2,050. गहू 2,600,3,200,2,900. तांदूळ 5,200, 5,800, 5,500.  हरभरा 5,600, 7,000,6,300.
एकाच मिळकतीचे वेगवेगळ्या प्रकारचे गहाण खत करून घेतल्यामुळे अजित मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी व अजित नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संचालक व व्यवस्थापन यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       शिरूर गणेगाव दुमाला येथील रहिवासी सचिन गरुड व इतर यांनी व्यवसायासाठी अजित नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडे सन 2019 मध्ये रक्कम 40 व 25 लाख इतक्या कर्जाची मागणी केली होती, त्यापूर्वी सन 2015 मध्ये फिर्यादी यांनी अजित मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था यांच्याकडून कर्ज मिळवले होते व त्यांच्या व्यवसायाच्या वृध्दीसाठी सदरचे कर्ज प्रकरण अजित नागरी पतसंस्था यांच्याकडे केली होती, सदर आरोपी यांनी कर्ज प्रकरण दाखल करण्यापूर्वीच कर्ज मंजुरी करून, सदर कर्जासाठी फिर्यादी यांच्याकडून तीन वेळा गणेगाव दुमाला येथील गट नंबर 181/4 या मिळकतीचे गहाण खत करून घेतले आहे, परंतु सदर पतसंस्थेने प्रत्यक्ष करण्याची रक्कम फिर्यादी यांचे "यशराज ऍग्रो फ्रुट्स" च्या आंध्रा बँक शाखा हडपसर या खात्यामध्ये वर्ग करून, असे सांगितले परंतु, सदर फिर्यादी यांनी वेळोवेळी आरोपी यांच्याकडे जाऊन, मागणी केली असता अजून काही कागदपत्रांची कारवाई बाकी असून, ती पूर्ण झाली  की, कर्जाची रक्कम जमा होईल, असे सांगितले, त्यामुळे सदर फिर्यादी यांना कर्जाची रक्कम मिळाली नसल्यामुळे, सदरचे कर्ज प्रकरण रद्द झाले असे वाटल्यामुळे फियॅदी यांनी परत चौकशी केली नाही. त्यानंतर माननीय तहसीलदार दौंड यांनी सन 2023 मध्ये महाराष्ट्र को-ऑप सोसायटी एक ची कलम 107 अंतर्गत ताबा मिळवण्याबाबतची नोटीस दिली, त्यावेळी सदर फिर्यादी यांना सदर कर्ज प्रकरणाबाबत समजले, त्यानंतर सदर फिर्यादी यांनी कागदपत्र काढले असता, सदर आरोपी यांनी दुसरे कर्ज प्रकरण मिळून 65 लाखाची कर्ज मंजूर केले होते, परंतु सदर फिर्यादी यांची कोणतीही सही सहमती न घेता, व सदर कर्जाची रक्कम न देता, परस्पर सदरची रक्कम आरोपी नंबर दोन यांचे खात्यात वर्ग केली व आरोपी यांनी संगणमत करून, एकाच मिळकतीचे वेगवेगळ्या पद्धतीने तीन वेळा गहाण खत करून, घेतले त्याचबरोबर सदर आरोपी यांनी सन 2015 ते दोन चेक कर्ज प्रकरण बंद केली नाहीत अजित नागरी पतसंस्था व अजित मल्टीस्टेट को ऑप सोसायटी या दोन्ही पतसंस्थेचे संचालक एकच असून, फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने, सदरचे कृत्य केलेले आहे व जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड पुणे यांच्याकडे प्रकरण दाखल करून, खोटा पुरावा देऊन, 101 चा दाखला मिळवून, सदर कर्ज प्रकरणातील जामीनदार महादेव रामभाऊ थोरात यांच्यामुळे गतीचा ताबा मिळविण्याकरिता माननीय तहसीलदार यांच्याकडून पत्र दिलेले आहे ,त्याचबरोबर इतर जामीनदार यांच्या खात्यातून देखील सुमारे चार वर्षापासून रक्कम वसूल करीत आहेत व त्यांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा प्रयत्न सदर आरोपी करीत आहेत, त्याचबरोबर सदर आरोपी यांनी वेगवेगळ्या निमोशियान इन्स्ट्रुमेंट कायदा कलम 138 प्रमाणे एकविटेशन व कॉन्सिलिटेशन कलम 36 प्रमाणे प्रकरण दाखल केलेली आहेत, अशा प्रकारे सदर आरोपी यांनी संगणमत करून खरेदी यांची फसवणूक केल्याचे समजल्यानंतर सदर फिर्यादी यांनी तक्रार अर्ज सबंधित पोलिसाकडे करून, देखील त्यांनी सदर प्रकरणाची दखल न घेतल्यामुळे, सदर फिर्यादी यांनी मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिरूर यांच्या कोर्टात ॲडव्होकेट सुरेश जाधव, ऍडव्होकेट मनीषा खावडे, एडवोकेट मयूर दरेकर यांनी फियॅदी यांच्यातर्फे सदर प्रकरणाची दखल घेण्याबाबत अर्ज दाखल केला होता, त्यानंतर मे. कोर्टाने सदर प्रकरणात शिरूर पोलिसांना गुन्हा दाखल करून, चौकशी करण्याचा आदेश दिल्यानंतर, शिरूर पोलिसांनी सदर आरोपी एक) अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे संस्थापक अशोक कोडिंबा टेकवडे. दोन) सचिव दिलीप  नारायण वेल्हेकर. तीन) खजिनदार बाळासो माणिक काळे. चार) अजित मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी तर्फे संस्थापक अशोक कोंडीबा टेकवडे. पाच) अजिंक्य अशोक टेकवडे. सहा) विजया अशोक टेकवडे. सात) दिनेश श्रीकांत घोणे. आठ) भूषण सुभाष गायकवाड. नव) सतीश महादेव जाधव. दहा) प्रदीप दिगंबर जगताप. अकरा) गणेश अंकुश जगताप यांच्या विरुद्ध मा.द.वी कलम 406, 420 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून ,सदर प्रकरणाची चौकशी चालू आहे, संदेश केंजाळे पोलीस निरीक्षक शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार रमेश कदम हे करीत आहेत.
डॉ. नरसिंग गिरी यांची वाघिरे महाविद्यालयात समन्वयक म्हणून निवडमहाविद्यालयाचे                                       सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         वाणिज्य विभागाचे डॉ. नरसिंग गिरी  यांची वाणिज्य विभाग व बी बी. ए. सी. ए. बी.सी.ए  या विभागाच्या  समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.  यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके  यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले. यावेळी  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे  IQAC coordinator  डॉ. बी.  एल. शिंदे  वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख  डॉ. किशोर लिपारे, बी. बी. ए. सी. ए विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दीपक लोखंडे  बी.सी.ए  विभागाच्या विभाग प्रमुख  प्रा. सायली वढणे  व अन्य प्राध्यापक  उपस्थित होते.
पुरंदर मधील भूसंपादनाला गती; तर शेतकऱ्यांची सहमती 72% हून अधिक शेतकऱ्यांनी दर्शवली सहमती 18 सप्टेंबर पर्यंत समिती पत्र सादर केल्यास मिळणार दहा टक्के विकसित भूखंड                                                      सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आलेला आहे, दिनांक 26 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या संमतीपत्र स्वीकारण्याच्या प्रक्रियेमध्ये अवघ्या 20 दिवसांमध्ये 72 टक्के होऊन अधिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास सहमती दर्शवली आहे, संमती पत्र सादर करण्याची अंतिम मुदत ही 18 सप्टेंबर असून, त्यानंतर आठवडाभरात जमीन मोजणीला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत सहमती पत्र सादर करून दहा टक्के विकसित भूखंडाचा परतावा निश्चित करावा, असे आव्हान जिल्हा प्रशासन यांनी केलेले आहे. पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभार वळण, एखतपुर,पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे, या प्रकल्पासाठी सुमारे 3000 एकर जमिनीचे भूसंपादन आवश्यक आहे, यापैकी 2011 हुन अधिक जमिनीची संमती पत्रे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सादर केली आहेत. विशेषत मुंजवडी गावात 76 हेक्टर जमिनी पैकी 70 हेक्टर जमिनीची संमिती पत्र प्राप्त झाली आहेत, पूर्वीच्या अधिसूचनेनुसार 2673 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते परंतु, आता त्यात 1388 हेक्टर ची कपात करून, क्षेत्र 1285 हेक्टर इतके निश्चित करण्यात आले आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल, जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी संमती पत्रे स्वीकारण्याची प्रक्रिया दिनांक 26 ऑगस्ट पासून सुरू केली असून, मुदतीत संमती पत्र सादर करणारे शेतकऱ्यांना दहा टक्के विकसित भूखंडाचा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. यासाठी प्रथम येणाऱ्यास" प्रथम प्राधान्य हा निकष" ठेवण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत 1750 एकर जमिनीच्या भूसंपादनाला मान्यता मिळाली असून, एकूण क्षेत्राच्या 72% होऊन अधिक संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. जिल्हाधिकारी यांनी दिली गावांना भेट जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी दि. 16 विमानतळासाठी भूसंपादन होणाऱ्या  गावांना भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, त्यांनी शेतकऱ्यांना 18 सप्टेंबर पर्यंत संमिती पत्र सादर करण्याची आव्हान केली. मुदतीनंतर आठवडाभरात जमीन मोजणीला सुरुवात होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत संमती पत्र सादर करून, विकसित भूखंडाचा लाभ घ्यावा असे डुडी यांनी सांगितले. कुंभारवळण येथील शेतकरी बांधवांमधून गणेश मोरे, सागर कुंभारकर, प्रशांत कुंभारकर यांनी आपल्या गावच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या व्यथा विमानतळा संदर्भात मांडण्यात आल्या. कुंभारवळण ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी, कल्याण पांढरे उपजिल्हाधिकारी,संगिता चौगुले (राजापूरकर)उपजिल्हाधिकारी, वर्षा लांडगे प्रांत, विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, स्वाती दहिवाल सार्वजनिक बांधकाम विभाग, स्मिता गौड भूमी अभिलेख ,श्रीधर चव्हाण कृषी अधिकारी पुरंदर, सागर ढोले वनविभाग अधिकारी पुरंदर ,मंडल अधिकारी शेळकंदे  डी.सी  आदित्य जोजारे तलाठी,  ग्रामसेविका, विविध खात्याचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी ,सरपंच मंजुषा गायकवाड, उपसरपंच संदीप कामठे, देविदास कामठे, ग्रामपंचायत सदस्य, आजी, माजी व गावातील बहुसंख्य शेतकरी बांधव, कर्मचारी, महिला मंडळ, पत्रकार बांधव सुद्धा बहुसंख्येने हजर होते.
पुरंदर तालुक्यातील अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरच्या सहसचिव पदी संदीप टिळेकर यांची निवड                       सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर या संस्थेच्या सहसचिव पदी गुरुकुल करिअर अकॅडमीचे संस्थापक प्राचार्य संदीप टिळेकर याच्या नावाची घोषणा केली. यावेळी दुसरे सहसचिव बंडू काका जगताप यांनी त्यांच्या निवडीला अनुमोदन दिले, प्रतिष्ठान अनेक वर्ष शैक्षणिक साहित्य, कला, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करत आहे, तर टिळेकर यांनी आत्तापर्यंत आपल्या करिअकॅडमी बरोबरच श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था, रोटरी क्लब, साहित्य परिषद महात्मा फुले, सार्वजनिक ग्रंथालय आचार्य अत्रे वाचनालय, स्वर्गवासी चंद्रकांत टिळेकर शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान, पुरंदर तालुका ग्रंथालय संघ अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला मिळालेल्या जबाबदारीच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे, त्यांनी या पदावर निवड करण्यात आली आहे असे निवडीनंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, दिलीप निरगुडे, रमेश जगताप, शशिकला कोलते, गौरव कोलते, रश्मी कोलते, अण्णा खाडे, बाळासो मुळीक, केशव काकडे, राजेंद्र जगताप, आनंदा जाधव, यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेमध्ये कर आक्षेप सुनावणी यशस्वीरित्या पार                                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      सासवड नगर परिषदेच्या वतीने सासवड नगर परिषदेच्या हद्दीमधील मिळकतीची सुधारित पंचवार्षिक कर मूल्यांकन प्रतिक्रियेनुसार प्रारूप कर निर्धारण यादी चार जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, प्रारूप कर आकारणी यादीवर घेण्यात आलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यासाठी दिनांक 11 सप्टेंबर रोजी सासवड नगरपरिषद कार्यालय सासवड येथे मालमत्ता कर आक्षेप सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते, नगर परिषदेच्या कर प्रक्रिये बाबत नागरिकांकडून आलेल्या आक्षेप तक्रारी आणि सूचना यांचा सविस्तर विचार करून, योग्य निर्णय घेण्यासाठी ही सुनावणी आयोजित करण्यात आली होती, सुनावणीला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उपस्थित होते, प्राप्त आक्षेपावर सुनावणी घेण्यासाठी प्राधिकृत मूल्य निर्धारण अधिकारी तथा नगर रचनाकार बारामती शाखा बारामती यांच्या कार्यालयाकडून नगररचनाकार दत्तात्रेय तरोडे, सहाय्यक नगर रचनाकार सौरभ;); घोलप, अक्षय बराटे,आरेखक प्रणव भैलुमे आदी उपस्थित होते. नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभाग प्रमुख ओंकार शिंदे, सहाय्यक कर  निरीक्षक श्रीमती बेनझीर  शेख इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी पार पडली. नागरिकांनी त्यांच्या मालमत्तेच्या करा संदर्भातील नोंदीतील त्रुटी, कर मूल्यांकनातील विसंगती भूतकाळातील चुकीच्या नोंदी मिळकतीच्या क्षेत्रफळांमधील विसंगती, तसेच इतर अडचणी संदर्भातील अर्ज व प्रत्यक्ष मांडणी केली, कर निर्धारण यादीवर प्राप्त एकूण 582 आक्षेप अर्जापैकी 301 अजॅ धारक सुनावणीसाठी उपस्थित राहिले. सुनावणी संपल्यानंतर मुख्याधिकारी यांनी नागरिकांचे आभार मानले आणि कर निर्धारण प्रक्रियेतील पारदर्शकता आणि न्याय सुचिता करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. आक्षेप नोंदविल्यानंतर संबंधित प्रकरणाची छाननी करून, पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी कर भरणा करताना आपली मालमत्ता नोंद तपासावी, कोणतेही प्रश्न अथवा अडचणी असल्यास कर वसुली विभाग सासवड नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आव्हान त्यांनी करण्यात आले.वेळेवर कर भरणे ही नगरपरिषदेच्या विकासासाठी आवश्यक बाब असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यामधील वाघापूर या ठिकाणच्या जमीन फसवणुकीतील प्रकरणांमधील वकिली पेशा असलेली पती-पत्नी दोन्ही आरोपी फरार                                          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथे झालेल्या जमीन फसवणूक प्रकरणांमधील आरोपी सचिन जाधव आणि त्याची पत्नी अनुष्का उर्फ सुनीता जाधव हे दोघेही फरार झाले आहेत, सासवड पोलीस ठाणे येथे त्यांच्यावर विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे, तर गुन्हा दाखल सासवड मध्ये झाला असताना, वकिली पेशा असलेले सचिन जाधव यांनी सासवड मधील पत्रकार यांना बातमी लावायची नाही या कारणावरून, दमदाटी व शिवीगाळ केलेली आहे, वाघापूर येथील जमीन मालक आनंद सोनवणे आणि महेंद्र सोनवणे या भावाची 18 गुंठे जमीन खरेदी करण्याच्या नावाखाली तब्बल पाच एकर जमिनीची फसवणूक दस्त केल्याप्रकरणी आणि सोनवणे यांची मुलगी फिर्यादी पल्लवी सोनवणे यांना रिवाल्वर दाखवून, जाती वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सचिन जाधव व सुनीता उर्फ अनुष्का जाधव यांच्यावर सासवड पोलिसांनी कारवाईचा भडगा उभारलेला आहे, गुन्हा दाखल होताच, या दामत्याने सासवड शहरातून पलायन केले असून, सासवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, पुरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जमिनीला सोन्याचे भाव आलेले असून, त्यामुळे लँड माफिया कडून सर्वसामान्य लोकांच्या फसवणूक चे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत, पोलीस यंत्रणांनी असे गैरप्रकार थांबवावेत अशी अपेक्षा सामान्य नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे, त्यामुळे निदान या प्रकरणात तरी पोलिसांनी प्रामाणिकपणे फिर्यादींना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी बांधव करीत असून, या प्रकरणातील आरोपीच्या फसवणुकीचे अनेक किस्से यापूर्वी घडले असल्याचे, तालुक्यात बोलले जात आहे, तर ग्रामीण भागामध्ये गावातील पारावर बसून, जेष्ठ नागरिक युवक वर्गामध्ये वकील विषयाच्या संदर्भातील पुरंदर मधील अशा घटना घडलेल्या चर्चा सध्या चालू आहेत, यातील एक आरोपी सचिन जाधव हा वकील आहे, त्यामुळे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणार्‍या वकिली पेशालाच त्याने काळीमा फासण्याची चर्चा सध्या चालू आहे, अशा स्वरूपाचा आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास, त्यांनी तातडीने सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यातील राख येथील जमीन गट नंबर 549 व 550 साठे खत झाले असताना; परत दुसऱ्यांदा मूळ मालकाने जमिनीचे साठेखत करून जमिनीची विक्री                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                         राख( ता. पुरंदर )येथील जमीन गट क्रमांक 549 व 550 मधील एकूण साडेआठ एकर क्षेत्र विक्री करता निघाले असता ,श्रीमती इंदुबाई कृष्णा जयराम महानवर, यांची एक एकर ,श्रीमती फुलाबाई पांडुरंग महानवर यांची अडीच एकर, चंद्रभागा गुलाब महानवर यांची अडीच एकर, सई उर्फ जाई जयराम महानवर यांची अडीच एकर अशी एकूण साडेआठ एकर शेती विक्री करता करायचे असल्याने, ज्ञानदेव महानवर, फुलाबाई महानवर, यांचा मुलगा कामाजी, भाऊ, जयराम, गुलाब, सतीश महानवर यांच्याशी एकत्रित बसून, साडेआठ एकर जमीन 20 लाख 1000 रुपये प्रमाणे पांडुरंग नाथ्याबा दगडे यांनी साठेखत करताना, सरकारी मोजणी करूनच, खरेदीखत केले. व्यवहारापोटी दगडे यांनी चंद्रभागा महानवर यांची अडीच एकर क्षेत्राचे चार लाख रुपये त्यांचा मुलगा भाऊ महानवर यांच्या खात्यावर चेक द्वारे 00 480 अन्वये दि. 8 जानेवारी 2024 रोजी दिले, तर एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम दिली सई उर्फ जाई महानवर यांच्या चार लाख मुलगा ज्ञानेश्वर महानवर यांना आयसीसीआय बँकेतून त्यांच्या खात्यावर चेक क्रमांक 000619 अन्वये दि. 8 जानेवारी 2024 रोजी दिले, तर एक लाख तीस हजार रुपये सई उर्फ जाई महानवर यांना रोख रक्कम दिली. फुलाबाई महानवर यांची चार लाख रुपये मुलगा कामाजी महानवर यांना आयसीसीआय बँकेतून चेक क्रमांक 000 620 दि. 8 जानेवारी 2024 रोजी दिले, तर एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम रेखा महानवर यांना दिली. इंदुबाई महानवर यांच्या जमिनीचे तीन लाख वीस हजार सतीश महानवर यांच्या समक्ष इंदुबाई महानवर यांना रोख स्वरूपात दिले, सदरील व्यवहार पूर्ण झाल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालय पुरंदर येथील सासवड या ठिकाणी दस्त क्रमांक 263/2024 अन्वये साठेखत करून घेतले असता, जुलै 2025 मध्ये राख गावात गेले असताना, दगडे यांना असे निदर्शनास आले की, 549 व 550 मधील चंद्रभागा महानवर यांची अडीच एकर फुलाबाई महानवर यांची अडीच एकर इंदुबाई महानवर यांची एक एकर असे  बाकी अडीच एकर एकूण साडे आठ  एकर क्षेत्र विक्री ही दुसऱ्यांदा फुलाबाई पांडुरंग महानवर रा. जोगवडी यांनी त्यांच्या हद्दीतील गट क्रमांक  549 व550 साडेआठ एकर क्षेत्र सुनील दादा हाके, व सिदा दादा हाके यांनी दस्त क्रमांक 7442/ 2025 दि. 21 जुलै 2025 व 7719/ 2025 दि. ३० जुलै 2025 रोजी खरेदी केली असताना, असा व्यवहार झाला आहे. कायम खुश खरेदी खत केले आहेत, तर माझी रक्कम परत करा ,असे दगडे यांनी सांगितले असता, काहीच करून तुम्हाला देणार नाही, असे उत्तर महानवर यांनी केले, त्यामुळे दगडे यांची आर्थिक फसवणूक झाली असताना, इंदुबाई कृष्णा महानवर, चंद्रभागा गुलाब महानवर, फुलाबाई पांडुरंग महानवर, कामाजी पांडुरंग महानवर ,सतीश कृष्णा महानवर, पप्पू रामा हाके, सिद्धा दादा हाके, मोहन भाऊसो हाके, सुनील दादा हाके, विरुद्ध पांडुरंग नाथ्याबा दगडे (वय 43 वर्ष) व्यवसाय शेती रा. चौधरवाडी ता. पुरंदर यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. पोलीस हवालदार निता दोरके यांनी ही फिर्याद दाखल करून घेतली. तर दिपक वाकचौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जेजुरी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कारंडे सहाय्यक फौजदार हे पुढील तपास करीत आहेत.
आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांच्या 234 वी जयंती निमित्त सासवड नगरपालिकेकडून साफसफाई अभियान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                 भिवडी( ता. पुरंदर) येथील हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची 234 वी जयंती खूप दिमाख्यात पार पडली. यावेळी सासवड नगरपालिका यांच्या विशेष सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, यासाठी गंगाराम जाधव माजी मुख्याध्यापक व उपाध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, यशवंत (बिटु तात्या) भांडवलकर माजी नगरसेवक यांच्या पुढाकाराने सासवड नगरपालिकेच्या सहकार्यातून कचरा, साफसफाई अभियान यशस्वीरित्या पार पडले. या ठिकाणी बिसलरी, कचरा, जेवणावळीची ताटे असे पाच ट्रॅक्टर भरून साहित्य संपूर्ण स्वच्छता सासवड नगरपालिकेकडून करण्यात आली, यासाठी सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुकादम सचिन गायकवाड, निलेश भोंडे यांनी काम कर्मचारी यांकडून करून घेतले. यासाठी मोहिनी जाधव, सुनिता लांडगे,, वैशाली देवकुळे, सुनीता भोंडे, रूपाली भोंडे, सोनाली भोंडे ,नंदा भोंडे आदींनी स्वच्छता करण्यात सहभाग घेतला, अशी माहिती गंगाराम जाधव जय मल्हार क्रांती संघटना कोर कमिटी उपाध्यक्ष व यशवंत (बिटु तात्या) भांडवलकर माजी नगरसेवक यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील गोकुळ भिसे यांची पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पुणे जिल्हा वरिष्ठ अध्यक्षपदी निवड            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील चांबळी (ता. पुरंदर) येथील गोकुळ सोपान भिसे यांची पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पुणे जिल्हा वरिष्ठ अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष पुरोगामी संघर्ष समितीचे डॅकटर प्राध्यापक सुभाष वायदंडे यांनी  गोकुळ भिसे यांना नियुक्तीचे पत्र दिले, तर डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली व फुले शाहू, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार आणि महाराष्ट्रात संपूर्ण राज्यात सामाजिक अन्यायाच्या विरोधामध्ये कार्यरत राहून, आत्तापर्यंतची आपल्या कार्याची दखल घेऊन, भिसे गोकुळ यांची पुणे जिल्हा वरिष्ठ अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र त्यांना देण्यात आले ,यावेळी युवक संघटनेचे अध्यक्ष मनोज भिसे व तालुक्यातील बहुसंख्येने सदस्य व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यात शिवरुद्र वाद्य पथकाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन                                                  सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज  :                                                          सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे भवन या ठिकाणी शिवरुद्र वाद्यपथक सासवड यांच्यावतीने ससून सर्वोच्चपचार रुग्णालय पुणे यांच्या सौजन्याने, रक्तदान शिबिराचे आयोजन 10 ते 4 या वेळेमध्ये करण्यात आले होते, यासाठी 60 बॉटलचे रक्तदात्यांनी आपले रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असल्याचे, दुसऱ्याला अडीअडचणीच्या वेळी मदत होणार असल्याच्या कारणावरून, रक्तदान उत्साहात संपन्न करण्यात आले. सन 2009 ची स्थापना असून, या मध्ये 16 वर्ष हा शिवरुद्र वाद्य पथक कामकाज करीत असून, कोरोना काळात रुग्णांना वैद्यकीय मदत, सांगली, कोल्हापूर येथे पूर आला असता, जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या, होतकरु मुलांना, पथकातील गरजू होतकरूंना शैक्षणिक मदत, साफसफाई, आरोग्याबाबत सुविधा आदी उपक्रम राबवले आहेत, यासाठी ससून  रुग्णालयाचे डॉ. देसले शरद, डॉ. अंजली राहणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली. यासाठी शिवरुद्र वाद्यपदक सासवड संस्थापक अध्यक्ष राजन (भैया )जगताप यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
Load More That is All